शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
2
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
3
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
4
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
5
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
6
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
7
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
8
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
9
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
10
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
11
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
12
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
13
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
14
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
15
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
16
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
17
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
18
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
19
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
20
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई

Pulwama Attack :काश्मिरी तरुणांंचे प्रबोधन गरजेचे, सांगताहेत 'वाचकांची पत्रे'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2019 05:12 IST

दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सीआरपीएफचे ४९ जवान शहीद झाले आणि अवघा देश सुन्न झाला.

दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सीआरपीएफचे ४९ जवान शहीद झाले आणि अवघा देश सुन्न झाला. याच अनुषंगाने ‘कसा करावा दहशतवादाचा बीमोड’ या विषयावर ‘लोकमत’ने वाचकांकडून प्रतिक्रिया मागविल्या होत्या. अवघ्या दोन दिवसांत पत्रांचा अक्षरक्ष: पाऊस पडला. यावरूनच देशवासीयांच्या तीव्र भावनांची कल्पना येते. या अमानवी हल्ल्याबाबत दु:ख व्यक्त करतानाच लोकांनी आपल्या मनातील संतापाला वाट मोकळी करून दिली आहे. अनेक जणांनी पाकिस्तानचा बदला घ्या, दहशतवाद्यांना ठेचून काढा, असे म्हटले आहे. तर आंतरराष्ट्रीय स्तरावर आर्थिक कोंडी करून पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा उघडा पाडावा, असे काहींना वाटते. महत्त्वाचे म्हणजे, शहीद जवानांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी ठाम उभे असल्याची ग्वाही देताना, तेथे कर माझे जुळती... ही भावना सर्वांचीच आहे!

काश्मिरी तरुणांंचे प्रबोधन गरजेचेदहशतवादी हल्ले रोखण्यासाठी केवळ सर्जिकल स्ट्राइक किंवा युद्ध हे उत्तर नसून काश्मीरमधील देशविरोधी कारवाया करणाऱ्या तरुणांना त्यापासून परावृत्त करणे आवश्यक आहे. यासाठी सर्वप्रथम काश्मीरचा विशेष दर्जा रद्द करायला हवा. जेणेकरून काश्मीरमध्ये इतर ठिकाणच्या भारतीयांना तेथे स्थावर मालमत्ता खरेदी करता येईल. या माध्यमातून निर्माण होणाºया संपर्कातून तेथील तरुणांच्या मनात इतर भारतीयांबद्दल असलेला चुकीचा समज दूर होऊ शकेल. काश्मिरी तरुणांच्या वैचारिक परिवर्तनावर भर द्यावा. केवळ युद्धानेही हा प्रश्न सुटणारा नाही. जैश-ए-मोहम्मद संघटनेचा मुख्य संस्थापक मौलान मसूद अजहरला जागतिक दहशतवादी जाहीर करण्यास चीनचाही नकार आहे. म्हणूनच पाक व चीनच्या बाबतीत सावधगिरीने पावले उचलणे गरजेचे आहे.- अ‍ॅड. उज्ज्वल निकम, राज्याचे विशेष सरकारी वकील.

पाकला सर्व बाजूंनी घेरा...

या हल्ल्याने आता नवा कडवा अध्याय सुरू झाला आहे. भारतात येऊ घातलेल्या निवडणुकांचा विचार करुन नियोजनपूर्वक हा हल्ला केला गेला आहे. रॉला आता अधिक मोकळीक देऊन मौलाना मसूद वा जैशच्या मुख्यालयावर हल्ला झाला पाहिजे.आताच पाकला सर्व बाजुंनी नाही घेरले तर हे युद्ध आपल्याला असेच अनेक दशके खेळावे लागेल.- कर्नल श्री. खासगीवाले, नाशिककारागृहांतील दहशतवाद्यांना गोळ्या घालाभारतातील कारागृहांमध्ये बंदिस्त असलेल्या सर्व दहशतवाद्यांना गोळ्या घाला. आपण भरतीय संयम, शांतता आणि विचारीपणाने वागतो त्याचा गैरफायदा पाकिस्तान वारंवार घेतो. या हल्ल्यानंतर उलट जबरदस्त प्रत्युत्तर करून त्यांना त्यांची औकात दाखवून द्यावी.- युनूस मेमन,घाटंजी, यवतमाळपरिवर्तन करावे

काश्मिरमधील दहशतवाद, हा राजकारणाबरोबरच धार्मिक तसेच सांस्कृतिक कारणांशी निगडीत आहे. स्थानिक प्रभावी नेतेमंडळींना एकत्र करुन तसेच धार्मिक तत्त्वज्ञ, विचारवंत यांना सोबत घेऊन स्थानिक तरुणांचे वैचारिक परिवर्तन घडविले पाहिजे. त्यांच्यासाठी अर्थाजनाची नवनवीन साधने उपलब्ध करावीत, शैक्षणिक सुविधा वाढवाव्यात. हा प्रश्न केवळ युद्ध करुन संपुष्टात येणार नाही, याची जाणीव ठेवावी.- प्रा. डॉ. बी. आर. सोनावणे, वडेल, मालेगाव, जि. नाशिक.निवडणुका उधळण्याचे षड्यंत्रपुलवामामधील दहशतवाद्यांचा हल्ला म्हणजे भारतात होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुका उधळून लावण्याच्या षडयंत्राचा एक भाग वाटतो. आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानची आर्थिक कोंडी केली पाहिजे. असहकाराची वज्रमूठ घट्ट केल्यास दहशतवाद्यांचे नक्कीच धाबे दणाणेल.- गंगारेड्डी बोडखे, वणी, यवतमाळकीड खोडात, फवारणी पानांवर नकोस्थानिक लोकांच्या सहभागाशिवाय इतकं जबरदस्त प्लॅनिंग होऊच शकत नाही. कीड खोडातच आहे पानांवर वरवर फवारणी काय फायद्याची? सैन्यावर दगड उगारणाऱ्या गोळी घालायची परवानगी सैन्याला द्यावी. काश्मीर हा भारताचाच अविभाज्य भाग आहे, हे तेथील माथेफिरूना ठणकावून सांगायची वेळ आली आहे.- बलभीम दहिफळे, चिखली, ता. अहमदपूर, जि. लातूरदहशतवाद निर्मूलन अभ्यासक्रम हवा

शैक्षणिक अभ्यासक्रमात ‘दहशतवाद निर्मूलन’ या विषयाचा समावेश करावा. जेणेकरून योग्य वयातच दहशतवादाचा राक्षसी चेहरा मुला-मुलींना समजेल. सातत्याने प्रबोधन झाल्यास दहशतवादाला आळा बसेल. दहशतवादी नव्हे तर त्यांचे विचार मारून दहशतवाद संपेल.- निकिता जाधव, रावेत शिंदेवस्ती-हवेली, जि. पुणे.

 

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाMartyrशहीद