शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

आंदोलक शेतकऱ्यांची संसद भवनावर धडक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2021 06:02 IST

तरीही शेतकरी जिद्दीने सीमेवर लढा देत आहेत.  गेल्याच आठवड्यात राष्ट्रपतींना निवेदन देऊन हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक राज्यात राज्यपालांना निवेदन दिले

विकास झाडे 

नवी दिल्ली : सात महिन्यांपासून केंद्र सरकारच्या कृषी कायद्याला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांनी सुरक्षा यंत्रणांना चकवा देत संसद भवन गाठले आणि सरकारच्या विरोेधात घोषणाबाजी केली. पोलिसांनी आंदोलक शेतकऱ्यांना ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले.

दि. २६ नोव्हेंबरपासून दिल्लीत प्रवेश करणाऱ्या टीकरी, सिंघू, गाझीपूर आदी सीमांवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. जानेवारीपासून मंत्रिगटाने शेतकऱ्यांशी चर्चा करणेही सोडून दिले आहे. कोरोनामुळे अनेक शेतकऱ्यांचा बळी गेला. कडक ऊन, पाऊस आणि थंडीही त्यांनी सहन केली आहे. केंद्र सरकारने लादलेले तिन्ही कायदे रद्द करण्यात यावे आणि एमएसपी कायदा तयार करावा या त्यांच्या प्रमुख मागण्या आहेत. शेतकऱ्यांनी २६ जानेवारी रोजी संसदेवर धडक देण्याचा प्रयत्न केला. यात त्यांची पोलिसांसोबत चकमक झाली. अनेक शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. हे आंदोलन उधळून लावण्याचा प्रयत्न झाला.

तरीही शेतकरी जिद्दीने सीमेवर लढा देत आहेत.  गेल्याच आठवड्यात राष्ट्रपतींना निवेदन देऊन हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक राज्यात राज्यपालांना निवेदन दिले; परंतु त्यावर अद्याप कोणतीही कार्यवाही न झाल्याने शेतकऱ्यांचे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा संयुक्त किसान आघाडीने निर्णय घेतला. त्याचाच एक भाग म्हणून शेतकऱ्यांनी संसद भवनावर धडक दिली. शेतकऱ्यांनी शुक्रवारी सकाळी साडेआठच्या सुमारास संसद भवन गाठले आणि केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी सुरू केली. हे शेतकरी सिंघू सीमेवरून आले होते. 

टॅग्स :FarmerशेतकरीParliamentसंसद