शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
3
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
4
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
5
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
6
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
7
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
8
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
9
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
10
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
11
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
12
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
13
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
14
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
15
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
16
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
17
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
18
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
19
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
20
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 

प्रचाराला ‘लसणा’ची फोडणी, घसरलेल्या किमतीने शेतकरी हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2018 05:01 IST

राजस्थानातील प्रचार सभांमध्ये राहुल गांधी यांनी पिकाच्या घसरलेल्या किमतीचा मुद्दा वेळोवेळी उपस्थित करून केंद्र व राज्य सरकारला कात्रीत पकडण्याचा प्रयत्न केला.

- असीफ कुरणेजयपूर : राजस्थानातील प्रचार सभांमध्ये राहुल गांधी यांनी पिकाच्या घसरलेल्या किमतीचा मुद्दा वेळोवेळी उपस्थित करून केंद्र व राज्य सरकारला कात्रीत पकडण्याचा प्रयत्न केला. प्रचाराच्या केंद्रस्थानी असलेले पीक म्हणजे लसूण. यंदाच्या प्रचारात लसणाची फोडणी जरा जास्तच बसली आहे. त्याचा ठसका कोणाला लागतो, हे ११ डिसेंबरला स्पष्ट होईल.मध्य प्रदेशच्या मंदसौर येथे २०१७ मध्ये झालेल्या शेतकरी आंदोलनाचा मुख्य मुद्दा होता लसणाच्या घसणाऱ्या किमती. येथे पोलीस गोळीबारात सहा शेतकºयांचा बळी गेला होता. एक वर्षांनंतरही लसणाच्या किमती अजून घसरत असून, त्या नीचांकी पातळीवर पोहोचल्या आहेत. राजस्थानच्या पूर्वेकडील हाडोती भागात लसूण हे प्रमुख पीक आहे. या भागातून देशाच्या एकूण लसूण उत्पादनाच्या ४५ टक्के उत्पादन होते. लसणाचा भाव २०१६ मध्ये एका किलोला १०० रुपये होता. लसूण हे या भागातील नगदी पीक असून, उत्तम प्रतीच्या एका किलो लसणाला १३० रुपये किलो असा दरही मिळत होता. त्यामुळे मोठ्या संख्येने शेतकरी हे पीक घेतात.मात्र, नोव्हेंबर २०१६ मध्ये लागू झालेल्या नोटाबंदीनंतर परिस्थितीत कमालीचा बदल झाला आहे. नोटाबंदीमुळे सर्वच शेतीमालाच्या किमती घसरल्या. राजस्थानमध्ये १ लाख ३२ हजार हेक्टर क्षेत्रावर प्रामुख्याने लसणाची लागवड केली जाते. हे क्षेत्र २०१६ मध्ये ६९ हजार हेक्टर एवढे होते. मे २०१८ मध्ये बंपर उत्पादन झाल्यामुळे लसणाच्या किमतीत घसरण सुरू झाली. लसणाचा दर एका किलोला दोन रुपये किलो एवढा खाली आला. आधी १०० रुपये किलोवरून पाच रुपये किलो अशा किमती झाल्याने लसूण उत्पादक शेतकºयांमध्ये संतापाची लाट उसळली. उत्पादन खर्च निघणे दूर, मार्केटमध्ये शेतकºयांना पदरचे पैसे मोजावे लागले.राजस्थान सरकारने शासकीय पातळीवर ३२ रुपये दराने लसूण खरेदी सुरू केली होती. पण, सरकारने एकूण उत्पादनाच्या निम्माच (७० हजार मेट्रिक टन ) लसूण खरेदी केला. हरभºयाचीही अशीच स्थिती असून त्याचा भाव प्रति क्विंटल ४००० रुपयांपर्यंत खाली आला आहे.>बंपर उत्पादन आले अंगाशीलसूण, सोयाबीन, गहू , चना यासारख्या पिकांचे उत्पादन राजस्थानात वाढल्याने त्यांचे भाव पडत आहेत. वाढलेल्या उत्पादनामुळे शेतकºयांना योग्य हमीभाव मिळविण्यात अडचणी येत आहेत. हरभरा, लसणाच्या किमती दोन वर्षांपूर्वी ९ हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचल्या होत्या. आॅक्टोबर २०१८ मध्ये हरभरा ४१०० रुपये क्विंटल तर लसूण २३०० रुपये प्रति क्विंटल असे घसरले होते. यामुळे २०१८ मध्ये राजस्थानातील हाडोती भागात लसणाच्या पाच उत्पादक शेतकºयांनी आत्महत्या केली.

टॅग्स :Rajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूक