शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विजयाच्या पडद्यामागे विनोद तावडेंचा हात; भाजपा मोठे बक्षीस देण्याची शक्यता...
2
“निवडणूक आयुक्तांना नेपाळला पाठवा, तिथेही भाजपा सरकार स्थापन करेल”; कुणाल कामराची टीका
3
कॅश-कट्टा डावानं तेजस्वींचं स्वप्न उधळलं; पण विजयानंतरही भाजपला मोठं टेंशन! नीतीश कुमारांशिवाय सरकार बनू शकतं, पण...
4
बिहारमध्ये आज जे तेजस्वी यादवांसोबत घडलं, तेच २०१०मध्ये लालू प्रसादांसोबतही घडलं होतं...
5
उपमुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या मुकेश साहनींच्या पदरी भोपळा; VIP चा दारुण पराभव...
6
मी काय बोललो समजलं का? धर्मेंद्र यांच्या प्रकरणावरुन 'भिडू'ने पापाराझींची मराठीत घेतली शाळा
7
सोन्या-चांदीचे दर मोठ्या प्रमाणात घसरले, खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट Gold ची नवी किंमत
8
Kuldeep Yadav: कुलदीप यादवच्या नावावर नव्या विक्रमाची नोंद, घरच्या मैदानावर घेतल्या १५० विकेट्स!
9
Delhi Blast : दिल्ली स्फोटानंतर काश्मीरचा 'टिकिंग टाईम बॉम्ब' डॉक्टर बेपत्ता; उमरसोबत केलं होतं काम
10
कोण आहेत नागपूरचे सुपुत्र आयपीएस विजय साखरे ? मराठमोळ्या अधिकाऱ्याकडे दिल्लीतील स्फोटप्रकरणी एनआयए पथकाचे नेतृत्व
11
"एनडीए जोरदार आघाडीवर...": बिहार निकालांवर शशी थरूर यांचे मोठे विधान; काँग्रेसला दिला सल्ला
12
पर्सनल लोन घेताय? केवळ व्याजदर नका पाहू! 'या' Hidden Charges मुळे कर्ज बनते डोकेदुखी!
13
अंता पोटनिवडणुकीत १५९ मतांमुळे भाजपाची लाज राखली; मात्र काँग्रेस उमेदवारानं मारली बाजी
14
"नितीश कुमार मुख्यमंत्री होते, आहेत अन् राहतील..."; JDU नं केलेली पोस्ट काही मिनिटांतच डिलीट
15
Nitin Gilbile: कारमध्येच मित्राला घातल्या गोळ्या, नितीन गिलबिले हत्या प्रकरणात लोणावळ्यात एकाला अटक
16
ज्येष्ठ अभिनेत्री कामिनी कौशल यांचं निधन, वयाच्या ९८व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
आरोग्य विमा घेताना धूम्रपान, मद्यपान या सवयी जाहीर करणे का महत्त्वाचे आहे? काय म्हणताहेत एक्सपर्ट
18
कोटींचा आकडा गाठायचा आहे? 'हॉट स्टॉक टिप्स' सोडा, फक्त 'या' २ सवयी पाळा; तज्ञांनी सांगितला 'श्रीमंतीचा मंत्र'!
19
Bihar Election 2025 Result: धीरेंद्र शास्त्रींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “राष्ट्रवाद...”
20
Turmeric Coffee : हटके ट्रेंड! कॉफीला द्या हळदीचा तडका; आश्चर्यकारक फायदे समजल्यावर रोजच न चुकता प्याल
Daily Top 2Weekly Top 5

पंजाबच्या राज्यपालांकडून राष्ट्रपती राजवटीची धमकी, मुख्यमंत्री मान यांचा भाजपवर गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2023 01:01 IST

मान यांनी असा दावा केला आहे की, त्यांना मिळालेल्या बहुतांश पत्रांना उत्तर दिले आहे.

चंडीगड : राज्यपाल बनवारीलाल पुरोहित पंजाबमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची धमकी देत असल्याचा आरोप पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी शनिवारी केला. मात्र, मणिपूर आणि हरयाणामधील राज्यपाल तेथील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत मौन पाळत आहेत, अशी टिप्पणीही त्यांनी केली. 

पुरोहित यांनी शुक्रवारी मान सरकारला इशारा दिला होता की, ते राज्यात राष्ट्रपती राजवटीची शिफारस करू शकतात आणि त्यांच्या पत्रांना उत्तर न दिल्यास फौजदारी कारवाईदेखील सुरू करू शकतात. मान हे त्यांना पाठविलेल्या पत्रांना उत्तर देत नसल्याचा आरोप पुरोहित यांनी केला आहे. यामुळे त्यांच्या अधिकाराचा अवमान होत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

मान यांनी असा दावा केला आहे की, त्यांना मिळालेल्या बहुतांश पत्रांना उत्तर दिले आहे. मान म्हणाले की, पंजाबच्या राज्यपालांनी त्यांना १६ पत्रे लिहिली होती. त्यांपैकी नऊ पत्रांना उत्तर देण्यात आले आहे. राज्यपालांनी पत्र लिहिण्याची घाई करू नये आणि त्वरित उत्तराची अपेक्षा करू नये, असे ते म्हणाले. 

मान म्हणाले की, त्यांचे सरकार अमली पदार्थांच्या विळख्याला तोंड देण्यासाठी सक्रिय पावले उचलत आहे. तस्करांच्या मालमत्ता जप्त करणे, छापे टाकणे अशा कारवाया केल्या जात आहेत. पण, राज्यात कायदा आणि सुव्यवस्था चांगली नसल्याचा दावा राज्यपालांनी केला आहे. 

मला राज्यपालांना विचारायचे आहे की, हरयाणाच्या राज्यपालांनी हरयाणाचे मुख्यमंत्री खट्टर यांना नूह येथे घडलेल्या घटना, जातीय संघर्ष आणि हिंसाचार यांबाबत नोटीस बजावली आहे का? हरयाणाच्या राज्यपालांनी त्यांना काही पत्र लिहिले आहे का? पंजाबचे राज्यपाल पंजाबमधील कायदा आणि सुव्यवस्थेबद्दल चिंतित होते; परंतु, मणिपूरवर त्यांनी कधीही विधान केले नाही.  

टॅग्स :Bhagwant Mannभगवंत मान