शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

आंदोलक शेतकरी अखेर घरी परतण्यास तयार; बहुतांश मागण्या सरकारकडून मान्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2021 08:23 IST

संयुक्त किसान मोर्चाच्या बैठकीत आज निर्णय 

शरद गुप्तानवी दिल्ली : मागील एक वर्षासून सुरु असलेले शेतकऱ्यांचे आंदोलन सन्मानजनक पद्धतीने संपावे यासाठी केंद्र सरकारने एक-दोन मुद्दे वगळता शेतकऱ्यांच्या बहुतांश मागण्या मान्य केल्या आहेत. बहुसंख्य शेतकरी आंदोलन मागे घ्यायला तयार आहेत. परंतु संयुक्त किसान मोर्चा बुधवारी होणार असलेल्या बैठकीत याबाबत  निर्णय घेणार आहे. 

सरकारने शेतकऱी नेत्यांशी बोलणी करण्याची जबाबदारी गृहमंत्री अमित शहा यांच्यावर सोपविली आहे. गृहमंत्रालयाने मंगळवारी शेतकऱ्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना मुद्देसूद उत्तरे दिली. आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांवर दाखल केलेले खटले कायमस्वरूपी मागे घेणे तसेच या दरम्यान मरण पावलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना भरपाई देण्यासाठी सरकार तयार आहे. पंजाब सरकारने शेतकऱ्यांना भरपाई देण्याबाबत आधीच घोषणा केली आहे. हरयाणा, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमधील भाजपची सरकारेही यासाठी तयार आहेत. केंद्र सरकारही भरपाईपोटी काही रक्कम देऊ शकते. 

केवळ गृह राज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी सरकारने मान्य केलेली नाही. शेतकऱ्यांची विजेची बिले माफ करण्यासंदर्भातही सरकारने कोणतेही आश्वासन दिलेले नाही. शेतमालाला किमान हमीभावाच्या मागणीला कायद्याच्या चौकटीत कसे बसवायचे याची जबाबदारी सरकार आणि शेतकरी नेत्यांच्या संयुक्त समितीवर सोपवण्यास शेतकरी तयार आहेत. या समितीची अहवाल येण्यास वेळ लागणार आहे. त्याआधीच शेतकऱ्यांनी आपले आंदोलन मागे घ्यावे, या दिशेने सरकारचे प्रयत्न सुरु आहेत. शेतकऱ्यांची पुढची बैठक निर्णायक ठरो आणि पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांच्या आधीच हे आंदोलन मिटावे, अशी सरकारची इच्छा आहे. पंजाब, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमधील शेतकरी स्वत: आपापल्या गावाला परतू लागले आहेत. सरकारला वाटते की शेतकऱ्यांनी आनंदाने आपापल्या घरी परतावे ज्यामुळे भाजपला निवडणुकीत लाभ मिळू शकेल.

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलन