शहरं
Join us  
Trending Stories
1
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
2
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
3
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
4
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
5
देशमुख-मुंडे हत्या: "...पण, महाराष्ट्र सरकार त्यांना न्याय देत नाहीये"; सुप्रिया सुळेंची अमित शाहांकडे मोठी मागणी
6
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
7
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
8
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
9
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
10
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
11
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
12
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
13
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
14
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
15
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
16
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
17
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
18
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको
19
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
20
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र

POK मध्ये स्वातंत्र्याच्या घोषणा, पाकिस्तान विरोधात जनता उतरली रस्त्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2017 10:22 IST

पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तान विरोधात नाराजी वाढत चालली असून, पाकिस्तानपासून स्वातंत्र्य मिळावे या मागणीसाठी इथे मोठा मोर्चा काढण्यात आला होता.

ठळक मुद्देभारताने नैतिकतेऐवजी लष्करी पर्याय वापरला असता तर पाकव्याप्त काश्मीर भारताचा झाला असता. पाकिस्तानपासून स्वातंत्र्य मिळावे या मागणीसाठी इथे मोठा मोर्चा काढण्यात आला होता.

जनदाली, दि. 19 - पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तान विरोधात नाराजी वाढत चालली असून, पाकिस्तानपासून स्वातंत्र्य मिळावे या मागणीसाठी इथे मोठा मोर्चा काढण्यात आला होता. जम्मू-काश्मीर नॅशनल स्टुडंट्स फेडरेशनने पीओकेच्या जनदाली भागात काढलेल्या या मोर्चामध्ये मोठया संख्येने नागरीक सहभागी झाले होते. या रॅलीला मिळालेल्या प्रतिसादातून इथल्या जनतेच्या मनात पाकिस्तानबद्दल किती रोष आहे ते दिसून येते. 

या रॅलीमध्ये पाकिस्तानकडून देण्यात येणा-या अन्याय, अत्याचारी, अमानवीय वागणुकीचा निषेध करण्यात आला तसेच पाकिस्तान विरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. जनदालीची शांतता भंग करण्यासाठी पाकिस्तानकडून इथे दहशतवादी पाठवण्यात येतात असा आरोप स्थानिक नेते लियाकत खान यांनी केला. पाकव्याप्त काश्मीरमध्ये पहिल्यांदा अशा प्रकारची रॅली निघालेली नाही. यापूर्वी मे महिन्यातही पीओकेमधील हजीरा येथील डीग्री कॉलेच्या विद्यार्थ्यांनी अशाच प्रकारे रॅली काढून पाकिस्तानचा निषेध केला होता. 

...तर पीओके भारताचा भाग झाला असता !

भारताने नैतिकतेऐवजी लष्करी पर्याय वापरला असता तर पाकव्याप्त काश्मीर भारताचा झाला असता, असे मत काही महिन्यांपूर्वी माजी हवाईदल प्रमुख एअर चीफ मार्शल अरूप राहा यांनी व्यक्त केले होते. 

देशाच्या हवाई दलाचे सामर्थ्य १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धात भारत सरकारकडून पूर्णपणे वापरले गेले नाही अशी हळहळही त्यांनी व्यक्त केली. अरूप राहा म्हणाले, पाकव्याप्त काश्मीर हा आमच्या शरीरात रुतलेला काटा आहे. भारताने सुरक्षेच्या गरजांकडे व्यावहारिक दृष्टीने बघितले नाही. आमच्या संरक्षणाच्या गरजांबाबत आमच्यावर आदर्शांनी राज्य केले. त्यामुळे आम्ही व्यावहारिक भूमिका घेतली नाही. सौहार्दाचे वातावरण राखण्यासाठी लष्करी शक्तीकडे दुर्लक्ष केले. भूतकाळात शत्रुंना अटकाव करताना लष्करी शक्ती विशेषत: हवाई दलाचे सामर्थ्य वापरण्यात भारत नाखुष होता, असे राहा म्हणाले.

अरूप राहा म्हणाले की, १९४७ मध्ये जम्मू आणि काश्मीरमध्ये टोळयांनी हल्ला केला त्यावेळी भारतीय हवाई दलाच्या वाहतूक विमानांनी भारतीय सैनिक आणि उपकरणे प्रत्यक्ष युद्धाच्या स्थळी पोहोचविण्यास मदत केली होती. आणि ज्यावेळी लष्करी उपाय नजरेच्या टप्प्यात होता, तेव्हा आपण नैतिकतेच्या गप्पा मारल्या. प्रश्न शांततेच्या मार्गांनी सुटावा म्हणून आम्ही संयुक्त राष्ट्रांत धाव घेतली. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू काश्मिर