शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

पंजाबच्या राज्यपालांकडून राष्ट्रपती राजवटीची धमकी, मुख्यमंत्री मान यांचा भाजपवर गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2023 01:01 IST

मान यांनी असा दावा केला आहे की, त्यांना मिळालेल्या बहुतांश पत्रांना उत्तर दिले आहे.

चंडीगड : राज्यपाल बनवारीलाल पुरोहित पंजाबमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची धमकी देत असल्याचा आरोप पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी शनिवारी केला. मात्र, मणिपूर आणि हरयाणामधील राज्यपाल तेथील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत मौन पाळत आहेत, अशी टिप्पणीही त्यांनी केली. 

पुरोहित यांनी शुक्रवारी मान सरकारला इशारा दिला होता की, ते राज्यात राष्ट्रपती राजवटीची शिफारस करू शकतात आणि त्यांच्या पत्रांना उत्तर न दिल्यास फौजदारी कारवाईदेखील सुरू करू शकतात. मान हे त्यांना पाठविलेल्या पत्रांना उत्तर देत नसल्याचा आरोप पुरोहित यांनी केला आहे. यामुळे त्यांच्या अधिकाराचा अवमान होत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

मान यांनी असा दावा केला आहे की, त्यांना मिळालेल्या बहुतांश पत्रांना उत्तर दिले आहे. मान म्हणाले की, पंजाबच्या राज्यपालांनी त्यांना १६ पत्रे लिहिली होती. त्यांपैकी नऊ पत्रांना उत्तर देण्यात आले आहे. राज्यपालांनी पत्र लिहिण्याची घाई करू नये आणि त्वरित उत्तराची अपेक्षा करू नये, असे ते म्हणाले. 

मान म्हणाले की, त्यांचे सरकार अमली पदार्थांच्या विळख्याला तोंड देण्यासाठी सक्रिय पावले उचलत आहे. तस्करांच्या मालमत्ता जप्त करणे, छापे टाकणे अशा कारवाया केल्या जात आहेत. पण, राज्यात कायदा आणि सुव्यवस्था चांगली नसल्याचा दावा राज्यपालांनी केला आहे. 

मला राज्यपालांना विचारायचे आहे की, हरयाणाच्या राज्यपालांनी हरयाणाचे मुख्यमंत्री खट्टर यांना नूह येथे घडलेल्या घटना, जातीय संघर्ष आणि हिंसाचार यांबाबत नोटीस बजावली आहे का? हरयाणाच्या राज्यपालांनी त्यांना काही पत्र लिहिले आहे का? पंजाबचे राज्यपाल पंजाबमधील कायदा आणि सुव्यवस्थेबद्दल चिंतित होते; परंतु, मणिपूरवर त्यांनी कधीही विधान केले नाही.  

टॅग्स :Bhagwant Mannभगवंत मान