शहरं
Join us  
Trending Stories
1
अफगाणिस्तानच्या हल्ल्यात पाकिस्तानचे ५८ सैनिक ठार; तालिबान सरकारने ISIS बद्दल काय सांगितलं?
2
'मुलींनी रात्री बाहेर पडू नये', दुर्गापूर सामूहिक बलात्कार प्रकरणावर ममता बॅनर्जींचे वादग्रस्त वक्तव्य
3
धक्कादायक! कपडे उतरवून पोलिसांनी हैवानासारखं मारलं, धमन्या फुटल्या; तरुणाचा मृत्यू
4
'वनडे क्वीन' स्मृतीनं रचला नवा इतिहास; ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियन विरुद्ध साधला मोठा डाव
5
“कोकणाच्या भूमीतील या न्याय मंदिरातून स्थानिकांना जलद गतीने न्याय मिळेल”: एकनाथ शिंदे
6
‘लंच पे चर्चा’! राज ठाकरे आईसोबत पुन्हा मातोश्रीवर; उद्धव ठाकरेंसोबत स्नेहभोजनाचा कार्यक्रम
7
गृह कर्जाचा हप्ता भरणं जड जातंय? ईएमआय कमी करण्यासाठी 'या' ५ स्मार्ट ट्रिक्स वापरा आणि मोठी बचत करा!
8
“दादा भुसेंचे ट्रम्प यांच्याशी घनिष्ट संबंध असतील, पालकमंत्रीपद...”; गिरीश महाजनांचा टोला
9
अर्धा संघ तंबूत धाडत कुलदीप यादवनं रचला इतिहास; दिल्लीच्या मैदानात मारला विश्वविक्रमी 'पंजा'
10
तुम्हालाही मस्त नेलपेंट लावायला आवडते? ठरेल जीवघेणं, वाढू शकतो स्किन कॅन्सरचा धोका
11
तुम्हीही होऊ शकता कोट्यधीश! विद्यार्थी, गिग वर्कर्ससाठी 'मायक्रो SIP' चा नवा सुपरहिट ट्रेंड
12
"जर तुम्ही कॉफी बनवायला शिकला असाल तर...", राहुल गांधींच्या दक्षिण अमेरिका दौऱ्यावर भाजपचा निशाणा
13
“तरे म्हणाले होते हा माणूस दगा देईल, तेच झाले, आता पश्चाताप झाला नसता”; ठाकरेंची शिंदेवर टीका
14
नोकरीच्या बचतीची चिंता सोडा! 'या' ४ सोप्या मार्गांनी घरबसल्या तपासा तुमचा PF बॅलन्स
15
Pune Crime: गर्लफ्रेंडच्या मोबाईलमध्ये दुसऱ्या पुरुषासोबतचे नग्न फोटो, बॉयफ्रेंडने केक कापायच्या चाकूनेच तरुणीची हत्या
16
घाईत घेतलेला निर्णय महागात; अमिताभ बच्चन यांनी मुलांच्या ओव्हर कॉन्फिडन्सवर टाकला प्रकाश
17
अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री पुन्हा पत्रकार परिषद घेणार, महिला पत्रकारांना विशेष आमंत्रण
18
अफगाणिस्तान vs पाकिस्तान; थेट युद्धात कोणाचे सैन्य वरचढ ठरेल? जाणून घ्या...
19
IND vs WI : बुमराहचा 'ट्रिपल फिफ्टी'चा रेकॉर्ड; वेळ घेतला; पण परफेक्ट यॉर्करसह साधला विकेटचा डाव
20
Rajya Sabha Election: भाजपने मुस्लीम नेत्याला उतरवले निवडणुकीच्या रिंगणात, तीन नावाची घोषणा

संसदेत खडाजंगी सुरूच! ऑस्कर पुरस्कारांचे श्रेय मोदी सरकार घेणार नाही हीच अपेक्षा: काँग्रेस 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2023 05:54 IST

