शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

Arvind Kejriwal: 'आम्हाला काँग्रेसमधला कचरा नकोय, नाहीतर...', अरविंद केजरीवालांनी केला मोठा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2021 15:04 IST

Arvind Kejriwal in Punjab: पंजाब दौऱ्यावर असलेल्या दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

अमृतसर-

Arvind Kejriwal in Punjab: पंजाब दौऱ्यावर असलेल्या दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. अमृतसरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत केजरीवाल यांनी काँग्रेसचे आमदार आणि खासदारांबाबत एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. "आम्हाला आमच्या पक्षात काँग्रसमधला कचरा नकोय, नाहीतर आज संध्याकाळपर्यंत काँग्रेसचे २५ आमदार आणि दोन-तीन खासदार आम आदमी पक्षात दिसले असते", असा दावा अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. 

"ज्या नेत्याला निवडणुकीचं तिकीट मिळत नाही तो पक्षावर नाराज होत असतो आणि हे प्रत्येक पक्षात होत असते. त्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न केले जातात. काही जण तयार होतात आणि काहींची मनधरणी करण्यात यश येत नाहीत. असे लोक दुसऱ्या पक्षात जाण्याचा मार्ग स्वीकारतात. काँग्रेसमधले असे बरेच नेते आणि आमदार आमच्या संपर्कात आहेत. पण आम्हाला काँग्रेसमधला कचरा आमच्या पक्षात नकोय", असं रोखठोक वक्तव्य अरविंद केजरीवाल यांनी केलं आहे. 

"आम्ही जर काँग्रेसमधला कचरा आमच्या पक्षात घेण्यास सुरुवात केली तर मी ठामपणे सांगू शकतो की आज संध्याकाळपर्यंत काँग्रेसचे २५ आमदार आमच्या पक्षात दिसले असते. तुम्हाला जर त्यांचे किती आणि आमचे किती अशी स्पर्धाच जर करायची आहे. तर आमचे तर दोनच आमदार तिथं गेलेत. पण त्यांचे २५ आमदार आणि दोन-तीन खासदार आमच्या संपर्कात आहेत. त्यांना आमच्या पक्षात यायचं आहे. पण हे वाईट राजकारण आहे आणि यात आम्हाला पडायचं नाही", असं केजरीवाल म्हणाले. 

दरम्यान, पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्ष आता कमकुवत झाला आहे. कारण पक्षाचे तीन पैकी दोन आमदार पक्षाला सोडचिठ्ठी देऊन काँग्रेसमध्ये गेले आहेत. भटिंडा ग्रामीण मतदार संघातील आमदार रुबी यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. त्यानंतर रायकोट मतदार संघाचे आमदार जगतार सिंग यांनी मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांचं कौतुक करत काँग्रेसचा मार्ग स्वीकारला आहे. 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपPunjabपंजाब