शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

लस हेच वरदान! लस घेतलेल्यांपैकी ९४ टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांवर अ‍ॅडमिट होण्याची वेळच आली नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2021 15:37 IST

कोरोना विषाणूच्या विरोधातील लढाईत लस हेच मोठं वरदान ठरत असल्याचं दिसून येत आहे.

कोरोना विषाणूच्या विरोधातील लढाईत लस हेच मोठं वरदान ठरत असल्याचं दिसून येत आहे. देशात कोरोना लसीकरण मोहीम सुरू होऊन आता जवळपास ६ महिने झाले आहेत आणि देशातील २७ कोटी जनतेला कोरोनाची लस देण्यात आली आहे. यात ५ कोटींहून अधिक जणांना लसीचे दोन्ही डोस देऊन झाले आहेत. यात कोरोना विरोधी लसीचे सुरुवातीचे परिणाम खूप चांगले येत असल्याचं दिसून आलं आहे. 

भारताच्या कोरोना टास्क फोर्समधील प्रमुख डॉ. व्ही.के.पॉल यांनी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लस घेतलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनापासून बचावासाठी खूप मदत झाल्याचं म्हटलं आहे. लस घेतलेल्यांवर कोरोना विषाणूचा अत्यंत कमी प्रभाव झाला. ज्यांनी कोरोना विरोधी लस घेतली होती त्यांना रुग्णालयात दाखल होण्याची वेळच आली नाही. याशिवाय त्यांना ऑक्सिजनची देखील गर भासली नाही. 

वेल्लूर स्थित एका ख्रिश्चियन मेडिकल कॉलेजच्या अहवालाचा दाखला देत डॉ. व्ही.के.पॉल यांनी काही आकडेवारी समोर ठेवली. या मेडिकल कॉलेजनं कोरोना विरोधी लसीच्या प्रभावाबाबत सविस्तर तपासणी केली आहे. यात एकूण ८९९१ आरोग्य कर्मचाऱ्यांचा समावेश होता. यात काही लोक कोरोना विरोधी लसीचे दोन्ही डोस घेऊन झालेले देखील होते. यात कोरोना लस ९४ टक्के सुरक्षा देत असल्याचं निष्पन्न झालं आहे. यातच कोरोना विरोधी लस घेतलेल्यांवर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णालयात किंवा आयसीयूमध्ये दाखल होण्याची वेळच आली नाही. याशिवाय लस घेतलेल्यांवर ऑक्सिजन सपोर्टची देखील गरज भासली नाही. 

"लसीकरण केल्यानंतर खूप चांगले परिणाम भारतात पाहायला मिळत आहेत. लस घेतलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांचं परिक्षण यात करण्यात आलं. कारण तेच सर्वात धोक्याच्या परिस्थितीत काम करत आहेत. लस घेतल्यानंतरही कोरोनाची लागण जरी झाली तरी उपचारासाठी रुग्णालयात दाखल होण्याचा धोका ७५ ते ८० टक्क्यांनी कमी होत असल्याचं दिसून आलं आहे. लस घेतल्यानंतर कोरोना झालेल्यांपैकी केवळ ८ टक्के रुग्णांनाच ऑक्सिजनची गरज भासली आहे. तसंच फक्त ६ टक्के रुग्णांना आयसीयूमध्ये दाखल व्हावं लागलं. म्हणजेच जवळपास ९४ टक्क्यांपर्यंत चांगले रिझल्ट आले आहेत. ही माहिती अतिशय उपयुक्त आणि खूप चांगली आहे", असं डॉ. व्ही.के.पॉल म्हणाले. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या