शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
4
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
5
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
6
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
7
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
8
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
9
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
10
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
11
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
12
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
13
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
14
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
15
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
16
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
17
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
18
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
19
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
20
Gold Mortgage Loan : सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या

Punjab Election 2022: जाहीरनाम्यांमधील फुकटबाजीमुळे तिजोरी होणार साफ; आश्वासनं देण्यासाठी पक्षांमध्ये चढाओढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2022 06:50 IST

सत्तारुढ काँग्रेसने तर आश्वासनांची लयलूट केली आहे. काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांची जाहीर सभा धुरी येथे झाली.

यदु जोशी

चंडीगड : पंजाबमध्ये मतदारांना आकर्षित करण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये सध्या जोरदार शर्यत लागली आहे. जाहीरनाम्यांमध्ये ‘फुकट’गिरी ठासून भरली आहेच. त्यापलिकडे जावून फुकटवाल्या आश्वासनांची खैरात वाटली जात आहे. तीन लाख कोटी रुपयांच्या कर्जाखाली असलेले पंजाब सरकार राज्यात कोणाचीही सत्ता आली तरी ही खैरात वाटताना आणखीच कर्जबाजारी होणार आहे. सत्तेची आस लावून बसलेल्या आम आदमी पार्टीने मोफतचा दिल्ली पॅटर्न पंजाबमध्येही आणला. वीज मोफत देणार, १८ वर्षे वयावरील महिलांना महिन्याकाठी एक हजार रुपये देणार, झोपडीधारकांना मोफत पक्की घरे, गरीब मुलामुलींना मोफत शिक्षण, १६ हजार मोहल्ला क्लिनिकमध्ये मोफत उपचार असा आश्वासनांना पेटारा आपचे नेते अरविंद केजरीवाल यांनी उघडला आहे. 

भाजपने एक लाख एकर शेतजमीन ही भूमिहिनांना मोफत देण्याचे, प्रत्येक भूमिहिनास वर्षाकाठी सहा हजार रुपये, सरकारी नोकऱ्यांमध्ये महिलांना ३५ टक्के आरक्षण, पदवीनंतर बेरोजगार राहिलेल्या दोन वर्षापर्यंत चार हजार रुपये महिना भत्ता, सर्वांना ३०० युनिटपर्यंत मोफत वीज असा आश्वासनांचा गुच्छ मतदारांच्या हाती दिला आहे. अकाली दलाने शेतकऱ्यांना कर्जमाफी, मुलींना पदवीपर्यंत मोफत शिक्षण, इयत्ता नववी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत सायकली, प्रत्येक घरी मोफत वीज असे आश्वासनांचे पॅकेज दिले आहे.

सत्तारुढ काँग्रेसने तर आश्वासनांची लयलूट केली आहे. काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांची जाहीर सभा धुरी येथे झाली. त्यांनी काँग्रेस पुन्हा सत्तेत आल्यास प्रत्येक घरी वर्षाकाठी आठ गॅस सिलिंडर मोफत देऊ आणि १८ वर्ष वयावरील प्रत्येक महिलेस ११०० रुपये महिना दिला जाईल असे जाहीर केले. मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी यांनी खुल्या प्रवर्गातील मुलांसाठीही स्कॉलरशिपची घोषणा केली आहे. काँग्रेसचा जाहीरनामा अजून यायचा आहे.

पंजाबमध्ये बेरोजगारी, माफिया राज आणि नशाखोरी या तीन महत्त्वाच्या समस्या सोडविण्यासाठीचा उपाय कोणत्याही राजकीय पक्षाकडे नाही. त्यामुळे स्वस्त लोकप्रियतेसाठी मोफतवाल्या घोषणांना ऊत आला आहे. या अशा घोषणा पंजाबची अर्थव्यवस्था बुडविल्याशिवाय राहणार नाहीत.  - डॉ. रणजित सिंग घुमान, माजी अर्थशास्त्र विभागप्रमुख,  पंजाबी विद्यापीठ, पटियाला

काढावे लागणार आणखी कर्ज एकीकडे पंजाब सरकारवर तीन लाख कोटींचे कर्ज आहे आणि दुसरीकडे कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे सरकारच्या उत्पन्नात कमालीची घटले आहे. कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी सरकारला ओढाताण करावी लागत आहे. विकास कामांना कात्री लावावी लागत आहे. फुकटवाल्या घोषणांपायी राज्याच्या तिजोरीवर वर्षाकाठी तीस हजार कोटी रुपयांचा भार पडणार आहे. त्यासाठी आणखी कर्ज घ्यावे लागेल.

टॅग्स :Punjab Assembly Election 2022पंजाब विधानसभा निवडणूक २०२२