शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांनी जानेवारीत केली होती लाल किल्ला भागात रेकी, टॉवर लोकेशन डेटाद्वारे करण्यात आली खात्री
2
तेजस्वीची राजद घेईल सर्वाधिक जागा, पण सत्ता एनडीएचीच, 'ॲक्सिस माय इंडिया' एक्झिट पोलमध्ये अंदाज  
3
काश्मीरमध्ये तीन दिवसांत तब्बल १५०० जण ताब्यात, कुलगाम-सोपोरसह शेकडो ठिकाणी छापे, झडती तीव्र
4
एमसीएच्या निवडणुकीमध्ये आ. जितेंद्र आव्हाड यांची बाजी, उपाध्यक्षपदी १३६ मतांनी विजय; अध्यक्षपदी अजिंक्य नाईक यांची बिनविरोध निवड
5
‘ओंकार’ जाणार वनतारामध्ये, सर्किट बेंचचा निर्णय, मूळ याचिका कायम
6
तुर्कीयेचे लष्करी मालवाहतूक विमान कोसळले; २० ठार
7
रोहित शर्मा ७ वर्षांनंतर खेळणार विजय हजारे करंडक, विराटबाबत संभ्रम
8
जुरेल घेणार रेड्डीचे स्थान, पहिल्या कसोटीत ऋषभ पंतही खेळणार, अक्षर पटेलला अंतिम संघात संधी
9
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
10
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
11
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
12
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
13
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
14
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
15
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
16
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
17
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
18
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
19
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
20
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?

५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2025 11:11 IST

एकीकडे इतका विनाश झालेला असतानाच, देण्यात आलेली रक्कम ही अत्यंत अपुरी असल्याचे लोक म्हणत आहेत.

उत्तरकाशीतील धराली गावात झालेल्या ढगफुटीमुळे या भागात अचानक मोठी पूरस्थिती निर्माण झाली होती. या पूरात संपूर्ण गाव वाहून गेलं. इतकंच नाही तर, अनेक लोकांचा मृत्यू झाला. अनेकांची घरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली. या पूरबाधित लोकांना ५ लाखांची मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. मात्र, पूरस्थितीच्या पाच दिवसानंतर शुक्रवारी बाधितांना तात्काळ मदत म्हणून अवघ्या ५ हजारांचे धनादेश देण्यात आले. इतक्या कमी रकमेचे चेक पाहून नागरिकांनी संताप व्यक्त केला. अनेकांनी ही मदत स्वीकारण्यास थेट नकार दिला. 

एकीकडे इतका विनाश झालेला असतानाच, देण्यात आलेली रक्कम ही अत्यंत अपुरी असल्याचे लोक म्हणत आहेत. हा आमच्या दुःखाचाही अपमान असल्याचे लोकांनी म्हटले आहे. "आम्ही आमचे सर्वस्व गमावले आहे, आमची घरे, पैसे, व्यवसाय सगळं वाहून गेलं आहे. त्यामुळे ही रक्कम अपमानास्पद आहे", असे मत एका ग्रामस्थाने व्यक्त केले आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, स्थानिक लोकांनी सांगितले की आपत्तीनंतर परिसरात वीज नव्हती, म्हणून त्यांना मेणबत्त्यांचे पाकिटे वाटण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. परंतु, त्या देखील चार दिवसांनंतर त्यांच्यापर्यंत पोहोचल्या.    

यावर प्रतिक्रिया देताना दुसऱ्या एका स्थानिक व्यक्तीने म्हटले की, "आम्ही ४ रात्री अंधारात घालवल्या. अन्न गरम करण्यासाठी आम्ही लाकडे जाळली. सरकार रेशनबद्दल बोलत आहे, पण तेही आमच्यापर्यंत पोहोचले नाही. अन्न शोधण्यासाठी आम्हाला घरोघरी भटकावे लागले."

पर्यटकांची मन मोहून टाकणारी ही गावे आता मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करत आहेत. या स्थितीबद्दल बोलताना आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्याने सांगितले की ५,००० रुपयांचे धनादेश हे तात्पुरते उपाय होते आणि नुकसानीचे संपूर्ण मूल्यांकन अद्याप झालेले नाही.

टॅग्स :Uttarakhandउत्तराखंडfloodपूर