शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

संसदेत खडाजंगी सुरूच! ऑस्कर पुरस्कारांचे श्रेय मोदी सरकार घेणार नाही हीच अपेक्षा: काँग्रेस 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2023 05:54 IST

अदानी प्रकरणावरून दुसऱ्या दिवशीही कामकाज स्थगित

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लंडनमध्ये केलेल्या वक्तव्यावरून तसेच अदानी प्रकरणात संसदीय समिती स्थापन करण्याच्या मुद्द्यावरून संसदेच्या दोन्ही सभागृहांत वातावरण तापले आहे. दुसऱ्या दिवशीही कामकाज स्थगित करण्याची वेळ आली. परंतु तत्पूर्वी राज्यसभेत भारताला दोन ऑस्कर मिळाल्याबद्दल अभिनंदन करताना हलकेफुलके वातावरणही तयार झाले. त्यातच ‘ऑस्कर’ पुरस्कारांचे श्रेय मोदी सरकार घेणार नाही हीच अपेक्षा, असा टोला काँग्रेस पक्षाध्यक्ष खरगे यांनी लगावला.

आम्ही दिग्दर्शन केले आहे, आम्ही लिहिले आहे, मोदीजींनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले, असे श्रेय सत्ताधाऱ्यांनी घेऊ नये, असे म्हणताना खरगे हसू लागले. त्यांचे म्हणणे ऐकून सत्ताधारी पक्षात बसलेले पीयूष गोयल आणि एस. जयशंकरही जोरजोरात हसू लागले. 

राहुल गांधी माफी मागा...

लोकसभेत राहुल गांधी यांचे वक्तव्य आणि अदानी प्रकरणावरून गदारोळ झाला. त्यानंतर कामकाज दुपारी २ पर्यंत तहकूब झाले. दुपारी दोन वाजता कामकाज पुन्हा सुरू झाल्यानंतर सत्ताधारी पक्षाचे सदस्य आपापल्या जागी उभे राहून ‘राहुल गांधी माफी मागा’ अशा घोषणा देत होते, तर काँग्रेससह विरोधी पक्षांच्या सदस्यांनी अदानी प्रकरणाची चौकशी करण्यासाठी जेपीसी स्थापन करण्याची मागणी लावून धरली.

गोयल यांना नोटीस 

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या विधानाबाबत सत्ताधारी भाजपच्या आक्रमक भूमिकेनंतर काँग्रेसने सभागृह नेते पीयूष गोयल यांच्या विरोधात विशेषाधिकार भंगाची नोटीस दिली आहे. एकवेळ तहकूब केल्यानंतर दुपारी सव्वादोनच्या सुमारास कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.

नोटाबंदी : मृत्यूंबाबत अधिकृत अहवाल नाही : सरकार

केंद्र सरकारने मंगळवारी राज्यसभेत सांगितले की, नोटाबंदीमुळे झालेल्या मृतांच्या संख्येबाबत कोणताही अधिकृत अहवाल त्यांना प्राप्त झालेला नाही. तृणमूल काँग्रेसचे सदस्य अबीर रंजन बिस्वास यांनी सरकारकडे नोटाबंदीमुळे मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्या संख्येची माहिती मागवली होती, त्यावर सरकारने ही माहिती दिली. मात्र, १८ डिसेंबर २०१८ रोजी तत्कालीन अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सभागृहात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मान्य केले होते की, नोटाबंदीच्या काळात चार लोकांचा मृत्यू झाला होता. यात संबंधित कुटुंबांना ४४ लाखांची भरपाई देण्यात आली होती.

सरकारचे परराष्ट्र धोरण हे अदानी समूहाला फायदा करून देण्याचे आहे. हे उद्दिष्ट अदानीजींना अधिक श्रीमंत करणे हे आहे का? गेल्या नऊ वर्षांपासून मोदीजींनी देशाला गोंधळात टाकले आहे आणि अदानीजींना जगाच्या दौऱ्यावर आपल्यासोबत ठेवले आहे. - राहुल गांधी, काँग्रेस नेते

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Parliamentसंसद