शहरं
Join us  
Trending Stories
1
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
2
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
3
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
4
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
5
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
6
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
7
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
8
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
9
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
10
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
11
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
12
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
13
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
14
"प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर भाजपा…’’ नाना पटोले यांची टीका   
15
हा घ्या पुरावा! पाकिस्तान पुसतोय 'ऑपरेशन सिंदूर'च्या खुणा; एअर बेसवरील बिल्डिंग लाल ताडपत्रीने झाकली
16
SMAT Final 2025 : पुण्याच्या मैदानात ईशान किशनचा शानदार शो! BCCI निवडकर्त्यांसोर षटकार चौकारांचा पाऊस
17
भारताकडे BRICS चे अध्यक्षपद; जागतिक भू-राजकीय तणावात महत्वाची भूमिका बजावणार
18
३१ डिसेंबरसाठी गोव्यात जाताय? कोकण रेल्वेवर विशेष सेवा; पाहा, वेळा, थांबे अन् वेळापत्रक
19
जबरदस्त फिचर्ससह OnePlus 15R भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स!
20
रुपया ९१ च्या पार! स्वयंपाकघर ते परदेशी शिक्षणासह 'या' गोष्टी महाग होणार; 'हे' कधी थांबणार?
Daily Top 2Weekly Top 5

POK मध्ये स्वातंत्र्याच्या घोषणा, पाकिस्तान विरोधात जनता उतरली रस्त्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2017 10:22 IST

पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तान विरोधात नाराजी वाढत चालली असून, पाकिस्तानपासून स्वातंत्र्य मिळावे या मागणीसाठी इथे मोठा मोर्चा काढण्यात आला होता.

ठळक मुद्देभारताने नैतिकतेऐवजी लष्करी पर्याय वापरला असता तर पाकव्याप्त काश्मीर भारताचा झाला असता. पाकिस्तानपासून स्वातंत्र्य मिळावे या मागणीसाठी इथे मोठा मोर्चा काढण्यात आला होता.

जनदाली, दि. 19 - पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तान विरोधात नाराजी वाढत चालली असून, पाकिस्तानपासून स्वातंत्र्य मिळावे या मागणीसाठी इथे मोठा मोर्चा काढण्यात आला होता. जम्मू-काश्मीर नॅशनल स्टुडंट्स फेडरेशनने पीओकेच्या जनदाली भागात काढलेल्या या मोर्चामध्ये मोठया संख्येने नागरीक सहभागी झाले होते. या रॅलीला मिळालेल्या प्रतिसादातून इथल्या जनतेच्या मनात पाकिस्तानबद्दल किती रोष आहे ते दिसून येते. 

या रॅलीमध्ये पाकिस्तानकडून देण्यात येणा-या अन्याय, अत्याचारी, अमानवीय वागणुकीचा निषेध करण्यात आला तसेच पाकिस्तान विरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. जनदालीची शांतता भंग करण्यासाठी पाकिस्तानकडून इथे दहशतवादी पाठवण्यात येतात असा आरोप स्थानिक नेते लियाकत खान यांनी केला. पाकव्याप्त काश्मीरमध्ये पहिल्यांदा अशा प्रकारची रॅली निघालेली नाही. यापूर्वी मे महिन्यातही पीओकेमधील हजीरा येथील डीग्री कॉलेच्या विद्यार्थ्यांनी अशाच प्रकारे रॅली काढून पाकिस्तानचा निषेध केला होता. 

...तर पीओके भारताचा भाग झाला असता !

भारताने नैतिकतेऐवजी लष्करी पर्याय वापरला असता तर पाकव्याप्त काश्मीर भारताचा झाला असता, असे मत काही महिन्यांपूर्वी माजी हवाईदल प्रमुख एअर चीफ मार्शल अरूप राहा यांनी व्यक्त केले होते. 

देशाच्या हवाई दलाचे सामर्थ्य १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धात भारत सरकारकडून पूर्णपणे वापरले गेले नाही अशी हळहळही त्यांनी व्यक्त केली. अरूप राहा म्हणाले, पाकव्याप्त काश्मीर हा आमच्या शरीरात रुतलेला काटा आहे. भारताने सुरक्षेच्या गरजांकडे व्यावहारिक दृष्टीने बघितले नाही. आमच्या संरक्षणाच्या गरजांबाबत आमच्यावर आदर्शांनी राज्य केले. त्यामुळे आम्ही व्यावहारिक भूमिका घेतली नाही. सौहार्दाचे वातावरण राखण्यासाठी लष्करी शक्तीकडे दुर्लक्ष केले. भूतकाळात शत्रुंना अटकाव करताना लष्करी शक्ती विशेषत: हवाई दलाचे सामर्थ्य वापरण्यात भारत नाखुष होता, असे राहा म्हणाले.

अरूप राहा म्हणाले की, १९४७ मध्ये जम्मू आणि काश्मीरमध्ये टोळयांनी हल्ला केला त्यावेळी भारतीय हवाई दलाच्या वाहतूक विमानांनी भारतीय सैनिक आणि उपकरणे प्रत्यक्ष युद्धाच्या स्थळी पोहोचविण्यास मदत केली होती. आणि ज्यावेळी लष्करी उपाय नजरेच्या टप्प्यात होता, तेव्हा आपण नैतिकतेच्या गप्पा मारल्या. प्रश्न शांततेच्या मार्गांनी सुटावा म्हणून आम्ही संयुक्त राष्ट्रांत धाव घेतली. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू काश्मिर