शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

पंजाब सरकारचा मोठा निर्णय; राजकारणी, निवृत्त अधिकाऱ्यांसह 424 व्हीआयपींची सुरक्षा काढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2022 21:17 IST

Punjab AAP Government : राजकारण्यांसह तब्बल 424 व्हीआयपींची सुरक्षा काढून घेतली आहे. ज्या व्हीआयपींची सुरक्षा काढून घेण्यात आली त्यात अनेक निवृत्त अधिकारी आणि माजी आमदारांचा समावेश आहे. 

नवी दिल्ली - पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी भ्रष्टाचाराबाबत कठोर भूमिका घेत मोठी कारवाई केली आहे. भगवंत मान यांनी आरोग्यमंत्री विजय सिंगला यांना भ्रष्टाचाराच्या आरोपावरून मंत्रिमंडळातून काढून टाकले आहे. यानंतर आता पुन्हा एकदा पंजाबच्याआप सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राजकारण्यांसह तब्बल 424 व्हीआयपींची सुरक्षा काढून घेतली आहे. ज्या व्हीआयपींची सुरक्षा काढून घेण्यात आली त्यात अनेक निवृत्त अधिकारी आणि माजी आमदारांचा समावेश आहे. 

सुरक्षा काढून घेण्यापूर्वी पंजाब सरकारने या मुद्द्यावर आढावा बैठक घेतली होती, ज्यामध्ये 424 लोकांना सुरक्षेची गरज आहे का यावर चर्चा करण्यात आली होती. या बैठकीनंतर राज्य सरकारने सुरक्षा कमी करण्याचे आदेश जारी केले आहेत. सुरक्षा काढून घेण्यामागचे एक कारण म्हणजे पंजाब पोलिसांमध्ये आधीच कर्मचाऱ्यांची मोठी कमतरता असल्याचेही सांगितले जात आहे. अशा स्थितीत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सामान्य ठिकाणी सुरक्षा कर्मचाऱ्यांची कमतरता भरून काढणे कठीण होत आहे.

एप्रिलमध्ये याआधी पंजाब सरकारने माजी मंत्री, माजी आमदार आणि इतर नेत्यांसह 184 लोकांची सुरक्षा काढून घेण्याचे आदेश दिले होते. विशेष म्हणजे, पंजाबचे माजी मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी, कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा मुलगा रणिंदर सिंग आणि काँग्रेस आमदार प्रताप सिंग बाजवारे यांच्या पत्नी यांच्या कुटुंबाची सुरक्षा गेल्या महिन्यात काढून घेण्यात आली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

विजय सिंगला यांनी कंत्राटे देताना टक्केवारी कमिशनची मागणी केली होती. विजय सिंगला यांच्याविरोधात ठोस पुरावे मिळाल्यानंतर भगवंत मान यांनी विजय सिंगला यांना मंत्रीपदावरून हटवले आहे. विजय सिंगला यांच्यावर कारवाई करताना भगवंत मान म्हणाले, "अरविंद केजरीवाल यांनी मला सांगितले की, मी लाचखोरी, एका पैशाची बेईमानी सहन करू शकत नाही. मी वचन दिले होते की ते होणार नाही. आंदोलनातून बाहेर पडलेले आम्ही लोक आहोत आणि ते आंदोलन भ्रष्टाचाराच्या विरोधात होते." 

टॅग्स :PunjabपंजाबAAPआपBhagwant Mannभगवंत मान