शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

एअर इंडिया व्यवहारात हवी भरपाईची तरतूद; परस्पर मालमत्ता विक्रीच्या शक्यतेने टाटा समूह सावध

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2021 11:01 IST

सध्याच्या स्थितीत दोन दाव्यांत एअर इंडियाला आपल्या मालमत्ता गमवाव्या लागू शकतात.

नवी दिल्ली : एअर इंडिया खरेदी व्यवहारातील आघाडीची दावेदार कंपनी असलेल्या टाटा उद्योग समूहाकडून संभाव्य खरेदी करारात ‘भरपाईचे कलम’ घालण्याची मागणी केली जाऊ शकते, असे सूत्रांनी सांगितले.

२०२२च्या पहिल्या तिमाहीपर्यंत एअर इंडियाचा विक्री व्यवहार पूर्ण करण्याचे भारत सरकारचे उद्दिष्ट आहे. टाटा समूह आणि स्पाइसजेटचे सीईओ अजयसिंग यांच्या निविदा सरकारला मिळाल्या आहेत. टाटांनी जास्तीची बोली लावल्याने एअर इंडिया टाटांकडे जाण्याची शक्यता आहे. तथापि, एअर इंडियाच्या काही मालमत्तांवर काही कंपन्यांनी दावा सांगितल्यामुळे टाटा समूह सावध झाला आहे. त्यामुळे भविष्यात भरपाई आपणास मिळावी, अशी भूमिका समूहाने घेतली.

सध्याच्या स्थितीत दोन दाव्यांत एअर इंडियाला आपल्या मालमत्ता गमवाव्या लागू शकतात. त्यातील एक दावा देवास मल्टिमीडियाचा, तर दुसरा बहुराष्ट्रीय कंपनी केयर्न एनर्जीचा आहे. देवास आणि तिच्या सहयोगी कंपन्यांचे १.५ अब्ज डॉलर भारत सरकारकडे थकलेले आहेत. अमेरिकेतील एका जिल्हा न्यायालयात कंपनीने यासंबंधीचा खटला जिंकला आहे. केयर्न एनर्जीनेही भारत सरकार विरोधातील खटला जिंकला असून, ही रक्कम वसूल करण्यासाठी कंपनीने मालमत्ता ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यात एअर इंडियाच्या मालमत्तांचा समावेश आहे.

टॅग्स :Air Indiaएअर इंडिया