शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्पन्न वाढवण्याचा 'मोदी मंत्र'! पंतप्रधानांचा शेतकऱ्यांना सल्ला; ३५,४४० कोटी रुपयांच्या दोन मोठ्या योजना सुरू
2
कामगारांसाठी आनंदवार्ता! आता पीएफमधून १००% रक्कम काढता येणार, 'ईपीएफओ'चा निर्णय
3
ड्रॅगनच्या डॅम योजनेला भारत मोठी टक्कर देणार! मोदी सरकारनं तयार केला 77 बिलियन डॉलरचा 'मास्टर प्लॅन'
4
अखेर युद्ध थांबले; हमास-इस्रायल शांतता प्रस्ताव अमलात; २० इस्रायली ओलिसांची सुटका; २ हजार पॅलेस्टाइन बंदिवानही सोडले
5
खड्यांमुळे मृत्यू, तर कुटुंबाला ६ लाख भरपाई; रस्त्यांवरील खड्यांना अधिकारी, कंत्राटदार जबाबदार : उच्च न्यायालय
6
चंद्रशेखरन यांच्या नेतृत्वावर पुन्हा विश्वास; टाटा समूहाचा निवृत्ती धोरणापलीकडचा विचार; टाटा सन्सची मंजुरी अपेक्षित
7
"मी युद्ध सोडवण्यात तज्ज्ञ..." पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमा वादावर ट्रम्प यांचं भाष्य!
8
अभ्यासाला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, असं आहे वेळापत्रक 
9
राज्यासमोर मोठं संकट! जगभरात थैमान घालणाऱ्या आजाराचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ
10
SA W vs BAN W : निर्णायक षटकात अख्तरची धुलाई; रंगतदार सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं मारली बाजी
11
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकत्रित लढणार!
12
४८ तासात 'सोनेरी सफर'च्या दोन घटना उघड , रेल्वेच्या तपास यंत्रणा खडबडून जाग्या 
13
डिस्काउंटचा धमाका! १० हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळतायेत 'हे' जबरदस्त फोन
14
६००० रुपयांचा बोनस आणि...; एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी तिप्पट गोड!
15
Video: आधी कानाखाली मारल्या, नंतर धरली मान; मॅच सुरू असतानाच स्टेडियमध्ये 'बाई, काय हा प्रकार'
16
ठाणे-वसईकरांचे हाल! घोडबंदर मार्गावर चार-चार तास वाहतूक कोंडी
17
पाकिस्तानात शरणार्थी, मशिदीतून शिक्षणाची सुरुवात; तालिबानी परराष्ट्रमंत्री मुत्ताकी किती शिक्षित आहेत? जाणून घ्या...
18
ईतवारी एक्सप्रेसमध्ये सापडले सोन्याचे घबाड, एकाला अटक; साडेतीन कोटींचे सोने जप्त!
19
उल्हासनगर भाजपाकडून पाणी टंचाई विरोधात मोर्चा; योगेश म्हात्रे यांच्याकडून आत्महत्येचा प्रश्न 
20
"शेतकरी पॅकेज, कर्जमाफी, लाडकी बहीण या मुद्द्यांवर  महायुती सरकारकडून जनतेची फसवणूक’’, रमेश चेन्नीथला यांचा आरोप

आंदोलने मजेसाठी नसतात, लोकांचे हक्क महत्वाचे; मद्रास हायकोर्ट : पक्षाची मनमानी चालू शकत नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 06:21 IST

एका राजकीय पक्षाने आंदोलनाची परवानगी पोलिसांकडे मागितली. याआधी याच विषयावर आंदोलनास परवानगी दिली होती.

- डॉ. खुशालचंद बाहेतीलोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : आंदोलनामुळे सामान्य नागरिकांच्या मुक्त वावराच्या हक्कावर परिणाम होत असेल आणि आंदोलनामुळे परिसरातील लोकांच्या दैनंदिन जीवनात अडथळा निर्माण होत असेल तर त्याला परवानगी नाकारलीच पाहिजे म्हणत पोलिस कोठडीतील मृत्यूप्रकरणी आंदोलनास पोलिसांनी नाकारलेली परवानगी मद्रास हायकोर्टाने योग्य ठरवली. आंदोलने मजेसाठी नसतात, अशी टिप्पणीही कोर्टाने केली.

एका राजकीय पक्षाने आंदोलनाची परवानगी पोलिसांकडे मागितली. याआधी याच विषयावर आंदोलनास परवानगी दिली होती. मात्र, पक्षप्रमुखांच्या सहभागास मनाई केली होती. दुसऱ्या अर्जामध्ये पक्षप्रमुखांच्या सहभागाचा  स्पष्ट उल्लेख केला होता. पोलिसांनी आंदोलनास परवानगी नाकारली. याविरुद्ध हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली. इतर राजकीय पक्षांना परवानगी मिळाल्याचा पण त्यांना नाकारल्याचा दावा केला.

परवानगी नाकारणे का गरजेचे?पोलिसांनी उत्तरात पूर्वीच्या आंदोलनात काही वक्त्यांनी जातीय तेढ निर्माण करणारे, महिलांचा अवमान करणारे आणि भडकवणारे वक्तव्य केले होते. त्याच दिवशी मंदिराचा रथोत्सव असून तेथे बंदोबस्ताची गरज आहे. आंदोलनस्थळी आठवडी बाजार भरत असल्याने अडथळ्याची  शक्यता आहे. त्यामुळे दुसऱ्या आंदोलनास परवानगी नाकारणे आवश्यक होते असे म्हटले. लोकशाहीत निदर्शनाचा अधिकार महत्त्वाचा असला तरी नागरी सुविधा, सामाजिक शांतता आणि सार्वजनिक हित लक्षात घेऊनच आंदोलनास परवानगी दिली पाहिजे म्हणत हायकोर्टाने याचिका फेटाळली.

संविधानातील कलम १९(१) (ब) अंतर्गत नागरिकांना शांततामय आंदोलनाचा अधिकार, “वाजवी निर्बंधांखालीच” असतो. रस्ते, वाहतूक, बाजारपेठा, धार्मिक समारंभ यावर परिणाम होणार असेल तर अशा आंदोलनास परवानगी नाकारणे योग्यच आहे.न्यायमूर्ती पुगलेन्थी

टॅग्स :High Courtउच्च न्यायालय