शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
2
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
3
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
4
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
5
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
6
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
7
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
8
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
9
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
10
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
11
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
12
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
13
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
14
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
15
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
16
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
17
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
18
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
19
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
20
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!

पदोन्नतीत पुन्हा आरक्षण; नितीशकुमार यांचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2018 23:20 IST

पुढील वर्षीच्या लोकसभा निवडणुकांच्या तयारीसाठी मुख्यमंत्री नितीशकुमार यांचा जनता दल (यू) व भाजपा यांची युती आणि काँग्रेस व राष्ट्रीय जनता दलाच्या महाआघाडीही जोरात कामाला लागली आहे.

पाटणा : पुढील वर्षीच्या लोकसभा निवडणुकांच्या तयारीसाठी मुख्यमंत्री नितीशकुमार यांचा जनता दल (यू) व भाजपा यांची युती आणि काँग्रेस व राष्ट्रीय जनता दलाच्या महाआघाडीही जोरात कामाला लागली आहे. जागावाटपाबाबत युती व आघाडी यांच्यात फारसे मतभेद राहिले नसले तरी आता विविध मुद्द्यांंवरून एकमेकांवर कुरघोडी करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. त्याचाच भाग म्हणून मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी अनुसूचित जाती-जमातींच्या (एससी व एसटी) कर्मचाऱ्यांना पदोन्नतीमध्ये आरक्षण देण्याचे जाहीर केले आहे.दलित व आदिवासी यांना आपल्या बाजूने खेचण्यासाठीच नितीशकुमार यांनी हे पाऊ ल उचलले आहे. सर्वोच्च न्यायालयाने ५ जून रोजी सरकारी कर्मचाºयांना पदोन्नतीमध्ये आरक्षण सुरू ठेवण्यास परवानगी दिली होती. विविध राज्यांच्या उच्च न्यायालयांनी अनुसूचित जाती-जमातींतील कर्मचाºयांच्या पदोन्नतीविरुद्ध निकाल दिल्याने काही राज्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.उच्च न्यायालयाच्या निकालामुळे पदोन्नतीची प्रक्रियाच थांबल्याची तक्रार राज्य सरकारांनी केली होती. त्यावरील सुनावणीच्या वेळी अनुसूचित जाती-जमातीतील कर्मचाºयांच्या पदोन्नतीला क्रिमी लेअरचा मुद्दा लागू होऊ शकत नाही, असे प्रतिपादन केंद्र सरकारतर्फे करण्यात आले होते. त्यावर हे प्रकरण घटनापीठाकडे सोपवताना, त्याचा निर्णय येईपर्यंत अनुसूचित जाती व जमातींच्या कर्मचाºयांच्या पदोन्नतीला न्यायालयाने संमती दिली.त्याआधारे नितीशकुमार यांनी पदोन्नतीमध्ये आरक्षणाचा निर्णय घेतला आहे. बिहारमध्ये महाआघाडीच्या बाजूने वातावरण आहे आणि त्याचा फटका जनता दल (यू) व भाजपा युतीला बसू नये, हे या निर्णयाचे प्रमुख कारण असल्याचे सांगण्यात येते. याचा निवडणुकांमध्ये राजकीय फायदा मिळू शकेल, असे त्यांना वाटत आहे. (वृत्तसंस्था)तर वटहुकूम काढणार?सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाचा निर्णय कदाचित विरोधात गेला, तर मात्र नितीशकुमार यांची अडचण होईल आणि त्यामुळे मधील काळात ज्यांना पदोन्नती मिळाली, ती रद्द होऊ शकेल. अर्थात सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जाती-जमातींचे पदोन्नतीतील आरक्षण रद्द केले वा बेकायदा ठरविले, तर तर केंद्र सरकार वटहुकूम काढून आरक्षण कायम ठेवेल, असे समजते. केंद्रीय मंत्री व बिहारमधील नेते रामविलास पासवान यांनी तसे स्पष्टपणे म्हटले आहे.

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारBiharबिहार