शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
2
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
3
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
4
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
5
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
6
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
7
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
8
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
9
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
10
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
11
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
12
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
13
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
14
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
15
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
16
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
17
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
18
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
19
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, न्याय विभागाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
20
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
Daily Top 2Weekly Top 5

आंदोलक शेतकरी अखेर घरी परतण्यास तयार; बहुतांश मागण्या सरकारकडून मान्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2021 08:23 IST

संयुक्त किसान मोर्चाच्या बैठकीत आज निर्णय 

शरद गुप्तानवी दिल्ली : मागील एक वर्षासून सुरु असलेले शेतकऱ्यांचे आंदोलन सन्मानजनक पद्धतीने संपावे यासाठी केंद्र सरकारने एक-दोन मुद्दे वगळता शेतकऱ्यांच्या बहुतांश मागण्या मान्य केल्या आहेत. बहुसंख्य शेतकरी आंदोलन मागे घ्यायला तयार आहेत. परंतु संयुक्त किसान मोर्चा बुधवारी होणार असलेल्या बैठकीत याबाबत  निर्णय घेणार आहे. 

सरकारने शेतकऱी नेत्यांशी बोलणी करण्याची जबाबदारी गृहमंत्री अमित शहा यांच्यावर सोपविली आहे. गृहमंत्रालयाने मंगळवारी शेतकऱ्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना मुद्देसूद उत्तरे दिली. आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांवर दाखल केलेले खटले कायमस्वरूपी मागे घेणे तसेच या दरम्यान मरण पावलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना भरपाई देण्यासाठी सरकार तयार आहे. पंजाब सरकारने शेतकऱ्यांना भरपाई देण्याबाबत आधीच घोषणा केली आहे. हरयाणा, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमधील भाजपची सरकारेही यासाठी तयार आहेत. केंद्र सरकारही भरपाईपोटी काही रक्कम देऊ शकते. 

केवळ गृह राज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी सरकारने मान्य केलेली नाही. शेतकऱ्यांची विजेची बिले माफ करण्यासंदर्भातही सरकारने कोणतेही आश्वासन दिलेले नाही. शेतमालाला किमान हमीभावाच्या मागणीला कायद्याच्या चौकटीत कसे बसवायचे याची जबाबदारी सरकार आणि शेतकरी नेत्यांच्या संयुक्त समितीवर सोपवण्यास शेतकरी तयार आहेत. या समितीची अहवाल येण्यास वेळ लागणार आहे. त्याआधीच शेतकऱ्यांनी आपले आंदोलन मागे घ्यावे, या दिशेने सरकारचे प्रयत्न सुरु आहेत. शेतकऱ्यांची पुढची बैठक निर्णायक ठरो आणि पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांच्या आधीच हे आंदोलन मिटावे, अशी सरकारची इच्छा आहे. पंजाब, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमधील शेतकरी स्वत: आपापल्या गावाला परतू लागले आहेत. सरकारला वाटते की शेतकऱ्यांनी आनंदाने आपापल्या घरी परतावे ज्यामुळे भाजपला निवडणुकीत लाभ मिळू शकेल.

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलन