शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
9
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
10
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
11
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
12
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
13
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
14
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
15
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
16
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
17
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
18
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
19
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
20
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  

महागाईचा भ़डका! सामान्यांच्या ताटातून गायब होऊ शकते डाळ; दरात तब्बल 16 टक्क्यांची वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2022 16:49 IST

Pulses Price Hike : महागाईच्या सामना करणाऱ्या जनतेला सध्या तरी दिलासा मिळण्याची कोणतीच आशा दिसत नाही.

नवी दिल्ली - सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागली असून महागाईचा आता भडका उडाला आहे. पेट्रोल, डिझेलसह आता साबण, कॉफी, मॅगीसह अनेक जीवनावश्यक असलेल्या वस्तुंचे भाव वाढत आहेत. महागाईचा सामना करणाऱ्या जनतेला सध्या तरी दिलासा मिळण्याची कोणतीच आशा दिसत नाही. कारण येणाऱ्या दिवसांत लोकांना आवश्यक असणाऱ्या सामानासाठी जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत. सामान्यांच्या ताटातून डाळ गायब होऊ शकते. कारण डाळींच्या किंमतीत 16 टक्क्यांची वाढ झाली आहे. 

आता डाळीचे दर वधारले आहेत. मागील जवळपास एका महिन्यात दाळीच्या दरात 16 टक्क्यांची वाढ झाली आहे. डाळ, भाज्या, फळांसह खाण्या-पिण्याच्या अनेक गोष्टींच्या किमतीत वाढ झाल्याने सर्वसामान्यांच्या खिशावर याचा मोठा परिणाम होणार आहे. देशात पेट्रोल - डिझेल दर वाढल्याने या खाद्यसामग्रीचे दर वाढले आहेत. त्याशिवाय शाळा, कॉलेज, हॉटेल, रेस्टोरंट ओपन झाल्याने याच्या मागणीतही वाढ झाली आहे.

मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र तूर डाळीच्या मोठ्या उत्पादकांपैकी एक आहेत. यंदा तूर डाळीचं उत्पादन 30 टक्क्यांनी कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काबूली चण्याचा भाव मागील महिन्यात 95 रुपये प्रति किलो होता, तो आता वाढून 110 रुपये प्रति किलोग्रॅम झाला आहे. चणे 5000 रुपये प्रति क्विंटल वरुन वाढून 5100 रुपये प्रति क्विंटल झाले आहेत. 

महाराष्ट्र, गुजरात, तमिळनाडू आणि कर्नाटकात तूर डाळ 6,400 ते 6,500 रुपये प्रति क्विंटल विक्री होत आहे. हा दर आधी 6,300 रुपये प्रति क्विंटल होता. केवळ डाळच नाही तर फळं आणि इतर गोष्टींच्या किमतीही वाढल्या आहेत. उन्हाळ्याच्या दिवसांत फळांच्या किंमती वाढल्या आहेत. उन्हाळ्यात फळांची मागणी वाढली असून आवक कमी आहे. त्यामुळे किमतीही वाढ झाली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Inflationमहागाई