शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
2
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
3
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
4
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
5
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
6
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
7
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
8
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
9
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
10
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
11
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
12
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
13
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
14
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
15
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
16
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
17
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
18
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
19
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
20
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
Daily Top 2Weekly Top 5

Pulwama Attack :काश्मिरी तरुणांंचे प्रबोधन गरजेचे, सांगताहेत 'वाचकांची पत्रे'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2019 05:12 IST

दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सीआरपीएफचे ४९ जवान शहीद झाले आणि अवघा देश सुन्न झाला.

दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सीआरपीएफचे ४९ जवान शहीद झाले आणि अवघा देश सुन्न झाला. याच अनुषंगाने ‘कसा करावा दहशतवादाचा बीमोड’ या विषयावर ‘लोकमत’ने वाचकांकडून प्रतिक्रिया मागविल्या होत्या. अवघ्या दोन दिवसांत पत्रांचा अक्षरक्ष: पाऊस पडला. यावरूनच देशवासीयांच्या तीव्र भावनांची कल्पना येते. या अमानवी हल्ल्याबाबत दु:ख व्यक्त करतानाच लोकांनी आपल्या मनातील संतापाला वाट मोकळी करून दिली आहे. अनेक जणांनी पाकिस्तानचा बदला घ्या, दहशतवाद्यांना ठेचून काढा, असे म्हटले आहे. तर आंतरराष्ट्रीय स्तरावर आर्थिक कोंडी करून पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा उघडा पाडावा, असे काहींना वाटते. महत्त्वाचे म्हणजे, शहीद जवानांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी ठाम उभे असल्याची ग्वाही देताना, तेथे कर माझे जुळती... ही भावना सर्वांचीच आहे!

काश्मिरी तरुणांंचे प्रबोधन गरजेचेदहशतवादी हल्ले रोखण्यासाठी केवळ सर्जिकल स्ट्राइक किंवा युद्ध हे उत्तर नसून काश्मीरमधील देशविरोधी कारवाया करणाऱ्या तरुणांना त्यापासून परावृत्त करणे आवश्यक आहे. यासाठी सर्वप्रथम काश्मीरचा विशेष दर्जा रद्द करायला हवा. जेणेकरून काश्मीरमध्ये इतर ठिकाणच्या भारतीयांना तेथे स्थावर मालमत्ता खरेदी करता येईल. या माध्यमातून निर्माण होणाºया संपर्कातून तेथील तरुणांच्या मनात इतर भारतीयांबद्दल असलेला चुकीचा समज दूर होऊ शकेल. काश्मिरी तरुणांच्या वैचारिक परिवर्तनावर भर द्यावा. केवळ युद्धानेही हा प्रश्न सुटणारा नाही. जैश-ए-मोहम्मद संघटनेचा मुख्य संस्थापक मौलान मसूद अजहरला जागतिक दहशतवादी जाहीर करण्यास चीनचाही नकार आहे. म्हणूनच पाक व चीनच्या बाबतीत सावधगिरीने पावले उचलणे गरजेचे आहे.- अ‍ॅड. उज्ज्वल निकम, राज्याचे विशेष सरकारी वकील.

पाकला सर्व बाजूंनी घेरा...

या हल्ल्याने आता नवा कडवा अध्याय सुरू झाला आहे. भारतात येऊ घातलेल्या निवडणुकांचा विचार करुन नियोजनपूर्वक हा हल्ला केला गेला आहे. रॉला आता अधिक मोकळीक देऊन मौलाना मसूद वा जैशच्या मुख्यालयावर हल्ला झाला पाहिजे.आताच पाकला सर्व बाजुंनी नाही घेरले तर हे युद्ध आपल्याला असेच अनेक दशके खेळावे लागेल.- कर्नल श्री. खासगीवाले, नाशिककारागृहांतील दहशतवाद्यांना गोळ्या घालाभारतातील कारागृहांमध्ये बंदिस्त असलेल्या सर्व दहशतवाद्यांना गोळ्या घाला. आपण भरतीय संयम, शांतता आणि विचारीपणाने वागतो त्याचा गैरफायदा पाकिस्तान वारंवार घेतो. या हल्ल्यानंतर उलट जबरदस्त प्रत्युत्तर करून त्यांना त्यांची औकात दाखवून द्यावी.- युनूस मेमन,घाटंजी, यवतमाळपरिवर्तन करावे

काश्मिरमधील दहशतवाद, हा राजकारणाबरोबरच धार्मिक तसेच सांस्कृतिक कारणांशी निगडीत आहे. स्थानिक प्रभावी नेतेमंडळींना एकत्र करुन तसेच धार्मिक तत्त्वज्ञ, विचारवंत यांना सोबत घेऊन स्थानिक तरुणांचे वैचारिक परिवर्तन घडविले पाहिजे. त्यांच्यासाठी अर्थाजनाची नवनवीन साधने उपलब्ध करावीत, शैक्षणिक सुविधा वाढवाव्यात. हा प्रश्न केवळ युद्ध करुन संपुष्टात येणार नाही, याची जाणीव ठेवावी.- प्रा. डॉ. बी. आर. सोनावणे, वडेल, मालेगाव, जि. नाशिक.निवडणुका उधळण्याचे षड्यंत्रपुलवामामधील दहशतवाद्यांचा हल्ला म्हणजे भारतात होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुका उधळून लावण्याच्या षडयंत्राचा एक भाग वाटतो. आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानची आर्थिक कोंडी केली पाहिजे. असहकाराची वज्रमूठ घट्ट केल्यास दहशतवाद्यांचे नक्कीच धाबे दणाणेल.- गंगारेड्डी बोडखे, वणी, यवतमाळकीड खोडात, फवारणी पानांवर नकोस्थानिक लोकांच्या सहभागाशिवाय इतकं जबरदस्त प्लॅनिंग होऊच शकत नाही. कीड खोडातच आहे पानांवर वरवर फवारणी काय फायद्याची? सैन्यावर दगड उगारणाऱ्या गोळी घालायची परवानगी सैन्याला द्यावी. काश्मीर हा भारताचाच अविभाज्य भाग आहे, हे तेथील माथेफिरूना ठणकावून सांगायची वेळ आली आहे.- बलभीम दहिफळे, चिखली, ता. अहमदपूर, जि. लातूरदहशतवाद निर्मूलन अभ्यासक्रम हवा

शैक्षणिक अभ्यासक्रमात ‘दहशतवाद निर्मूलन’ या विषयाचा समावेश करावा. जेणेकरून योग्य वयातच दहशतवादाचा राक्षसी चेहरा मुला-मुलींना समजेल. सातत्याने प्रबोधन झाल्यास दहशतवादाला आळा बसेल. दहशतवादी नव्हे तर त्यांचे विचार मारून दहशतवाद संपेल.- निकिता जाधव, रावेत शिंदेवस्ती-हवेली, जि. पुणे.

 

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाMartyrशहीद