शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरद पवार उलगडलेलं, पण न उमजलेलं कोडं, तर अजित पवार...'; CM फडणवीसांचे 'रॅपिड फायर' उत्तरे, शिंदे-ठाकरेंबद्दल काय म्हणाले? 
2
पुराचा धसका! चिखलातील स्वप्नांचा शोध..; पिकेच नाही तर मातीही वाहून गेल्याने भविष्य संकटात
3
हृदयद्रावक! खेळता खेळता उकळत्या दुधात पडून दीड वर्षांच्या मुलीचा मृत्यू, मांजरीच्या मागे गेली अन्...
4
सुपर ओव्हरमधील वादावरून श्रीलंकेचे प्रशिक्षक जयसूर्या संतप्त, ICCकडे केली अशी मागणी 
5
भारतीय औषध उद्योगाला ‘ट्रम्प’ झटका! १०.५ अब्ज डॉलरची निर्यात धोक्यात, अमेरिकेलाही बसणार झळ
6
अभिषेक शर्मा-अभिषेक बच्चनच्या नावात शोएब अख्तरचा गोंधळ; अभिनेता स्पष्टच म्हणाला- "तुझा आदर करतो, पण..."
7
Maharashtra Rain Alert: पुन्हा अतिवृष्टीचे संकट? आज, उद्या 'या' जिल्ह्यांत पाऊस घालणार धुमाकूळ, IMD सतर्कतेचा इशारा
8
Happy Birthday Google! २७ वा वाढदिवस साजरा करतोय गुगल! तुम्हाला Google चा फुल फॉर्म माहितीये का आणि कसं पडलं हे नाव?
9
२५ जण, ६ वाहनं... १ मिनिटात ९ कोटींवर डल्ला; दागिन्यांच्या दुकानात फिल्मी स्टाईल दरोडा
10
'शार्क टँक' फेम अश्नीर ग्रोव्हरला 'बिग बॉस १९'कडून ईमेल, वाइल्ड कार्ड एन्ट्रीची ऑफर; म्हणाला- "आधी सलमान खानला..."
11
TATA च्या बहुप्रतिक्षित आयपीओची तारीख अखेर ठरली, 'या' दिवशी मिळणार गुंतवणूकीची संधी, चेक करा डिटेल्स
12
"उद्ध्वस्त एअरबेस, जळालेले हँगर हा तुमचा विजय?"; भारताची पाकिस्तानला सणसणीत चपराक
13
काळाचा घाला! गुरुग्राममधील भीषण अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू, थारचा चक्काचूर
14
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केली तर २४ महिन्यांनंतर किती रुपये मिळतील? पटापट पाहा कॅलक्युलेशन
15
फ्लॅट वेळेत न दिल्यास बिल्डरला १८% व्याजासह भरपाई द्यावीच लागेल; सुप्रीम कोर्टाचा आदेश
16
चैतन्यनंदचे काळे कारनामे! मुलींची निवड करुन त्यांना कसं बनवायचा गुलाम?, खळबळजनक खुलासा
17
राज्यातील ८९ फार्मसी महाविद्यालयांची मान्यता रद्द; तंत्रशिक्षण विभागाचा मोठा निर्णय
18
देशातील प्रत्येक तिसरा लहानगा हार्ट अटॅकच्या मार्गावर?; मुलांच्या रक्तातील चरबीचे प्रमाण वाढले
19
आधी नगरपालिका की जिल्हा परिषद?;निवडणूक आयोगाची दोन्हींसाठी तयारी सुरू
20
कुजबुज! ओल्या दुष्काळात काजू-बदामची चर्चा; शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी अन् राजकीय चिखलफेक

५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2025 11:11 IST

एकीकडे इतका विनाश झालेला असतानाच, देण्यात आलेली रक्कम ही अत्यंत अपुरी असल्याचे लोक म्हणत आहेत.

उत्तरकाशीतील धराली गावात झालेल्या ढगफुटीमुळे या भागात अचानक मोठी पूरस्थिती निर्माण झाली होती. या पूरात संपूर्ण गाव वाहून गेलं. इतकंच नाही तर, अनेक लोकांचा मृत्यू झाला. अनेकांची घरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली. या पूरबाधित लोकांना ५ लाखांची मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. मात्र, पूरस्थितीच्या पाच दिवसानंतर शुक्रवारी बाधितांना तात्काळ मदत म्हणून अवघ्या ५ हजारांचे धनादेश देण्यात आले. इतक्या कमी रकमेचे चेक पाहून नागरिकांनी संताप व्यक्त केला. अनेकांनी ही मदत स्वीकारण्यास थेट नकार दिला. 

एकीकडे इतका विनाश झालेला असतानाच, देण्यात आलेली रक्कम ही अत्यंत अपुरी असल्याचे लोक म्हणत आहेत. हा आमच्या दुःखाचाही अपमान असल्याचे लोकांनी म्हटले आहे. "आम्ही आमचे सर्वस्व गमावले आहे, आमची घरे, पैसे, व्यवसाय सगळं वाहून गेलं आहे. त्यामुळे ही रक्कम अपमानास्पद आहे", असे मत एका ग्रामस्थाने व्यक्त केले आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, स्थानिक लोकांनी सांगितले की आपत्तीनंतर परिसरात वीज नव्हती, म्हणून त्यांना मेणबत्त्यांचे पाकिटे वाटण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. परंतु, त्या देखील चार दिवसांनंतर त्यांच्यापर्यंत पोहोचल्या.    

यावर प्रतिक्रिया देताना दुसऱ्या एका स्थानिक व्यक्तीने म्हटले की, "आम्ही ४ रात्री अंधारात घालवल्या. अन्न गरम करण्यासाठी आम्ही लाकडे जाळली. सरकार रेशनबद्दल बोलत आहे, पण तेही आमच्यापर्यंत पोहोचले नाही. अन्न शोधण्यासाठी आम्हाला घरोघरी भटकावे लागले."

पर्यटकांची मन मोहून टाकणारी ही गावे आता मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करत आहेत. या स्थितीबद्दल बोलताना आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्याने सांगितले की ५,००० रुपयांचे धनादेश हे तात्पुरते उपाय होते आणि नुकसानीचे संपूर्ण मूल्यांकन अद्याप झालेले नाही.

टॅग्स :Uttarakhandउत्तराखंडfloodपूर