शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा विश्वासू मित्र देश रशिया करणार पाकिस्तानची मदत?; JF 17 लढाऊ विमानाला पुरवणार इंजिन
2
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
3
आजचे राशीभविष्य- ६ ऑक्टोबर २०२५: आजचा दिवस आनंददायी, नोकरी व्यवसायात फायदाच फायदा!
4
संपादकीय: बिहार ठरवेल आगामी दिशा? जनसुराज्य, जंगलराज ते मागासच राहिलेले राज्य...
5
उपचारांवरचा खर्च नाकारणे म्हणजेच हक्काचे उल्लंघन; केरळ हायकोर्टाने एलआयसीला सुनावले
6
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
7
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
8
पुतीन यांच्या जाळ्यात ट्रम्प अडकले की काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोठ्या भ्रमात होते, पण...
9
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही
10
‘आरएटी’ सक्रिय झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग
11
शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी
12
राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी
13
खोकल्याच्या औषधात होते विषारी रसायन; महाराष्ट्रासह सहा राज्यांत सीडीएससीओची तपासणी
14
लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो; मृताच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय
15
बिल्डरकडून सरकारी जागेवर इमारती उभारून ११२ रहिवाशांची फसवणूक; ३६ वर्षांनी प्रकार उघड
16
पाकच्या पोकळ वल्गना सुरूच; म्हणे, भारत त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबेल
17
मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत
18
आफ्रिकेतील टांझानियाच्या घनदाट जंगलांतली जादूगार
19
कुशीवली धरणाचा मोबदला संतप्त शेतकऱ्यांनी नाकारला; प्रतिगुंठा २० हजार; रक्कम नाशिक लवादाकडे जमा करण्याच्या हालचाली
20
अतिवृष्टीमुळे डोंगर खचून २० ठार; १२ तासांत ३०० मिमीपेक्षा जास्त पावसाने हाहाकार; घरे वाहून गेली, शेकडो पर्यटक अडकले

बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 05:14 IST

बिहारमध्ये झालेल्या एसआयआर सर्वेक्षणातून ५० विधानसभा मतदारसंघांतील सुमारे २३ लाख महिलांची नावे निवडणूक आयोगाने वगळल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.

पाटणा : बिहारमध्ये २२ वर्षांनंतर एसआयआरच्या माध्यमातून मतदार यादीचे शुद्धीकरण केल्याचा दावा रविवारी केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी केला आहे. कुमार यांनी हा दावा करताना आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये निवडणूक आयोगाकडून जे १७ नवे उपक्रम हाती घेण्यात येतील त्याची अंमलबजावणी पुढे देशभर करण्यात येईल, असेही स्पष्ट केले आहे. 

गेले काही दिवस कुमार बिहारचा दौरा करत होते. रविवारी आपला दौरा आटोपल्यानंतर कुमार यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी नोंदणी केल्यानंतर १५ दिवसांत मतदारांना मतदार ओळखपत्र मिळेल याची खात्री करण्यासाठी एक नवी एसओपी पद्धत राबवणार असल्याचे सांगितले. त्याचबरोबर प्रत्येक मतदान केंद्रावर मोबाइल जमा करण्याची सुविधाही राबवली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर राजकीय पक्षांना प्रत्येक मतदान केंद्रावर प्रतिनिधी (एजंट) नियुक्त करण्याची खात्री करण्यास आणि मतदान प्रक्रियेदरम्यान फॉर्म १७ सी पर्यंत त्यांची उपस्थिती कायम ठेवण्याचे आवाहन केले. 

मागासवर्गीय, मुस्लिमांची नावे वगळली : काँग्रेसबिहारमध्ये झालेल्या एसआयआर सर्वेक्षणातून ५० विधानसभा मतदारसंघांतील सुमारे २३ लाख महिलांची नावे निवडणूक आयोगाने वगळल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. यात मागासवर्गीय व मुस्लिमांची संख्या अधिक होती व या २०२०च्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात चुरशीची निवडणूक झाल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे. अशा तऱ्हेने लाखो महिलांची नावे वगळण्याचा सुनियोजित कट असल्याचाही काँग्रेसने आरोप केला आहे.बिहार विधानसभा निवडणुकीची घोषणा लवकरच करण्यात येणार असल्याचे ज्ञानेश कुमार यांनी सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : Bihar's Voter List 'Purified' After 22 Years: Election Commissioner Claims

Web Summary : Bihar Election Commissioner claims voter list purification after 22 years. New initiatives, including voter ID delivery within 15 days and mobile deposit at booths, will be implemented nationwide. Congress alleges deliberate deletion of women voters, especially from backward classes and Muslims.
टॅग्स :Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगBiharबिहार