शहरं
Join us  
Trending Stories
1
डोळ्यांत ओला दुष्काळ! मायबाप सरकार, माझं कसं होणार? कुटुंब काय खाणार?; आसवांचा महापूर
2
आजचे राशीभविष्य- २४ सप्टेंबर २०२५, अविवाहितांचे विवाह ठरतील; नोकरी- व्यवसायात उत्पन्न वाढेल
3
ICC Suspends USA Cricket :आयसीसीनं अमेरिकेच्या क्रिकेट संघाला केलं निलंबित; जाणून घ्या कारण
4
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी देणार २,२१५ काेटी; राज्य सरकारने घेतला नुकसानीचा आढावा
5
Asia Cup 2025 : टॉपर श्रीलंकेचा सुपर फोरमध्ये फ्लॉप शो! पाक जिंकले तरी OUT होण्याचा धोका; ते कसं?
6
६ कोटींच्या हुंड्यासाठी विवाहितेचा छळ अन् गर्भपात; माहीम पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल
7
सरकारमान्य दरांना ठेंगा! ओला, उबरकडून मनमानी; RTO लायसन्स रद्द करण्याचा इशारा हवेतच
8
नवी मुंबईतून डिसेंबरपासून देश-विदेशसाठी करा उड्डाण; नव्या विमानतळाची ९ कोटी प्रवासी क्षमता
9
कोकणात जाणारी रो-रो सेवा ऑक्टोबरपासून; साडे पाच तासांत सिंधुदुर्ग गाठता येणार, दर किती? पाहा
10
...अन्यथा नगरपरिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांवर कारवाई; कुळगाव बदलापूरप्रकरणी उच्च न्यायालयाचा इशारा
11
कुजबुज! जनता रस्त्यावर उतरताच मतावर डोळा ठेवून ठाण्यातील सर्वपक्षीय नेत्यांना जागा आली का?
12
हॉटेलमध्ये रंगला हत्येचा थरार! प्रियकरानं आधी प्रेयसीला संपवले, त्यानंतर स्वत:चाही घेतला जीव
13
IND vs PAK: पाकिस्तानच्या 'चिल्लर पार्टी'ला हरभजनचा इशारा, म्हणाला- थोडे मोठे व्हा नि मग...
14
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
15
भारताने जिंकलेल्या १९८३ वर्ल्डकप फायनलमधील पंच डिकी बर्ड यांचे ९२व्या वर्षी निधन
16
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
17
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
18
GST कपातीनंतर आता एवढी स्वस्त झालीय ५ स्टार रेटिंग असलेली Tata Punch; जाणून घ्या, कोण कोणत्या कारला देते टक्कर?
19
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
20
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."

आंदोलक शेतकऱ्यांची संसद भवनावर धडक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2021 06:02 IST

तरीही शेतकरी जिद्दीने सीमेवर लढा देत आहेत.  गेल्याच आठवड्यात राष्ट्रपतींना निवेदन देऊन हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक राज्यात राज्यपालांना निवेदन दिले

विकास झाडे 

नवी दिल्ली : सात महिन्यांपासून केंद्र सरकारच्या कृषी कायद्याला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांनी सुरक्षा यंत्रणांना चकवा देत संसद भवन गाठले आणि सरकारच्या विरोेधात घोषणाबाजी केली. पोलिसांनी आंदोलक शेतकऱ्यांना ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले.

दि. २६ नोव्हेंबरपासून दिल्लीत प्रवेश करणाऱ्या टीकरी, सिंघू, गाझीपूर आदी सीमांवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. जानेवारीपासून मंत्रिगटाने शेतकऱ्यांशी चर्चा करणेही सोडून दिले आहे. कोरोनामुळे अनेक शेतकऱ्यांचा बळी गेला. कडक ऊन, पाऊस आणि थंडीही त्यांनी सहन केली आहे. केंद्र सरकारने लादलेले तिन्ही कायदे रद्द करण्यात यावे आणि एमएसपी कायदा तयार करावा या त्यांच्या प्रमुख मागण्या आहेत. शेतकऱ्यांनी २६ जानेवारी रोजी संसदेवर धडक देण्याचा प्रयत्न केला. यात त्यांची पोलिसांसोबत चकमक झाली. अनेक शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. हे आंदोलन उधळून लावण्याचा प्रयत्न झाला.

तरीही शेतकरी जिद्दीने सीमेवर लढा देत आहेत.  गेल्याच आठवड्यात राष्ट्रपतींना निवेदन देऊन हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक राज्यात राज्यपालांना निवेदन दिले; परंतु त्यावर अद्याप कोणतीही कार्यवाही न झाल्याने शेतकऱ्यांचे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा संयुक्त किसान आघाडीने निर्णय घेतला. त्याचाच एक भाग म्हणून शेतकऱ्यांनी संसद भवनावर धडक दिली. शेतकऱ्यांनी शुक्रवारी सकाळी साडेआठच्या सुमारास संसद भवन गाठले आणि केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी सुरू केली. हे शेतकरी सिंघू सीमेवरून आले होते. 

टॅग्स :FarmerशेतकरीParliamentसंसद