शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

बाजारभावापेक्षा अधिक दराने धान्याची केली खरेदी, शेतकऱ्यांना कोट्यवधीचा गंडा घालून व्यापारी फरारी

By बाळकृष्ण परब | Updated: December 30, 2020 12:38 IST

Farmer News : एकीकडे दिल्लीच्या सीमेवर शेतकरी कृषी कायद्यांविरोधात आंदोलनासाठी बसले असताना दुसरीकडे मध्य प्रदेशमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

भोपाळ - एकीकडे दिल्लीच्या सीमेवर शेतकरी कृषी कायद्यांविरोधात आंदोलनासाठी बसले असताना दुसरीकडे मध्य प्रदेशमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मध्य प्रदेशमधील हरदा जिल्ह्यात एका कंपनीने सुमारे २२ शेतकऱ्यांशी धान्याबाबत करार केला. मात्र खरेदीनंतर शेतकऱ्यांना पैसे न देताच संबंधित कंपनी आणि व्यापारी फरार झाले. या शेतकऱ्यांनी मसूर-चण्याच्या धान्यासाठी सुमारे दोन कोटी रुपयांचा करार केला होता. मात्र धान्यखरेदीनंतर शेतकऱ्यांना गंडा घातला.मध्य प्रदेशमधील हरदा जिल्ह्यातील देवास येथील २२ शेतकऱ्यांना खोजा ट्रेडर्स या कंपनीसोबत करार केला होता. मात्र खरेदीचे पैसे देण्याची वेळ आली तेव्हा व्यापाऱ्याचा पत्ताच नव्हता. त्रस्त शेतकऱ्यांनी जेव्हा व्यापाऱ्याचा शोध घेतला तेव्हा संबंधित व्यापाऱ्याने तीन महिन्यांच्या आतच आपल्या कंपनीचे रजिस्ट्रेशन संपुष्टात आणल्याचे समोर आले. आता याबाबत खातेगांव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तसेच प्रशासनाकडेही लेखी तक्रार दिली आहे.दरम्यान, आसपासच्या परिसरातील सुमारे १०० ते १५० शेतकऱ्यांसोबतसुद्धा अशाच प्रकारची घटना घडल्याचा दावा पीडित शेतकऱ्यांनी केला आहे. संबंधित व्यापाऱ्याने दिलेले चेक बाऊन्स झाल्यानंतर आपली फसवणूक झाली असावी अशी शंका शेतकऱ्यांना आली. या खोजा ट्रेडर्स नामक कंपनीने शेतकऱ्यांकडून बाजारभावापेक्षा ७०० रुपये अधिक देऊन धान्याची खरेदी केली होती.यासंदर्भात इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार शेतकऱ्यांना पोलिसांना दिलेल्या आपल्या तक्रारीत सांगितले की, खोजा ट्रेडर्सच्या दोन भावांनी आपले लायसन्स दाखवून आमच्याकडून धान्याची खरेदी केली. मात्र पैसे देण्याचे सांगितले. मात्र पैसे न आल्याने त्यांनी बाजार समितीशी संपर्क साधला. तेव्हा संबंधित व्यापाऱ्यांची नोंदच नसल्याचे समोर आले. दरम्यान पोलिसांच्या मदतीने या व्यापाऱ्यांचा शोध सुरू आहे, असे देवासच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती