शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

Punjab Assembly Election 2022: कुमार विश्वास यांच्या आरोपांवर AAP चे प्रत्युत्तर, राघव चड्ढा म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2022 16:33 IST

Punjab Assembly Election 2022: आपचे नेते आणि आमदार राघव चड्ढा यांनी कुमार विश्वास यांच्या आरोपामागे षडयंत्र रचले जात असल्याचे म्हटले आहे.

नवी दिल्ली: आम आदमी पक्षाचे माजी नेते आणि कवी कुमार विश्वास यांनी आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. कुमार विश्वास यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर फुटीरतावाद्यांचे समर्थक असल्याचा आरोप केला आहे.

दरम्यान, कुमार विश्वास यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर केलेल्या आरोपांना आम आदमी पक्षाने प्रत्युत्तर दिले आहे. आपचे नेते राघव चड्ढा यांनी विश्वास यांच्या आरोपांना अपप्रचार असल्याचे म्हटले आणि अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात षडयंत्र रचले जात असल्याचे सांगितले. निवडणुकीच्या दोनच दिवस आधी कुमार विश्वास यांना या गोष्टी का आठवल्या? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. 

कुमार विश्वास 2017 पूर्वी काहीही का बोलले नाहीत? ते आतापर्यंत गप्प का होते? असेही राघव चड्ढा यांनी विचारले. तसेच, अरविंद केजरीवाल यांच्यावर खोटे व्हिडिओ टाकून त्यांची बदनामी करण्याचे षडयंत्र रचले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. पंजाबमधील वातावरण बिघडवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पण, जनता आमच्यासोबत आहे, असेही ते यावेळी म्हणाले.

काय म्हणाले होते कुमार विश्वास?

एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार कुमार विश्वास यांनी अरविंद केजरीवाल हे पंजाबमध्ये दहशतवाद्यांचे समर्थन करत आहेत, असा आरोप केला आहे. तसेच त्यांनी सांगितले की, अरविंद केजरीवाल यांनी त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा फॉर्म्युला सांगितला होता. कुमार विश्वास म्हणाले की, अरविंद केजरीवाल तेव्हा म्हणाले होते की, एकेदिवशी मी पंजाबचा मुख्यमंत्री बनेन किंवा स्वतंत्र देश असलेल्या खलिस्तानचा पंतप्रधान बनेन. मात्र त्यावेळी मी केजरीवाल यांना फुटीरतावाद्यांना सोबत न घेण्याचा सल्ला दिला होता, असे कुमार विश्वास म्हणाले होते.

राहुल गांधींनीही केली होती टीकाराहुल गांधी यांनीही एका सभेमध्ये बोलताना अरविंद केजरीवाल यांच्यावर जोरदार टीका केली होती. काँग्रेसचे नेते दहशतवाद्यांचा घरी दिसणार नाहीत, मात्र झाडूचा सर्वात मोठा नेता दहशतवाद्याच्या घरी जातो, असे ते म्हणाले होते. 2017 निवडणुकीवेळी अरविंद केजरीवाल हे मोगामध्ये पूर्वाश्रमीच्या खलिस्तानी दहशतवाद्याच्या घरी थांबले होते, त्या आधारावर राहुल गांधी यांनी ही टिप्पणी केल्याचे बोलले जात आहे.  

टॅग्स :AAPआपPunjab Assembly Election 2022पंजाब विधानसभा निवडणूक २०२२Arvind Kejriwalअरविंद केजरीवाल