शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

हा घ्या विरूष्काच्या लग्नाचा पुरावा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2017 13:12 IST

गेल्या काही दिवसांपासून टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या लग्नाच्या चर्चेचा बोलबाला आहे.

ठळक मुद्देगेल्या काही दिवसांपासून टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या लग्नाच्या चर्चेचा बोलबाला आहे.विराट-अनुष्काच्या फॅन्सबरोबरच मीडियामध्येही लग्नाचा विषय सध्या जोरदार चर्चेत आहे.

मुंबई- गेल्या काही दिवसांपासून टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या लग्नाच्या चर्चेचा बोलबाला आहे. विराट-अनुष्काच्या फॅन्सबरोबरच मीडियामध्येही लग्नाचा विषय सध्या जोरदार चर्चेत आहे. गुरूवारी रात्री उशिरा अभिनेत्री अनुष्का शर्मा तिच्या कुटुंबीयांबरोबर मुंबई एअरपोर्टवर दिसली. शर्मा कुटुंबीय इटलीला जात असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली होती. इटलीला विरूष्का डेस्टिनेशन वेडिंग करणार असल्याची चर्चा आहे. या दोघांनी लग्नाची बातमी मीडियापासून दूर ठेवली असली तर काही माहिती हळूहळू समोर येते आहे. विरूष्काच्या लग्नाचं निमंत्रण अनुष्काच्या काही शेजाऱ्यांना मिळाल्याचं समजतं आहे. वर्सोवामधील बद्रीनाथ टॉवरमध्ये अनुष्का शर्मा राहते. त्या इमारतीमधील काही जवळच्या लोकांना आमंत्रण दिल्याचं वृत्त 'मीड डे'ने दिलं आहे. अनुष्का शर्माचे वडील अजय कुमार शर्मा यांनी स्वतः काही शेजाऱ्यांना फोन करून लग्नाचं निमंत्रण दिलं आहे. 

सुत्रांच्या माहितीनुसार, अनुष्काच्या वडिलांनी इमारतीत राहणाऱ्या काही जवळच्या लोकांना फोन करून पुढील आठवड्यात होणाऱ्या लग्नाचं निमंत्रण दिलं. लग्न इटलीला असल्याने प्रत्येक जण इटलीला येऊ शकत नाही, म्हणून नवं दाम्पत्याला आशिर्वाद देण्याची विनंती अनुष्काच्या वडिलांनी केली आहे. विरूष्काच्या लग्नाबद्दलची मीडियामध्ये असलेली चर्चा लक्षात घेता ज्या शेजाऱ्यांना लग्नाचं निमंत्रण देण्यात आलं त्यांना ही गोष्ट गुप्त ठेवण्याच सांगितलं आहे. विराट कोहलीने श्रीलंकेविरुद्धच्या आगामी वन-डे आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या मालिकेसाठी खासगी कारण देऊन विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला. विराट कोहलीच्या या निर्णयानंतर विराट-अनुष्काच्या लग्नाच्या चर्चा सुरू झाल्या. त्यातच काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध फॅशन डिझायनर सब्यासाची मुखर्जी अनुष्काच्या घरी गेले होते. त्यानंतर सब्यासाची अनुष्काच्या लग्नाचा ड्रेस डिझाईन करणार असल्याची चर्चा सुरू झाली. विराटचे क्रिकेट गुरू राजकुमार शर्मा यांनी सुट्टीसाठी अर्ज केल्याची माहिती समोर आल्याने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

इटलीमध्ये 13 ते 15 डिसेंबर असे तीन दिवस विराट-अनुष्काचा लग्नसोहळा असेल. 13 डिसेंबरला संगीत, 14 डिसेंबरला हळद आणि 15 डिसेंबरला लग्नाचा मुख्य सोहळा असेल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. 

टॅग्स :Virushka Weddingविरूष्का वेडिंगVirat Kohliविराट कोहलीAnushka Sharmaअनुष्का शर्माItalyइटलीVirat Anushka Weddingविराट अनुष्का लग्न