शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

पदोन्नतीत पुन्हा आरक्षण; नितीशकुमार यांचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2018 23:20 IST

पुढील वर्षीच्या लोकसभा निवडणुकांच्या तयारीसाठी मुख्यमंत्री नितीशकुमार यांचा जनता दल (यू) व भाजपा यांची युती आणि काँग्रेस व राष्ट्रीय जनता दलाच्या महाआघाडीही जोरात कामाला लागली आहे.

पाटणा : पुढील वर्षीच्या लोकसभा निवडणुकांच्या तयारीसाठी मुख्यमंत्री नितीशकुमार यांचा जनता दल (यू) व भाजपा यांची युती आणि काँग्रेस व राष्ट्रीय जनता दलाच्या महाआघाडीही जोरात कामाला लागली आहे. जागावाटपाबाबत युती व आघाडी यांच्यात फारसे मतभेद राहिले नसले तरी आता विविध मुद्द्यांंवरून एकमेकांवर कुरघोडी करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. त्याचाच भाग म्हणून मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी अनुसूचित जाती-जमातींच्या (एससी व एसटी) कर्मचाऱ्यांना पदोन्नतीमध्ये आरक्षण देण्याचे जाहीर केले आहे.दलित व आदिवासी यांना आपल्या बाजूने खेचण्यासाठीच नितीशकुमार यांनी हे पाऊ ल उचलले आहे. सर्वोच्च न्यायालयाने ५ जून रोजी सरकारी कर्मचाºयांना पदोन्नतीमध्ये आरक्षण सुरू ठेवण्यास परवानगी दिली होती. विविध राज्यांच्या उच्च न्यायालयांनी अनुसूचित जाती-जमातींतील कर्मचाºयांच्या पदोन्नतीविरुद्ध निकाल दिल्याने काही राज्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.उच्च न्यायालयाच्या निकालामुळे पदोन्नतीची प्रक्रियाच थांबल्याची तक्रार राज्य सरकारांनी केली होती. त्यावरील सुनावणीच्या वेळी अनुसूचित जाती-जमातीतील कर्मचाºयांच्या पदोन्नतीला क्रिमी लेअरचा मुद्दा लागू होऊ शकत नाही, असे प्रतिपादन केंद्र सरकारतर्फे करण्यात आले होते. त्यावर हे प्रकरण घटनापीठाकडे सोपवताना, त्याचा निर्णय येईपर्यंत अनुसूचित जाती व जमातींच्या कर्मचाºयांच्या पदोन्नतीला न्यायालयाने संमती दिली.त्याआधारे नितीशकुमार यांनी पदोन्नतीमध्ये आरक्षणाचा निर्णय घेतला आहे. बिहारमध्ये महाआघाडीच्या बाजूने वातावरण आहे आणि त्याचा फटका जनता दल (यू) व भाजपा युतीला बसू नये, हे या निर्णयाचे प्रमुख कारण असल्याचे सांगण्यात येते. याचा निवडणुकांमध्ये राजकीय फायदा मिळू शकेल, असे त्यांना वाटत आहे. (वृत्तसंस्था)तर वटहुकूम काढणार?सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाचा निर्णय कदाचित विरोधात गेला, तर मात्र नितीशकुमार यांची अडचण होईल आणि त्यामुळे मधील काळात ज्यांना पदोन्नती मिळाली, ती रद्द होऊ शकेल. अर्थात सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जाती-जमातींचे पदोन्नतीतील आरक्षण रद्द केले वा बेकायदा ठरविले, तर तर केंद्र सरकार वटहुकूम काढून आरक्षण कायम ठेवेल, असे समजते. केंद्रीय मंत्री व बिहारमधील नेते रामविलास पासवान यांनी तसे स्पष्टपणे म्हटले आहे.

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारBiharबिहार