शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

प्रचाराला ‘लसणा’ची फोडणी, घसरलेल्या किमतीने शेतकरी हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2018 05:01 IST

राजस्थानातील प्रचार सभांमध्ये राहुल गांधी यांनी पिकाच्या घसरलेल्या किमतीचा मुद्दा वेळोवेळी उपस्थित करून केंद्र व राज्य सरकारला कात्रीत पकडण्याचा प्रयत्न केला.

- असीफ कुरणेजयपूर : राजस्थानातील प्रचार सभांमध्ये राहुल गांधी यांनी पिकाच्या घसरलेल्या किमतीचा मुद्दा वेळोवेळी उपस्थित करून केंद्र व राज्य सरकारला कात्रीत पकडण्याचा प्रयत्न केला. प्रचाराच्या केंद्रस्थानी असलेले पीक म्हणजे लसूण. यंदाच्या प्रचारात लसणाची फोडणी जरा जास्तच बसली आहे. त्याचा ठसका कोणाला लागतो, हे ११ डिसेंबरला स्पष्ट होईल.मध्य प्रदेशच्या मंदसौर येथे २०१७ मध्ये झालेल्या शेतकरी आंदोलनाचा मुख्य मुद्दा होता लसणाच्या घसणाऱ्या किमती. येथे पोलीस गोळीबारात सहा शेतकºयांचा बळी गेला होता. एक वर्षांनंतरही लसणाच्या किमती अजून घसरत असून, त्या नीचांकी पातळीवर पोहोचल्या आहेत. राजस्थानच्या पूर्वेकडील हाडोती भागात लसूण हे प्रमुख पीक आहे. या भागातून देशाच्या एकूण लसूण उत्पादनाच्या ४५ टक्के उत्पादन होते. लसणाचा भाव २०१६ मध्ये एका किलोला १०० रुपये होता. लसूण हे या भागातील नगदी पीक असून, उत्तम प्रतीच्या एका किलो लसणाला १३० रुपये किलो असा दरही मिळत होता. त्यामुळे मोठ्या संख्येने शेतकरी हे पीक घेतात.मात्र, नोव्हेंबर २०१६ मध्ये लागू झालेल्या नोटाबंदीनंतर परिस्थितीत कमालीचा बदल झाला आहे. नोटाबंदीमुळे सर्वच शेतीमालाच्या किमती घसरल्या. राजस्थानमध्ये १ लाख ३२ हजार हेक्टर क्षेत्रावर प्रामुख्याने लसणाची लागवड केली जाते. हे क्षेत्र २०१६ मध्ये ६९ हजार हेक्टर एवढे होते. मे २०१८ मध्ये बंपर उत्पादन झाल्यामुळे लसणाच्या किमतीत घसरण सुरू झाली. लसणाचा दर एका किलोला दोन रुपये किलो एवढा खाली आला. आधी १०० रुपये किलोवरून पाच रुपये किलो अशा किमती झाल्याने लसूण उत्पादक शेतकºयांमध्ये संतापाची लाट उसळली. उत्पादन खर्च निघणे दूर, मार्केटमध्ये शेतकºयांना पदरचे पैसे मोजावे लागले.राजस्थान सरकारने शासकीय पातळीवर ३२ रुपये दराने लसूण खरेदी सुरू केली होती. पण, सरकारने एकूण उत्पादनाच्या निम्माच (७० हजार मेट्रिक टन ) लसूण खरेदी केला. हरभºयाचीही अशीच स्थिती असून त्याचा भाव प्रति क्विंटल ४००० रुपयांपर्यंत खाली आला आहे.>बंपर उत्पादन आले अंगाशीलसूण, सोयाबीन, गहू , चना यासारख्या पिकांचे उत्पादन राजस्थानात वाढल्याने त्यांचे भाव पडत आहेत. वाढलेल्या उत्पादनामुळे शेतकºयांना योग्य हमीभाव मिळविण्यात अडचणी येत आहेत. हरभरा, लसणाच्या किमती दोन वर्षांपूर्वी ९ हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचल्या होत्या. आॅक्टोबर २०१८ मध्ये हरभरा ४१०० रुपये क्विंटल तर लसूण २३०० रुपये प्रति क्विंटल असे घसरले होते. यामुळे २०१८ मध्ये राजस्थानातील हाडोती भागात लसणाच्या पाच उत्पादक शेतकºयांनी आत्महत्या केली.

टॅग्स :Rajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूक