शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

Pulwama Attack : 'नको आरक्षण, नको मंदिर, नको तुमचे १५ लाख, मोदीजी फक्त 40 च्या बदल्यात 400 हवेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2019 05:28 IST

दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सीआरपीएफचे ४९ जवान शहीद झाले आणि अवघा देश सुन्न झाला. याच अनुषंगाने ‘कसा करावा दहशतवादाचा बीमोड’ या विषयावर ‘लोकमत’ने वाचकांकडून प्रतिक्रिया मागविल्या होत्या.

दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सीआरपीएफचे ४९ जवान शहीद झाले आणि अवघा देश सुन्न झाला. याच अनुषंगाने ‘कसा करावा दहशतवादाचा बीमोड’ या विषयावर ‘लोकमत’ने वाचकांकडून प्रतिक्रिया मागविल्या होत्या. अवघ्या दोन दिवसांत पत्रांचा अक्षरक्ष: पाऊस पडला. यावरूनच देशवासीयांच्या तीव्र भावनांची कल्पना येते. या अमानवी हल्ल्याबाबत दु:ख व्यक्त करतानाच लोकांनी आपल्या मनातील संतापाला वाट मोकळी करून दिली आहे. अनेक जणांनी पाकिस्तानचा बदला घ्या, दहशतवाद्यांना ठेचून काढा, असे म्हटले आहे. तर आंतरराष्ट्रीय स्तरावर आर्थिक कोंडी करून पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा उघडा पाडावा, असे काहींना वाटते. महत्त्वाचे म्हणजे, शहीद जवानांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी ठाम उभे असल्याची ग्वाही देताना, तेथे कर माझे जुळती... ही भावना सर्वांचीच आहे! 

