शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

आंदोलक शेतकरी अखेर घरी परतण्यास तयार; बहुतांश मागण्या सरकारकडून मान्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2021 08:23 IST

संयुक्त किसान मोर्चाच्या बैठकीत आज निर्णय 

शरद गुप्तानवी दिल्ली : मागील एक वर्षासून सुरु असलेले शेतकऱ्यांचे आंदोलन सन्मानजनक पद्धतीने संपावे यासाठी केंद्र सरकारने एक-दोन मुद्दे वगळता शेतकऱ्यांच्या बहुतांश मागण्या मान्य केल्या आहेत. बहुसंख्य शेतकरी आंदोलन मागे घ्यायला तयार आहेत. परंतु संयुक्त किसान मोर्चा बुधवारी होणार असलेल्या बैठकीत याबाबत  निर्णय घेणार आहे. 

सरकारने शेतकऱी नेत्यांशी बोलणी करण्याची जबाबदारी गृहमंत्री अमित शहा यांच्यावर सोपविली आहे. गृहमंत्रालयाने मंगळवारी शेतकऱ्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना मुद्देसूद उत्तरे दिली. आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांवर दाखल केलेले खटले कायमस्वरूपी मागे घेणे तसेच या दरम्यान मरण पावलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना भरपाई देण्यासाठी सरकार तयार आहे. पंजाब सरकारने शेतकऱ्यांना भरपाई देण्याबाबत आधीच घोषणा केली आहे. हरयाणा, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमधील भाजपची सरकारेही यासाठी तयार आहेत. केंद्र सरकारही भरपाईपोटी काही रक्कम देऊ शकते. 

केवळ गृह राज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी सरकारने मान्य केलेली नाही. शेतकऱ्यांची विजेची बिले माफ करण्यासंदर्भातही सरकारने कोणतेही आश्वासन दिलेले नाही. शेतमालाला किमान हमीभावाच्या मागणीला कायद्याच्या चौकटीत कसे बसवायचे याची जबाबदारी सरकार आणि शेतकरी नेत्यांच्या संयुक्त समितीवर सोपवण्यास शेतकरी तयार आहेत. या समितीची अहवाल येण्यास वेळ लागणार आहे. त्याआधीच शेतकऱ्यांनी आपले आंदोलन मागे घ्यावे, या दिशेने सरकारचे प्रयत्न सुरु आहेत. शेतकऱ्यांची पुढची बैठक निर्णायक ठरो आणि पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांच्या आधीच हे आंदोलन मिटावे, अशी सरकारची इच्छा आहे. पंजाब, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमधील शेतकरी स्वत: आपापल्या गावाला परतू लागले आहेत. सरकारला वाटते की शेतकऱ्यांनी आनंदाने आपापल्या घरी परतावे ज्यामुळे भाजपला निवडणुकीत लाभ मिळू शकेल.

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलन