शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

'८० हजार पोलीस काय करत आहेत, अमृतपाल प्रकरणात यंत्रणा अपयशी'; हायकोर्टाने पंजाब पोलिसांना फटकारलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2023 14:01 IST

पंजाबमध्ये गेल्या तीन दिवसापासून इंटरनेट बंद करण्यात आले आहे.

पंजाबमध्ये गेल्या तीन दिवसापासून इंटरनेट बंद करण्यात आले आहे. खलिस्तानची मागणी करणाऱ्या फुटीरतावादी अमृतपाल सिंग या अटक करण्यासाठी पोलिसांनी राज्यभरात तपास सुरू केला असून अद्याप अटक झालेली नाही. आता उच्च न्यायालयाने यावरुन पंजाबच्या यंत्रणांना फटकारले आहे. मंगळवारी याप्रकरणी पंजाब पोलिसांवर प्रश्न उपस्थित करत उच्च न्यायालयाने अमृतपाल सिंग याच्या अटकेवरुन प्रश्नचिन्ह उपस्थित केले. खंडपीठाने म्हटले की, पंजाबचे ८०,००० पोलीस काय करत आहेत? अमृतपाल सिंगचे गायब होणे हे गुप्तचर यंत्रणेचे अपयश आहे, असं न्यायालयाने म्हटले आहे. 

 

पत्नी-मुलाचा कारनामा! 'मी जिवंत आहे...' म्हणत 'तो' पुरावा घेऊन एसपी ऑफिसमध्ये पोहचला अन्...

यावेळी पंजाब पोलिसांनी उत्तर देताना म्हटले की, अमृतपाल सिंगच्या अटकेसाठी घेराव घालण्यात येत आहे. सीमांवर नाकेबंदी करण्यात आली आहे. अमृतपाल सिंग याच्या अनेक समर्थकांना अटक करण्यात आली आहे. यातील ५ जणांवर रासुका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. याशिवाय अमृतपालवर एनएसएही लावण्यात आले आहे.

दरम्यान, या प्रकरणात जर अनेक साथीदारांना अटक झाली असेल तर अमृतपालला का पकडले नाही, असा सवालही न्यायालयाने केला. उत्तरात पंजाब पोलिसांनी हे प्रकरण अत्यंत संवेदनशील असल्याचे सांगितले. अशा परिस्थितीत आपण काळजीपूर्वक कारवाई करत आहोत असं म्हटले आहे . याप्रकरणी आम्ही वेळीच कारवाई केल्याचे पोलिसांनी सांगितले. अमृतपाल सिंग सलग तीन दिवस पोलिसांना चकमा देत आहे. तो वेश धारण करून नेपाळ किंवा पाकिस्तानला पळून जाऊ शकतो, असेही बोलले जात आहे.

'देशाच्या विरोधात बोलणाऱ्यांवर कारवाई झाली-भगवंत मान

दरम्यान, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान म्हणाले की, आम्ही कोणालाही अशांतता निर्माण करू देणार नाही. काही घटक आहेत जे पाकिस्तानच्या भडकावून द्वेषपूर्ण वक्तव्ये देत आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्यात आली असून त्याअंतर्गत देशाविरोधात बोलणाऱ्या सर्वांना पकडण्यात आले आहे. पंजाबची शांतता आणि देशाची प्रगती ही आमची प्राथमिकता आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी याप्रकरणी मान सरकारचे कौतुकही केले. 

टॅग्स :PunjabपंजाबPoliceपोलिसHigh Courtउच्च न्यायालय