राष्ट्रीय आपत्ती जाहीर कराया हल्ल्याला केंद्र सरकारने राष्ट्रीय आपत्ती म्हणून घोषित करावे. तसेच सात दिवसांचा दुखवटा जाहीर करावा. त्यामुळे शहीद जवान व त्यांच्या कुटुंबीयांप्रती सन्मान व देशातील एकता यातून दिसून येईल. युद्धासाठी सर्वांनी तयार रहायला हवे. बाह्य आणीबाणी घोषित करावी. हल्ला हाच संरक्षणाचा सर्वात मोठा मार्ग आहे.- राम कोरके, सेवानिवृत्त नायक, तोफखाना रेजिमेंटमर्यादित युद्धाचा विचार करावाभारताने पाकिस्तानसोबत मर्यादित युद्धाचा विचार करावा. पाकिस्तानमध्ये जाणाऱ्या अनेक नद्यांचे पाणी अडवून गोची करावी. बलुचिस्तान हा प्रांत पाकिस्तानपासून स्वतंत्र होण्यासाठी आज धडपड करत आहे. भारताने बलुच नेत्यांना शक्य ती सर्व मदत करावी. काश्मीरमधील अनेक भारतीय राजकारणी पाकिस्तानधार्जिणे धोरण राबवताना दिसतात. त्यांच्या नांग्या ठेचाव्यात.- आशिष पाटील, संभाजीनगर, कोल्हापूर.धमाका कराशहीद भगत सिंग यांनी ब्रिटिश काळात जसे असेम्बलीमध्ये बॉम्ब फेकला आणि त्यावर प्रतिक्रिया देताना म्हटले की ‘बहरो को सुनाने के लिये धमाको की जरूरत होती है’ अगदी त्या प्रमाणे भारत सरकारलासुद्धा असेच काही पाऊल उचलावे लागणार आहे. त्याशिवाय दहशतवादी आणि पाकिस्तान यांचे कंबरडे मोडणार नाही. अमेरिकेने पाकिस्तानात घुसून ओसामा बिन लादेनला संपवला. भारतानेसुद्धा तसेच भीषण सर्जिकल स्ट्राइक करून संपूर्ण दहशतवाद संपवावा.- वैभव आसरकर, अकोट, जि. अकोलाघरभेद्यांचा बंदोबस्त कराकाश्मीरचा विशेष दर्जा काढावा, माजी सैनिक व इतर राज्यातील इच्छुक नागरिकांना काश्मिरमध्ये रहाण्याची परवानगी द्यावी. सच्च्या भारतीयांची संख्या वाढल्यास पाकिस्तानी धार्जिणे लोकांवर आपोआपच वचक बसेल. सैनिकी कारवायांमध्ये अडचणी निर्माण करणे, दहशतवाद्यांना मदत करणे, अशा कामे करणाºया घरभेद्यांचा कायमचा बंदोबस्त करावा.- दिलीपकुमार खिस्ते,कामोठे, ता. पनवेल जि. रायगडजशास तसेच उत्तर हवेजशास-तसे उक्ती प्रमाणे आता खुले-आम सामना केला तरच दहशतवाद्यांवर जरब बसेल. कआज आपले राष्ट्र दहशतवाद्यांसाठी प्रयोगशाळा झाली आहे, दहशतवादाचे वेग-वेगळे प्रयोग खुले-आम होत आहेत अशावेळी आपण स्वत: खंबीर असतांना वाट का बघतो? कुठलाही राजकीय हेतू अथवा मनसुबा न बाळगता दहशतवादी अड्डे असलेल्या देशांना संघटीतपणे धडा शिकवणे योग्य ठरेल.- प्रमोद सुभाषराव डांगे (कुलकर्णी) नक्षत्रवाडी, औरंगाबाद.दहशतवाद संपवाभारतीय सैन्यदलावर झालेला भ्याड हल्ला हा भारतातील प्रत्येक जाती-धर्मातील लोकांवर झालेला हल्ला आहे. ना हिंदु - ना मुस्लीम, ना सिख - ना इसाई, आम्ही फक्त आणि फक्त भारतीय आहोत. सर्जिकल स्ट्राईकनंतर परत हा हल्ला झाल्याने पाकिस्तानने पुन्हा एकदा डोके वर काढल्याच दिसते. म्हणूनच त्यांना आता कायमचे संपवण्याची गरज भारतातील प्रत्येक नागरिकास वाटते आहे.- प्रशांत माळी, मु.पो. मापटेमळाता. आटपाडी, जि. सांगलीपाकची कोंडी करापुलवामातील दहशतवाद्यांच्या अमानवीय, क्रूर हल्याचा मी निषेध करतो तसेच शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करतो. केवळ सर्जिकल स्ट्राईक करुन भागणार नाही. आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानची सर्व पातळ्यांवर कोंडी करुन जगापुढे त्यांना उघडे पाडावे लागेल.- साजेद खान, औरंगाबादराष्ट्रीय कायदा बनवादहशतवादाला कायदा आणि सुरक्षेच्या प्रश्नावरच केंद्रीय गुन्हा (फेडरल क्राइम) मानले गेले पाहिजे आणि हा गुन्हा रोखण्यासाठी अमेरिकेतील ‘होमलँड सेक्युरिटी अ‍ॅक्ट’च्या धर्तीवर भारतात एक सर्वसमावेशक राष्ट्रीय कायदा बनवायला हवा.- लालन शर्मा, 9673902887एक महिन्याचा पगार देतोपुलवामामध्ये झालेल्या हल्याचा मी निषेध करतो. मी एक सरकारी कर्मचारी आहे, आणि अस काही ऐकल की तळपायाची आग मस्तकात जाते. दहशतवाद्यांचा बीमोड करण्यासाठी मी माझी एक महिन्याचा पगार द्यायला तयार आहे. देशाचे पंतप्रधान एक धाडसी निर्णय घेतील आणि त्यांना सडेतोड उत्तर देतील अशी मला अपेक्षा आहे.- उदेश पवार, (वाहतूक नियंत्रण) नवी मुंबई महानगर पालिकाना मंदिर, ना आरक्षण चाहिये, ना १५ लाख चाहीये, बस मोदीजी अब ४० के बदले ४०० चाहिये.- अरविंद जाधव, खडका, घनसावंगी, जि.जालना

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाLokmatलोकमतMartyrशहीद