शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

आता पंजाबमध्येही चालणार बुलडोझर? CM मान यांनी दिला 31 मेपर्यंतचा अल्टिमेटम!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2022 20:06 IST

मुख्यमंत्री मान यांनी, अतिक्रमण करणाऱ्यांना जमिनी परत केल्या नाही, तर गुन्हेही दाखल केले जाऊ शकतात, असा इशारा दिला आहे.

सध्या राजधानी दिल्लीमध्ये अतिक्रणांवर जबरदस्त कारवाई सुरू आहे. यातच आता पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनीही सरकारी जमिनींवर कब्जा केलेल्यांवर कारवाई होऊ शकते, असा इशारा दिला आहे. मान यांनी सरकारी आणि ग्राम पंचायतींच्या जमिनींवर अतिक्रमण करणाऱ्यांना, कब्जा सोडण्यासाठी 31 मे पर्यंतचा अल्टीमेटम दिला आहे.

मुख्यमंत्री मान यांनी, अतिक्रमण करणाऱ्यांना जमिनी परत केल्या नाही, तर गुन्हेही दाखल केले जाऊ शकतात, असा इशारा दिला आहे. यासंदर्भात पंजाबी भाषेत ट्विट करत मुख्यमंत्री मान म्हणाले, "आपण सरकारी आणि ग्राम पंचायतींच्या जमिनींवर अवैधरित्या कब्जा केलेल्यां मंडळींना, मग ते राजकीय नेते असोत, अधिकारी असोत किंवा कुणी श्रीमंत लोक असोत. या सर्वांना विनंती करत आहोत, की त्यांनी 31 मेपर्यंत अतिक्रमण केलेल्या जमिनींवरील कब्जा सोडावा आणि जमीन सरकारला परत करावी अन्यथा कारवाई केली जाईल."

दिल्लीत सुरू आहे कारवाई -दिल्लीत द्वारका सेक्टर 3 सह अनेक भागांत बुधवारीही अतिक्रमणविरोधी कारवाई सुरू आहे. या भागांत अनेक बेकायदा इमारतींवर बुलडोझर चालवला जात आहे. महापालिकेने मंगळवारी न्यू फ्रेंड्स कॉलनीतील अतिक्रमण  हटविले. तसेच, पालिकेचे अधिकारी सोमवारी शाहीनबाग येथेही पोहोचले होते. मात्र, येथील स्थानिक लोकांचा आणि राजकारण्यांचा तीव्र विरोध पाहता, त्यांना कारवाई न करताच परतावे लागले. याशिवाय, उत्तर दिल्ली नगरपालिकेनेही (एनडीएमसी) मंगोलपुरीच्या एका भागात मंगळवारी अतिक्रमणविरोधी मोहीम चालवली होती.  

टॅग्स :Bhagwant Mannभगवंत मानAam Admi partyआम आदमी पार्टीEnchroachmentअतिक्रमण