शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

एअर इंडिया व्यवहारात हवी भरपाईची तरतूद; परस्पर मालमत्ता विक्रीच्या शक्यतेने टाटा समूह सावध

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2021 11:01 IST

सध्याच्या स्थितीत दोन दाव्यांत एअर इंडियाला आपल्या मालमत्ता गमवाव्या लागू शकतात.

नवी दिल्ली : एअर इंडिया खरेदी व्यवहारातील आघाडीची दावेदार कंपनी असलेल्या टाटा उद्योग समूहाकडून संभाव्य खरेदी करारात ‘भरपाईचे कलम’ घालण्याची मागणी केली जाऊ शकते, असे सूत्रांनी सांगितले.

२०२२च्या पहिल्या तिमाहीपर्यंत एअर इंडियाचा विक्री व्यवहार पूर्ण करण्याचे भारत सरकारचे उद्दिष्ट आहे. टाटा समूह आणि स्पाइसजेटचे सीईओ अजयसिंग यांच्या निविदा सरकारला मिळाल्या आहेत. टाटांनी जास्तीची बोली लावल्याने एअर इंडिया टाटांकडे जाण्याची शक्यता आहे. तथापि, एअर इंडियाच्या काही मालमत्तांवर काही कंपन्यांनी दावा सांगितल्यामुळे टाटा समूह सावध झाला आहे. त्यामुळे भविष्यात भरपाई आपणास मिळावी, अशी भूमिका समूहाने घेतली.

सध्याच्या स्थितीत दोन दाव्यांत एअर इंडियाला आपल्या मालमत्ता गमवाव्या लागू शकतात. त्यातील एक दावा देवास मल्टिमीडियाचा, तर दुसरा बहुराष्ट्रीय कंपनी केयर्न एनर्जीचा आहे. देवास आणि तिच्या सहयोगी कंपन्यांचे १.५ अब्ज डॉलर भारत सरकारकडे थकलेले आहेत. अमेरिकेतील एका जिल्हा न्यायालयात कंपनीने यासंबंधीचा खटला जिंकला आहे. केयर्न एनर्जीनेही भारत सरकार विरोधातील खटला जिंकला असून, ही रक्कम वसूल करण्यासाठी कंपनीने मालमत्ता ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यात एअर इंडियाच्या मालमत्तांचा समावेश आहे.

टॅग्स :Air Indiaएअर इंडिया