शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
3
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
4
BCCI च्या मुंबईतील कार्यालयात चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या मालालवर मारला डल्ला
5
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
6
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
7
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
8
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
9
Asia Cup 2025 : रिषभ पंतच्या जागी अकोल्याच्या पठ्ठ्याची होऊ शकते टीम इंडियात एन्ट्री
10
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
11
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
12
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
13
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
14
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
15
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
16
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
17
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
18
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
19
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
20
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

परीक्षार्थ्यांची ओळख उघड न करता केंद्र, शहरनिहाय निकाल जाहीर करा; सर्वोच्च न्यायालयाचा नॅशनल टेस्टिंग एजन्सीला आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2024 05:48 IST

उद्या दुपारी बारा वाजेपर्यंतची मुदत

नवी दिल्ली :परीक्षार्थ्यांची ओळख उघड न करता नीट-यूजी परीक्षेचे केंद्र व शहरनिहाय निकाल येत्या शनिवारी, २० जुलै रोजी दुपारी बारा वाजेपर्यंत जाहीर करा, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने नॅशनल टेस्टिंग एजन्सीला (एनटीए) गुरुवारी दिला. गैरप्रकारांमुळे नीट-यूजीच्या संपूर्ण प्रक्रियेच्या पावित्र्यालाच धक्का लागल्याचे आढळून आले; तरच ही परीक्षा पुन्हा घेण्याचे आदेश देता येतील, असे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने सांगितले.

नीट-यूजीची ५ मे रोजी घेण्यात आलेली परीक्षा रद्द करावी, फेरपरीक्षा घेण्यात यावी; तसेच न्यायालयाच्या देखरेखीखाली परीक्षेतील गैरप्रकारांची चौकशी व्हावी, अशा मागण्या करणाऱ्या याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाल्या आहेत. त्यावर न्यायालयात २२ जुलै रोजी पुन्हा युक्तिवादाला प्रारंभ होणार आहे.

प्रश्नपत्रिका फुटण्यासह आणखी गैरप्रकार झाले असून, त्यामुळे फेरपरीक्षा घेण्याची आवश्यकता आहे. हा दावा पुराव्यांनिशी मांडावा.

प्रश्नपत्रिका फुटण्याचे प्रकरण पाटणा व हजारीबागपुरतेच मर्यादित होते, असे सकृतदर्शनी दिसत आहे. गुजरातच्या गोध्रामध्ये प्रश्नपत्रिका फुटल्याचा प्रकार घडला, असे म्हणता येणार नाही.

पैसे मिळविण्यासाठी प्रश्नपत्रिका फोडण्यात आली. त्याचे परिणाम राष्ट्रीय पातळीवर व्हावेत, असा हेतू या गैरकृत्यांमागे होता, असे दिसत नाही.

प्रश्नपत्रिका फुटण्याच्या प्रकारांचे स्वरूप व्यापक असते, तर विविध शहरांत असे प्रकार घडल्याचे व ते घडविणाऱ्यांची नावे समोर आली असती.

नियोजनबद्ध पद्धतीने प्रश्नपत्रिका फोडण्यात आली, हे याचिकाकर्त्यांनी सिद्ध करून दाखवावे.

‘त्या’ केंद्रातील परीक्षार्थींना जास्त गुण मिळाले का हे तपासायचे आहे

सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, गैरप्रकार झाल्याचे आरोप असलेल्या केंद्रांतील परीक्षार्थींना इतर केंद्रातील परीक्षार्थींपेक्षा जास्त गुण मिळाले की नाही हे तपासायचे आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची ओळख उघड न करता केंद्रनिहाय निकाल जाहीर करण्याचा आदेश दिला.

एखाद्याकडे डमी रोल नंबर असू शकतात. पण कोणत्या केंद्रात किती गुण मिळाले आहेत ही माहिती मिळायला हवी. सीबीआयने तपासाबाबत सादर केलेला स्थितीदर्शक अहवाल आपल्याला मिळाला नसल्याची याचिकादारांची तक्रार आहे.

मात्र या अहवालातील गोष्टी उघड झाल्या तर त्याचा तपासावर परिणाम होईल असे सीबीआयने सांगितले होते. त्याबद्दल न्यायालयाने म्हणाले की, आम्ही या प्रकरणाचा अत्यंत पारदर्शकपणे विचार करत आहोत. पण सीबीआयने सांगितलेला मुद्दाही महत्वाचा आहे.

पाटणा एम्सच्या चार विद्यार्थ्यांना अटक

नीट-यूजीची प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी सीबीआयने बिहारमधील पाटणा एम्सच्या चार विद्यार्थ्यांना गुरुवारी अटक केली. त्यातील तिघे हे एमबीबीएसच्या तिसऱ्या वर्षात तर एक दुसऱ्या वर्षात आहे. चौघांना बुधवारी हॉस्टेलमधील त्यांच्या रूममधून चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. या रूम सीबीआयने सील केल्या होत्या. चंदन सिंह, राहुल अनंत, कुमार शानू, करण जैन, अशी या चार विद्यार्थ्यांची नावे आहेत.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयexamपरीक्षा