शहरं
Join us  
Trending Stories
1
'अब की बार...४०० पार' घोषणेचा निवडणुकीत फटका बसला; भुजबळांनी जाहीरपणे दिली कबुली
2
"4 जूनला आमचे सरकार येणार अन् 5 जुलैला तुमच्या खात्यात 8500 रुपये टाकणार"- राहुल गांधी
3
"आम्ही पाठिंबा दिला होता, त्यामुळे..."; निवडणूक संपताच महाविकास आघाडीत फूट?
4
विभव कुमार यांचे सर्व युक्तिवाद निष्फळ, स्वाती मालिवार मारहाण प्रकरणी जामीन अर्ज फेटाळला
5
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
6
सात वर्षांनीही सापडला नाही मृतदेह; किर्ती व्यास हत्या प्रकरणात सहकारीच निघाले आरोपी
7
किमान आता तरी कोणती कारणं सांगू नका; वसीम अक्रमने भारतीय खेळाडूंची उडवली खिल्ली
8
Hardik Pandya नक्की कुठेय? टीम इंडियासोबत USA ला गेला नाही; मोठी अपडेट समोर
9
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...
10
आता ओडिशात मिळणार मोफत वीज, मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची मोठी घोषणा
11
कर्नाटक सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी भारतात येणार; ३१ मे रोजी SIT ला सामोरं जाणार
12
रायफलने डीजे ऑपरेटरच्या छातीत मारली गोळी; मद्यपानानंतर झालेल्या भांडणात तरुणाची हत्या
13
Tata Altroz ​​Racer चा टीझर रिलीज, पुढच्या महिन्यात होणार लाँच, किती असेल किंमत?
14
तुम्ही आंधळे आहात का? तुमच्यावर विश्वास नाही म्हणत कोर्टानं गुजरात सरकारला फटकारलं
15
"अडवाणी पाकिस्तानी आहेत, भारतात येऊन स्थायिक झाले", राबडी देवींचा भाजपावर निशाणा
16
अंबाती रायुडूला RCB चा माजी खेळाडू Live Show मध्ये 'Joker' म्हणाला, मयांतीने मुद्दा छेडला अन्... 
17
या देशात सोडण्यात आले लॅबमध्ये विकसित केलेले लाखो डास, समोर आलं असं कारणं
18
प्रेम, शारीरिक शोषण, लग्न अन् तरूणाने काढला पळ; प्रेयसीने भररस्त्यात पकडून दिला चोप
19
शेअर बाजारात मोठी अस्थिरता, ४ जूनला भाजप सरकार आलं नाही तर काय असेल स्थिती?
20
राहुल गांधींच्या सभेमध्ये मंच कोसळला, नेतेमंडळींचा एकच गोंधळ उडाला

काश्मिरात घुसखोरी करणारे जिवंत राहणार नाहीत; भारतीय लष्कराचा दहशतवाद्यांना इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2019 12:24 PM

Pulwama Terror Attack : भारतीय लष्कराने मंगळवारी (18 फेब्रुवारी) पत्रकार परिषद घेत दहशतवाद्यांना कठोर संदेश दिला आहे.

ठळक मुद्देअतिरेकी मार्गावरील मुलांना घरी परत बोलवा!, भारतीय लष्कराचं काश्मीरमधील पालकांना आवाहनकाश्मीरमध्ये घुसखोली कराल तर जिवंत राहणार नाही; भारतीय सैन्याचा दहशतवाद्यांना इशारा

नवी दिल्ली - भारतीय लष्कराने मंगळवारी (18 फेब्रुवारी) पत्रकार परिषद घेत दहशतवाद्यांना कठोर संदेश दिला आहे. ''पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या सूत्रधारांचा 100 तासांच्या आतमध्ये खात्मा केला. काश्मीर खोऱ्यात किती अब्दुल रशीद गाझी आले आणि गेले. कोणत्याही दहशतवाद्याने काश्मीरमध्ये घुसखोरी केल्यास त्याला जिवंत सोडणार नाही'', असा इशारा भारतीय लष्कराने दिला आहे.  तसंच या हल्ल्यामागे ISIचा हात असल्याची शक्यता नाकारता येत नाही, असाही मोठा खुलासा भारतीय लष्कारने यावेळेस केला.

'...तर कोणताही दहशतवादी जिवंत राहणार नाही' 

काश्मीर पोलीसचे आयजी एसपी पाणि यांनी सांगितले की, 2018मध्ये जैश-ए-मोहम्मदचे 56 दहशतवादी मारले गेले. यावर्षी आतापर्यंत एकूण 31 दहतशवादी ठार करण्यात आले, यामध्ये जैश-ए-मोहम्मदच्या 12 दहशतवाद्यांचा समावेश आहे.  

लेफ्टनंट जनरल ढिल्लन यांनी म्हटले की, 'किती गाझी आले आणि किती गेले, काश्मीर खोऱ्यात घुसखोरी करणाऱ्या प्रत्येक दहशतवाद्याला आम्ही ठार करणारच. एकही दहशतवादी जिवंत राहणार नाही'.'

