शहरं
Join us  
Trending Stories
1
बँक चौकात रात्रीतून उभा केला सावित्रीबाई फुलेंचा पुतळा; जयंतीच्या पूर्वसंध्येलाच रंगले नाट्य!
2
Mira-Bhayandar: मीरा भाईंदरमध्ये ९५ जागांसाठी ४३५ उमेदवारांत चुरस; भाजपात नाराजीचा सूर कायम!
3
Nagpur: काँग्रेसमध्ये 'ऑल वेल', पण भाजपची डोकेदुखी वाढली; ६ बंडखोरांचा माघार घेण्यास नकार!
4
Sanjay Raut: "लोकशाहीच्या नावानं झुंडशाही सुरू" बिनविरोध निवडीवरून राऊत संतापले, दिला महत्त्वाचा इशारा!
5
Eknath Shinde: महायुतीचे उमेदवार कशामुळं बिनविरोध निवडून आले? एकनाथ शिंदेंनी सांगितलं त्यामागचं खरं कारण!
6
Obscene Content: अश्लील कंटेंटवरून सरकारचा एलन मस्क यांना इशारा, ७२ तासांत मागितला अहवाल!
7
मतदानापूर्वीच महायुतीचं अर्धशतक! कोणत्या महापालिकेत किती उमेदवार बिनविरोध विजयी झाले? वाचा यादी
8
T20 World Cup 2026: क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर, बेबी एबी; दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ
9
महापालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट! ७८ जागांवर ३८१ उमेदवार, अनेक प्रभागात चौरंगी-बहुरंगी लढत
10
"मुंबईचे लुटारू तुम्ही, रखवालदार आम्ही"; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता जहरी टीका
11
पनवेल महानगरपालिकेत मतदानाआधीच विजयाचा गुलाल, महायुतीचे तब्बल सात नगरसेवक बिनविरोध
12
Solapur BJP: सोलापुरात भाजपच्या दोन गटांत मोठा राडा, माजी नगरसेवकाचं कार्यालय फोडलं, नेमका वाद काय?
13
महाराष्ट्रात फक्त मराठीच सक्तीची, साहित्य संमेलनातून मुख्यमंत्र्यांचा स्पष्ट संदेश 
14
"...तर निकाल वेगळा लागला असता"; ठाकरे बंधू युतीवर देवेंद्र फडणवीसांनी मतांचं 'गणित' उलगडलं
15
Shreyas Iyerचे न्यूझीलंडविरूद्ध Team India मध्ये पुनरागमन शक्य, पण BCCIने ठेवली 'ही' एक अट
16
'राहुल गांधी अन् भारत विरोधी लॉबी...', उमर खालिदसाठी आलेल्या 'त्या' पत्रांवरुन भाजपची टीका
17
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांची फोनाफोनी; कुणाशी आणि काय बोलले स्वतःच सांगितलं!
18
मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि तो मराठीच असेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट
19
आदित्य-अमित ठाकरेंकडून जाहीरनामा प्रसिद्ध; ७०० फुटांपर्यंत घरपट्टी माफ, महिलांना १५०० रुपये स्वाभिमान निधी
20
R Ashwin: "यंदाचा टी-२० विश्वचषक कोणीही पाहणार नाही"; रविचंद्रन अश्विन असं का म्हणाला?
Daily Top 2Weekly Top 5

आंदोलक शेतकऱ्यांची संसद भवनावर धडक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2021 06:02 IST

तरीही शेतकरी जिद्दीने सीमेवर लढा देत आहेत.  गेल्याच आठवड्यात राष्ट्रपतींना निवेदन देऊन हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक राज्यात राज्यपालांना निवेदन दिले

विकास झाडे 

नवी दिल्ली : सात महिन्यांपासून केंद्र सरकारच्या कृषी कायद्याला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांनी सुरक्षा यंत्रणांना चकवा देत संसद भवन गाठले आणि सरकारच्या विरोेधात घोषणाबाजी केली. पोलिसांनी आंदोलक शेतकऱ्यांना ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले.

दि. २६ नोव्हेंबरपासून दिल्लीत प्रवेश करणाऱ्या टीकरी, सिंघू, गाझीपूर आदी सीमांवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. जानेवारीपासून मंत्रिगटाने शेतकऱ्यांशी चर्चा करणेही सोडून दिले आहे. कोरोनामुळे अनेक शेतकऱ्यांचा बळी गेला. कडक ऊन, पाऊस आणि थंडीही त्यांनी सहन केली आहे. केंद्र सरकारने लादलेले तिन्ही कायदे रद्द करण्यात यावे आणि एमएसपी कायदा तयार करावा या त्यांच्या प्रमुख मागण्या आहेत. शेतकऱ्यांनी २६ जानेवारी रोजी संसदेवर धडक देण्याचा प्रयत्न केला. यात त्यांची पोलिसांसोबत चकमक झाली. अनेक शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. हे आंदोलन उधळून लावण्याचा प्रयत्न झाला.

तरीही शेतकरी जिद्दीने सीमेवर लढा देत आहेत.  गेल्याच आठवड्यात राष्ट्रपतींना निवेदन देऊन हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक राज्यात राज्यपालांना निवेदन दिले; परंतु त्यावर अद्याप कोणतीही कार्यवाही न झाल्याने शेतकऱ्यांचे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा संयुक्त किसान आघाडीने निर्णय घेतला. त्याचाच एक भाग म्हणून शेतकऱ्यांनी संसद भवनावर धडक दिली. शेतकऱ्यांनी शुक्रवारी सकाळी साडेआठच्या सुमारास संसद भवन गाठले आणि केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी सुरू केली. हे शेतकरी सिंघू सीमेवरून आले होते. 

टॅग्स :FarmerशेतकरीParliamentसंसद