शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

भारतातील हे राज्य अमली पदार्थांच्या तस्करांना देणार मृत्युदंड, केंद्राकडे पाठवला प्रस्ताव

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2018 18:38 IST

अमली पदार्थांच्या तस्करीमुळे गांजलेल्या भारतातील एका राज्याने या तस्करीला आळा घालण्यासाठी अमली पदार्थांच्या तस्करांना मृत्युदंडाची शिक्षा ठोठावण्याचा प्रस्ताव तयार केला आहे.

चंदीगड - अमली पदार्थांची तस्करी ही गेल्या काही काळात गंभीर समस्या बनली आहे. अनेक कडक उपाय योजना करूनही अमली पदार्थांच्या तस्करीमध्ये घट झालेली दिसून येत नाही.  अमली पदार्थांच्या तस्करीमुळे गांजलेल्या पंजाबमध्ये अमली पदार्थांच्या तस्करीला आळा घालण्यासाठी अमली पदार्थांच्या तस्करांना मृत्युदंडाची शिक्षा ठोठावण्याचा प्रस्ताव पंजाब सरकारने तयार केला आहे. हा प्रस्ताव मंजुरीसाठी केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला असून, आता केंद्राने मंजुरी दिल्यास राज्यातील अमली पदार्थ तस्करांच्या मुसक्या आवळणे शक्य होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. 

पंजाबची राजधानी असलेल्या चंदीगड येथील सिव्हील सचिवालयात हा निर्णय घेण्यात आला. याबाबत पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह म्हणाले की, "अमली पदार्थांच्या तस्करांनी राज्यातील तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त केले आहे. त्यामुळे त्यांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. पंजाब सरकार राज्याला व्यसनमुक्त करण्याच्या आपल्या संकल्पावर ठाम आहे." याआधी पंजाब सरकारने शस्त्रांच्या परवान्यासाठी अर्जदाराला डोप टेस्ट देणे अनिवार्य केले होते. सद्यस्थितीत पंजाबमध्ये अमली पदार्थांचे सेवन ही गंभीर समस्या बनली आहे. राज्यातील तरुण वर्गातील बहुतांश तरुण हे व्यसनाधीन झाले आहेत. पंजाबमधील विधानसभा निवडणुकीतही अमली पदार्थांचा मुद्दा ऐरणीवर होता. तसेच राज्याला नशामुक्त करण्याचे वचन देऊन काँग्रेस पक्ष सत्तेवर आला होता.  

टॅग्स :Drugsअमली पदार्थPunjabपंजाबGovernmentसरकार