शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
4
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
5
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
6
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
7
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
8
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
9
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
10
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
11
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
12
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
13
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
14
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
15
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
16
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
17
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
18
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
19
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
20
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?

गौरी यांच्या हत्येचा सर्वत्र निषेध, पत्रकारांचे मोर्चे; परदेशी वृत्तपत्रांनीही केला उल्लेख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 01:05 IST

कन्नड पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येचा केवळ देशभरातच नव्हे, तर परदेशांतही निषेध होत असून, बीबीसी, वॉशिंग्टन पोस्ट, न्यूयॉर्क टाइम्स यासारख्या अग्रगण्य परदेशी वृत्तपत्रांनी आणि रॉयटर्स या वृत्तसंस्थेनेही या हत्येची दखल घेतली आहे.

शीलेश शर्मा नवी दिल्ली : कन्नड पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येचा केवळ देशभरातच नव्हे, तर परदेशांतही निषेध होत असून, बीबीसी, वॉशिंग्टन पोस्ट, न्यूयॉर्क टाइम्स यासारख्या अग्रगण्य परदेशी वृत्तपत्रांनी आणि रॉयटर्स या वृत्तसंस्थेनेही या हत्येची दखल घेतली आहे. उजव्या विचारसरणीच्या विरोधात लिखाण करणा-या गौरी लंकेश यांची हत्या अशाच बातम्या या वृत्तपत्रांनी दिल्या आहेत. कर्नाटकातील ज्येष्ठ साहित्यिक डॉ. एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्येला दोन वर्षे पूर्ण झाल्यानंतर, दोनच दिवसांत गौरी लंकेंश यांची हत्या झाली, असाही उल्लेख सर्वांनी केला आहे.गौरी यांच्या हत्येचे पडसाद आज देशभर उमटले. सर्व राज्यांत आणि शहरांतील पत्रकार संघटनांनी या हत्येच्या निषेधार्थ मोर्चे, मिरवणुका, मेणबत्ती मोर्चे, धरणे आदी आंदोलनांचे आयोजन केले होते. प्रेस क्लब आॅफ इंडिया आणि एडिटर्स गिल्ड यांनी हा वृत्तपत्र स्वातंत्र्यावरील व लोकशाहीवरील हल्ला आहे, असे म्हटले आहे. भारतातील अमेरिकन दूतावासानेही या हत्येची निंदा केली आहे.काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी बुधवारी येथे निषेध केला. लंकेश यांच्या हत्येमुळे समाजात असहिष्णुता आणि फाजील धर्माभिमानाच्या क्रूर चेहºयाने पुन्हा डोके वर काढल्याची भयानक जाणीव झाल्याचे त्या म्हणाल्या. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनीही लंकेश यांच्या हत्येचा धक्का बसल्याचे व सत्य कोणीही दडपू शकत नसल्याचे म्हटले आहे.राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपा सत्य दडपू पाहात आहेत, परंतु ते भारतात शक्य नाही, असे राहुल गांधी म्हणाले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम, पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग आणि पक्षाचे प्रवक्ते अभिषेक मनु सिंघवी यांनीही या हत्येचा निषेध केला. अभिव्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात असून, लोकशाहीचा गळा आवळला जात आहे आणि वृत्तपत्रांचे स्वातंत्र्य व्हेंटिलेटरवर आहे, असे सिंघवी म्हणाले.डाव्यांची टीका-गौरी लंकेश यांच्या हत्येबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांचे मौन आश्चर्यकारक आहे, असे भारतीय कम्युनिस्ट पक्षाने म्हटले. या हत्येमागे उजव्या विचारसरणीच्या आणि धर्मवेड्या शक्ती आहेत, असा आरोप पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डी. राजा यांनी येथे केला.भाजपाची मागणी-हत्या करणाºयांना सरकारने तत्काळ अटक करावी, अशी मागणी भाजपाने केली आहे. सिद्धरामय्या सरकारवर जोरदार टीका करून, केंद्रीय मंत्री अनंतकुमार म्हणाले की, राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था परिस्थिती वाईट झाली आहे.एम. एम. कलबुर्गी यांच्याहत्येशिवाय १८-१९ राजकीय हत्या झाल्या आहेत, असे ते म्हणाले.

टॅग्स :Gauri Lankesh Murderगौरी लंकेश हत्या प्रकरणGauri Lankeshगौरी लंकेशMurderखूनCrimeगुन्हा