शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

एअर इंडिया व्यवहारात हवी भरपाईची तरतूद; परस्पर मालमत्ता विक्रीच्या शक्यतेने टाटा समूह सावध

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2021 11:01 IST

सध्याच्या स्थितीत दोन दाव्यांत एअर इंडियाला आपल्या मालमत्ता गमवाव्या लागू शकतात.

नवी दिल्ली : एअर इंडिया खरेदी व्यवहारातील आघाडीची दावेदार कंपनी असलेल्या टाटा उद्योग समूहाकडून संभाव्य खरेदी करारात ‘भरपाईचे कलम’ घालण्याची मागणी केली जाऊ शकते, असे सूत्रांनी सांगितले.

२०२२च्या पहिल्या तिमाहीपर्यंत एअर इंडियाचा विक्री व्यवहार पूर्ण करण्याचे भारत सरकारचे उद्दिष्ट आहे. टाटा समूह आणि स्पाइसजेटचे सीईओ अजयसिंग यांच्या निविदा सरकारला मिळाल्या आहेत. टाटांनी जास्तीची बोली लावल्याने एअर इंडिया टाटांकडे जाण्याची शक्यता आहे. तथापि, एअर इंडियाच्या काही मालमत्तांवर काही कंपन्यांनी दावा सांगितल्यामुळे टाटा समूह सावध झाला आहे. त्यामुळे भविष्यात भरपाई आपणास मिळावी, अशी भूमिका समूहाने घेतली.

सध्याच्या स्थितीत दोन दाव्यांत एअर इंडियाला आपल्या मालमत्ता गमवाव्या लागू शकतात. त्यातील एक दावा देवास मल्टिमीडियाचा, तर दुसरा बहुराष्ट्रीय कंपनी केयर्न एनर्जीचा आहे. देवास आणि तिच्या सहयोगी कंपन्यांचे १.५ अब्ज डॉलर भारत सरकारकडे थकलेले आहेत. अमेरिकेतील एका जिल्हा न्यायालयात कंपनीने यासंबंधीचा खटला जिंकला आहे. केयर्न एनर्जीनेही भारत सरकार विरोधातील खटला जिंकला असून, ही रक्कम वसूल करण्यासाठी कंपनीने मालमत्ता ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यात एअर इंडियाच्या मालमत्तांचा समावेश आहे.

टॅग्स :Air Indiaएअर इंडिया