अदानी प्रकरणावरून दुसऱ्या दिवशीही कामकाज स्थगित

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लंडनमध्ये केलेल्या वक्तव्यावरून तसेच अदानी प्रकरणात संसदीय समिती स्थापन करण्याच्या मुद्द्यावरून संसदेच्या दोन्ही सभागृहांत वातावरण तापले आहे. दुसऱ्या दिवशीही कामकाज स्थगित करण्याची वेळ आली. परंतु तत्पूर्वी राज्यसभेत भारताला दोन ऑस्कर मिळाल्याबद्दल अभिनंदन करताना हलकेफुलके वातावरणही तयार झाले. त्यातच ‘ऑस्कर’ पुरस्कारांचे श्रेय मोदी सरकार घेणार नाही हीच अपेक्षा, असा टोला काँग्रेस पक्षाध्यक्ष खरगे यांनी लगावला.

आम्ही दिग्दर्शन केले आहे, आम्ही लिहिले आहे, मोदीजींनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले, असे श्रेय सत्ताधाऱ्यांनी घेऊ नये, असे म्हणताना खरगे हसू लागले. त्यांचे म्हणणे ऐकून सत्ताधारी पक्षात बसलेले पीयूष गोयल आणि एस. जयशंकरही जोरजोरात हसू लागले. 

राहुल गांधी माफी मागा...

लोकसभेत राहुल गांधी यांचे वक्तव्य आणि अदानी प्रकरणावरून गदारोळ झाला. त्यानंतर कामकाज दुपारी २ पर्यंत तहकूब झाले. दुपारी दोन वाजता कामकाज पुन्हा सुरू झाल्यानंतर सत्ताधारी पक्षाचे सदस्य आपापल्या जागी उभे राहून ‘राहुल गांधी माफी मागा’ अशा घोषणा देत होते, तर काँग्रेससह विरोधी पक्षांच्या सदस्यांनी अदानी प्रकरणाची चौकशी करण्यासाठी जेपीसी स्थापन करण्याची मागणी लावून धरली.

गोयल यांना नोटीस 

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या विधानाबाबत सत्ताधारी भाजपच्या आक्रमक भूमिकेनंतर काँग्रेसने सभागृह नेते पीयूष गोयल यांच्या विरोधात विशेषाधिकार भंगाची नोटीस दिली आहे. एकवेळ तहकूब केल्यानंतर दुपारी सव्वादोनच्या सुमारास कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.

नोटाबंदी : मृत्यूंबाबत अधिकृत अहवाल नाही : सरकार

केंद्र सरकारने मंगळवारी राज्यसभेत सांगितले की, नोटाबंदीमुळे झालेल्या मृतांच्या संख्येबाबत कोणताही अधिकृत अहवाल त्यांना प्राप्त झालेला नाही. तृणमूल काँग्रेसचे सदस्य अबीर रंजन बिस्वास यांनी सरकारकडे नोटाबंदीमुळे मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्या संख्येची माहिती मागवली होती, त्यावर सरकारने ही माहिती दिली. मात्र, १८ डिसेंबर २०१८ रोजी तत्कालीन अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सभागृहात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मान्य केले होते की, नोटाबंदीच्या काळात चार लोकांचा मृत्यू झाला होता. यात संबंधित कुटुंबांना ४४ लाखांची भरपाई देण्यात आली होती.

सरकारचे परराष्ट्र धोरण हे अदानी समूहाला फायदा करून देण्याचे आहे. हे उद्दिष्ट अदानीजींना अधिक श्रीमंत करणे हे आहे का? गेल्या नऊ वर्षांपासून मोदीजींनी देशाला गोंधळात टाकले आहे आणि अदानीजींना जगाच्या दौऱ्यावर आपल्यासोबत ठेवले आहे. - राहुल गांधी, काँग्रेस नेते

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Parliamentसंसद