शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
2
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
3
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
4
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
5
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
6
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
7
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
8
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
9
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
10
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
11
जिला गर्लफ्रेंड म्हटलं तिनेच राखी बांधली! मोहम्मद सिराज आणि आशा भोसलेंच्या नातीचं रक्षाबंधन, फोटो समोर
12
'धकधक गर्ल' माधुरीचं सौंदर्य पाहून घायाळ झालेला अभिनेता, एकही रुपया मानधन न घेता केला सिनेमा
13
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का
14
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
15
Bigg Boss 19: पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीला 'बिग बॉस'ची ऑफर! शोमध्ये दिसणार असल्याची चर्चा
16
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
17
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
18
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
19
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
20
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’

५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2025 11:11 IST

एकीकडे इतका विनाश झालेला असतानाच, देण्यात आलेली रक्कम ही अत्यंत अपुरी असल्याचे लोक म्हणत आहेत.

उत्तरकाशीतील धराली गावात झालेल्या ढगफुटीमुळे या भागात अचानक मोठी पूरस्थिती निर्माण झाली होती. या पूरात संपूर्ण गाव वाहून गेलं. इतकंच नाही तर, अनेक लोकांचा मृत्यू झाला. अनेकांची घरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली. या पूरबाधित लोकांना ५ लाखांची मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. मात्र, पूरस्थितीच्या पाच दिवसानंतर शुक्रवारी बाधितांना तात्काळ मदत म्हणून अवघ्या ५ हजारांचे धनादेश देण्यात आले. इतक्या कमी रकमेचे चेक पाहून नागरिकांनी संताप व्यक्त केला. अनेकांनी ही मदत स्वीकारण्यास थेट नकार दिला. 

एकीकडे इतका विनाश झालेला असतानाच, देण्यात आलेली रक्कम ही अत्यंत अपुरी असल्याचे लोक म्हणत आहेत. हा आमच्या दुःखाचाही अपमान असल्याचे लोकांनी म्हटले आहे. "आम्ही आमचे सर्वस्व गमावले आहे, आमची घरे, पैसे, व्यवसाय सगळं वाहून गेलं आहे. त्यामुळे ही रक्कम अपमानास्पद आहे", असे मत एका ग्रामस्थाने व्यक्त केले आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, स्थानिक लोकांनी सांगितले की आपत्तीनंतर परिसरात वीज नव्हती, म्हणून त्यांना मेणबत्त्यांचे पाकिटे वाटण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. परंतु, त्या देखील चार दिवसांनंतर त्यांच्यापर्यंत पोहोचल्या.    

यावर प्रतिक्रिया देताना दुसऱ्या एका स्थानिक व्यक्तीने म्हटले की, "आम्ही ४ रात्री अंधारात घालवल्या. अन्न गरम करण्यासाठी आम्ही लाकडे जाळली. सरकार रेशनबद्दल बोलत आहे, पण तेही आमच्यापर्यंत पोहोचले नाही. अन्न शोधण्यासाठी आम्हाला घरोघरी भटकावे लागले."

पर्यटकांची मन मोहून टाकणारी ही गावे आता मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करत आहेत. या स्थितीबद्दल बोलताना आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्याने सांगितले की ५,००० रुपयांचे धनादेश हे तात्पुरते उपाय होते आणि नुकसानीचे संपूर्ण मूल्यांकन अद्याप झालेले नाही.

टॅग्स :Uttarakhandउत्तराखंडfloodपूर