काश्मीरमधील मातांना भारतीय लष्कराचे आवाहन

यावेळेस भारतीय लष्कराने जम्मू काश्मीरमधील पालकांना कळकळीचे आवाहनदेखील केले. ''दहशतवादाच्या मार्गावर जाणाऱ्या तुमच्या मुलांना समजवा आणि माघारी बोलवा. चुकीच्या मार्गावर गेलेल्या मुलांना समर्पण करायला लावा, असे आमचे जम्मू काश्मीरमधील मातांना आवाहन आहे.आत्मसमर्पण करणाऱ्यांसाठी आम्ही कित्येक चांगले उपक्रम राबवत आहोत. पण हातात बंदूक घेणाऱ्यांची गय केली जाणार नाही'', असा स्पष्ट इशारा यावेळेस भारतीय लष्कराकडून देण्यात आला. 

आम्ही शहीद जवानांच्या कुटुंबीयांसोबत - भारतीय लष्कर

सीआरपीएफचे आयजी जुल्फिकार हसन यांनी सांगितले की, 'शहीद जवानांच्या कुटुंबीयांना स्वतःला एकटे समजू नये. तुमच्यासोबत आम्ही सदैव उभे आहोत. शिवाय, देशातील निरनिराळ्या भागांमध्ये शिक्षण घेणाऱ्या काश्मिरी मुलांसहीत आम्ही हेल्पलाइन चालवत आहोत. जेणेकरुन त्यांना कोणत्याही वाईट परिस्थितीचा सामना करावा लागू नये'

'जैश-ए-मोहम्मदवर पाकिस्तानी सैन्याचा वरदहस्त'चकमकीवेळी तसंच चकमक झाल्यानंतर त्या ठिकाणी नागरिकांनी जाऊ नये. चकमकीच्या ठिकाणी कोणी गेल्यास आम्हाला कारवाई करावी लागेल, असा इशारा भारतीय लष्कराने दिला आहे. पाकिस्तानी सैन्य आणि  ISIचा जैश-ए-मोहम्मदवर वरदहस्त आहे. पुलवामा हल्ल्याचा मास्टरमाइंड कामरानच होता, पिंगलान चकमकीत त्याचा खात्मा करण्यात आला. 

कोण आहे अब्दुल रशीद गाझी ?जैश-ए-मोहम्मदचा कमांडर अब्दुल रशीद गाझी याने या हल्ल्यासाठी आयईडी स्फोटांचे ट्रेनिंग दिले होते. तो आयईडी स्फोटांचा एक्स्पर्ट असल्याचेही बोलले जाते. 9 डिसेंबर2018ला तो पाकिस्तानातून काश्मीरमध्ये दाखल झाला होता. जैश-ए-मोहम्मद या दहशदवादी संघटनेने काश्मीरमध्ये सुरू केलेल्या कॅम्पमध्ये गाझी हा प्रमुख ट्रेनर होता. तो काश्मीरमध्ये घुसल्याचे कळताच सुरक्षा संस्थांनी अ‍ॅलर्ट जारी केला होता. गाझी हा 'जैश-ए-मोहम्मद'चा तो टॉप ट्रेनर आहे. तो यापूर्वी अफगाणिस्तानातील तालिबानी अतिरेकी संघटनांमध्येही होता. तसेच पाकव्याप्त काश्मीरमध्ये चालणा-या अतिरेक्यांच्या ट्रेनिंग कॅम्पमध्ये तो प्रमुख होता आणि नव्याने संघटनेत दाखल झालेल्यांना ट्रेन करण्याची प्रमुख जबाबदारी त्याच्यावरच होती.  

पुलवामा दहशतवादी हल्ल्यात 40 जवान शहीदपुलवामा दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले. 14 फेब्रुवारीला जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हा भ्याड हल्ला झाला. देशात जवानांवर झालेला हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा हल्ला आहे. ज्या ताफ्यावर हा हल्ला झाला, त्यात एकूण 78 वाहने होती आणि त्यातून एकूण 2,547 जवान प्रवास करत होते.  जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आदिल अहमद दार उर्फ वक्कास याने लाटूमोड येथे ताफ्यावर 350 किलो आरडीएक्स स्फोटकांनी भरलेली कार धडकवली. आदिलने स्फोटकांनी भरलेली कार सीआरपीएफच्या ताफ्याच्या दिशेनं नेली आणि ताफ्याजवळ जाताच स्फोट घडवला. हा हल्ला इतका भीषण होता की, स्फोटात जवानांच्या बसच्या चिंधड्या उडाल्या. 

कारद्वारे सुरक्षा जवानांच्या ताफ्याला लक्ष्य केल्याचा हा पहिलाच आत्मघाती हल्ला आहे. त्यामुळे सुरक्षा दलांची चिंता वाढली आहे. या स्टाइलने आतापर्यंत सीरिया आणि अफगाणिस्तानातील दहशतवादी संघटना हल्ला करत होत्या. हल्ल्याची ही पद्धत भारतात प्रथमच वापरली गेली आणि ती वापरण्यासाठी एका स्थानिक काश्मिरी तरुणाचा वापर केला गेला, हीच आता अतिशय चिंतेची बाब बनली आहे.

 

 

 

 

 

 

 

 

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाJaish e Mohammadजैश-ए-मोहम्मदIndian Armyभारतीय जवानJammu Kashmirजम्मू-काश्मीर