शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

"अरविंद केजरीवाल दिल्लीतून दर आठवड्याला भगवंत मान यांना दारूचे बॉक्स पाठवतात"

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2022 14:09 IST

Sukhbir Singh Badal And Arvind Kejriwal, Bhagwant Mann : अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर सिंग बादल यांनी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याबाबत मोठं विधान केलं आहे.

नवी दिल्ली - पंजाबमध्ये गायक आणि काँग्रेस नेता सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येनंतर राजकारण तापलेलं पाहायला मिळालं. एकीकडे काँग्रेस सरकार राज्यातील आप सरकारवर सातत्याने जोरदार हल्लाबोल करत आहे. तर दुसरीकडे अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर सिंग बादल (Sukhbir Singh Badal) यांनी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant Mann) आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्याबाबत मोठं विधान केलं आहे. "अरविंद केजरीवाल दिल्लीतून दर आठवड्याला भगवंत मान यांना दारूचे बॉक्स पाठवतात" असा गंभीर आरोप सुखबीर सिंग यांनी केला आहे.

सुखबीर सिंग बादल यांनी आपवर टीकास्त्र सोडलं आहे. "पंजाबमधील सरकार अरविंद केजरीवाल दिल्लीतून चालवतात. केजरीवाल दर आठवड्याला भगवंत मान यांना दारूचे बॉक्स पाठवतात आणि तुम्ही सरकारी कार्यालयात बसून मजा करा. सरकार मी चालवतो असं केजरीवाल मान यांना म्हणतात" असं सुखबीर सिंग बादल यांनी म्हटलं आहे. तसेच पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याच्या मृत्यूलाही आप सरकार जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. 

आप सरकारने सिद्धू मुसेवालाची सुरक्षा काढून घेतली त्यामुळे त्याचे शत्रू सावध झाले आणि त्याने जीव गमावला असं देखील बादल यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. काही दिवसांपूर्वी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सत्येंद्र जैन हे देशभक्त आहेत. तसेच मोहल्ला क्लिनिक मॉडेलचे शिल्पकार म्हणून त्यांना पद्मविभूषण देऊन सन्मानित केले जावे, अशी मागणी केली होती. "सत्येंद्र जैन यांच्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप निराधार आहेत. सगळ्यांना त्याची चौकशी करू द्या. सीबीआयने त्याची चौकशी करून त्याला क्लीन चिट दिली आहे. आता ईडी लवकरच त्यांना सर्व आरोपातून मुक्त करेल. जैन यांनी मोहल्ला क्लिनिक आणून एक आदर्श ठेवला आहे, त्यांचे काम पाहण्यासाठी बाहेरून लोक येतात. त्यांना पद्मविभूषण देण्यात यावे" असं म्हटलं होतं. 

टॅग्स :Bhagwant Mannभगवंत मानAAPआपPunjabपंजाबArvind Kejriwalअरविंद केजरीवाल