शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
4
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
5
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
6
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
7
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
8
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
9
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
10
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
11
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
12
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
13
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
14
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
15
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
16
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
17
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
18
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
19
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
20
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

POK मध्ये स्वातंत्र्याच्या घोषणा, पाकिस्तान विरोधात जनता उतरली रस्त्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2017 10:22 IST

पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तान विरोधात नाराजी वाढत चालली असून, पाकिस्तानपासून स्वातंत्र्य मिळावे या मागणीसाठी इथे मोठा मोर्चा काढण्यात आला होता.

ठळक मुद्देभारताने नैतिकतेऐवजी लष्करी पर्याय वापरला असता तर पाकव्याप्त काश्मीर भारताचा झाला असता. पाकिस्तानपासून स्वातंत्र्य मिळावे या मागणीसाठी इथे मोठा मोर्चा काढण्यात आला होता.

जनदाली, दि. 19 - पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तान विरोधात नाराजी वाढत चालली असून, पाकिस्तानपासून स्वातंत्र्य मिळावे या मागणीसाठी इथे मोठा मोर्चा काढण्यात आला होता. जम्मू-काश्मीर नॅशनल स्टुडंट्स फेडरेशनने पीओकेच्या जनदाली भागात काढलेल्या या मोर्चामध्ये मोठया संख्येने नागरीक सहभागी झाले होते. या रॅलीला मिळालेल्या प्रतिसादातून इथल्या जनतेच्या मनात पाकिस्तानबद्दल किती रोष आहे ते दिसून येते. 

या रॅलीमध्ये पाकिस्तानकडून देण्यात येणा-या अन्याय, अत्याचारी, अमानवीय वागणुकीचा निषेध करण्यात आला तसेच पाकिस्तान विरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. जनदालीची शांतता भंग करण्यासाठी पाकिस्तानकडून इथे दहशतवादी पाठवण्यात येतात असा आरोप स्थानिक नेते लियाकत खान यांनी केला. पाकव्याप्त काश्मीरमध्ये पहिल्यांदा अशा प्रकारची रॅली निघालेली नाही. यापूर्वी मे महिन्यातही पीओकेमधील हजीरा येथील डीग्री कॉलेच्या विद्यार्थ्यांनी अशाच प्रकारे रॅली काढून पाकिस्तानचा निषेध केला होता. 

...तर पीओके भारताचा भाग झाला असता !

भारताने नैतिकतेऐवजी लष्करी पर्याय वापरला असता तर पाकव्याप्त काश्मीर भारताचा झाला असता, असे मत काही महिन्यांपूर्वी माजी हवाईदल प्रमुख एअर चीफ मार्शल अरूप राहा यांनी व्यक्त केले होते. 

देशाच्या हवाई दलाचे सामर्थ्य १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धात भारत सरकारकडून पूर्णपणे वापरले गेले नाही अशी हळहळही त्यांनी व्यक्त केली. अरूप राहा म्हणाले, पाकव्याप्त काश्मीर हा आमच्या शरीरात रुतलेला काटा आहे. भारताने सुरक्षेच्या गरजांकडे व्यावहारिक दृष्टीने बघितले नाही. आमच्या संरक्षणाच्या गरजांबाबत आमच्यावर आदर्शांनी राज्य केले. त्यामुळे आम्ही व्यावहारिक भूमिका घेतली नाही. सौहार्दाचे वातावरण राखण्यासाठी लष्करी शक्तीकडे दुर्लक्ष केले. भूतकाळात शत्रुंना अटकाव करताना लष्करी शक्ती विशेषत: हवाई दलाचे सामर्थ्य वापरण्यात भारत नाखुष होता, असे राहा म्हणाले.

अरूप राहा म्हणाले की, १९४७ मध्ये जम्मू आणि काश्मीरमध्ये टोळयांनी हल्ला केला त्यावेळी भारतीय हवाई दलाच्या वाहतूक विमानांनी भारतीय सैनिक आणि उपकरणे प्रत्यक्ष युद्धाच्या स्थळी पोहोचविण्यास मदत केली होती. आणि ज्यावेळी लष्करी उपाय नजरेच्या टप्प्यात होता, तेव्हा आपण नैतिकतेच्या गप्पा मारल्या. प्रश्न शांततेच्या मार्गांनी सुटावा म्हणून आम्ही संयुक्त राष्ट्रांत धाव घेतली. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू काश्मिर