शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

प्रचाराला ‘लसणा’ची फोडणी, घसरलेल्या किमतीने शेतकरी हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2018 05:01 IST

राजस्थानातील प्रचार सभांमध्ये राहुल गांधी यांनी पिकाच्या घसरलेल्या किमतीचा मुद्दा वेळोवेळी उपस्थित करून केंद्र व राज्य सरकारला कात्रीत पकडण्याचा प्रयत्न केला.

- असीफ कुरणेजयपूर : राजस्थानातील प्रचार सभांमध्ये राहुल गांधी यांनी पिकाच्या घसरलेल्या किमतीचा मुद्दा वेळोवेळी उपस्थित करून केंद्र व राज्य सरकारला कात्रीत पकडण्याचा प्रयत्न केला. प्रचाराच्या केंद्रस्थानी असलेले पीक म्हणजे लसूण. यंदाच्या प्रचारात लसणाची फोडणी जरा जास्तच बसली आहे. त्याचा ठसका कोणाला लागतो, हे ११ डिसेंबरला स्पष्ट होईल.मध्य प्रदेशच्या मंदसौर येथे २०१७ मध्ये झालेल्या शेतकरी आंदोलनाचा मुख्य मुद्दा होता लसणाच्या घसणाऱ्या किमती. येथे पोलीस गोळीबारात सहा शेतकºयांचा बळी गेला होता. एक वर्षांनंतरही लसणाच्या किमती अजून घसरत असून, त्या नीचांकी पातळीवर पोहोचल्या आहेत. राजस्थानच्या पूर्वेकडील हाडोती भागात लसूण हे प्रमुख पीक आहे. या भागातून देशाच्या एकूण लसूण उत्पादनाच्या ४५ टक्के उत्पादन होते. लसणाचा भाव २०१६ मध्ये एका किलोला १०० रुपये होता. लसूण हे या भागातील नगदी पीक असून, उत्तम प्रतीच्या एका किलो लसणाला १३० रुपये किलो असा दरही मिळत होता. त्यामुळे मोठ्या संख्येने शेतकरी हे पीक घेतात.मात्र, नोव्हेंबर २०१६ मध्ये लागू झालेल्या नोटाबंदीनंतर परिस्थितीत कमालीचा बदल झाला आहे. नोटाबंदीमुळे सर्वच शेतीमालाच्या किमती घसरल्या. राजस्थानमध्ये १ लाख ३२ हजार हेक्टर क्षेत्रावर प्रामुख्याने लसणाची लागवड केली जाते. हे क्षेत्र २०१६ मध्ये ६९ हजार हेक्टर एवढे होते. मे २०१८ मध्ये बंपर उत्पादन झाल्यामुळे लसणाच्या किमतीत घसरण सुरू झाली. लसणाचा दर एका किलोला दोन रुपये किलो एवढा खाली आला. आधी १०० रुपये किलोवरून पाच रुपये किलो अशा किमती झाल्याने लसूण उत्पादक शेतकºयांमध्ये संतापाची लाट उसळली. उत्पादन खर्च निघणे दूर, मार्केटमध्ये शेतकºयांना पदरचे पैसे मोजावे लागले.राजस्थान सरकारने शासकीय पातळीवर ३२ रुपये दराने लसूण खरेदी सुरू केली होती. पण, सरकारने एकूण उत्पादनाच्या निम्माच (७० हजार मेट्रिक टन ) लसूण खरेदी केला. हरभºयाचीही अशीच स्थिती असून त्याचा भाव प्रति क्विंटल ४००० रुपयांपर्यंत खाली आला आहे.>बंपर उत्पादन आले अंगाशीलसूण, सोयाबीन, गहू , चना यासारख्या पिकांचे उत्पादन राजस्थानात वाढल्याने त्यांचे भाव पडत आहेत. वाढलेल्या उत्पादनामुळे शेतकºयांना योग्य हमीभाव मिळविण्यात अडचणी येत आहेत. हरभरा, लसणाच्या किमती दोन वर्षांपूर्वी ९ हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचल्या होत्या. आॅक्टोबर २०१८ मध्ये हरभरा ४१०० रुपये क्विंटल तर लसूण २३०० रुपये प्रति क्विंटल असे घसरले होते. यामुळे २०१८ मध्ये राजस्थानातील हाडोती भागात लसणाच्या पाच उत्पादक शेतकºयांनी आत्महत्या केली.

टॅग्स :Rajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूक