शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
4
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
5
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
6
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
7
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
8
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
9
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
10
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
11
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
12
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
13
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
14
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
15
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
16
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
17
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
18
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
19
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
20
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  

गोदापात्रालगतची अतिक्रमणे त्वरित हटवण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांची कार्यवाही : पात्रालगत निषिद्ध क्षेत्र महिनाभरात

By admin | Updated: March 6, 2015 23:07 IST

नाशिक : गोदापात्राचे प्रदूषण रोखण्यासाठी उच्च न्यायालय आणि हरित प्राधिकरणात दाखल झालेल्या याचिका आणि प्रत्येकवेळी न्यायालये यासंदर्भात घेत असलेली दखल यामुळे शासकीय यंत्रणा कामाला लागण्याची चिन्हे आहेत. गोदावरी नदी पात्र अतिक्रमण मुक्त करण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी महापालिकेबरोबरच अन्य यंत्रणांना दिले आहेत. त्यामुळे अशाप्रकारे अतिक्रमणे करणारे धास्तावले आहेत.

नाशिक : गोदापात्राचे प्रदूषण रोखण्यासाठी उच्च न्यायालय आणि हरित प्राधिकरणात दाखल झालेल्या याचिका आणि प्रत्येकवेळी न्यायालये यासंदर्भात घेत असलेली दखल यामुळे शासकीय यंत्रणा कामाला लागण्याची चिन्हे आहेत. गोदावरी नदी पात्र अतिक्रमण मुक्त करण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी महापालिकेबरोबरच अन्य यंत्रणांना दिले आहेत. त्यामुळे अशाप्रकारे अतिक्रमणे करणारे धास्तावले आहेत.
गोदावरी नदीच्या प्रदूषणासाठी केवळ त्यात सोडले जाणारे सांडपाणी हेच एकमेव कारण नाही, तर त्यास अनेक घटक कारणीभूत आहेत. त्या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयात अनेक पर्यावरण प्रेमींनी याचिका दाखल केल्या आहेत. उच्च न्यायालयाने विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत केली असून, ही समिती प्रदूषण रोखण्यासाठी केलेल्या कार्यवाहीचा दर दोन महिन्यांत आढावा घेऊन तो उच्च न्यायालयाला कळविला जातो. हरित न्यायाधिकरणानेही विविध सूचना केल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकार्‍यांनी चार महत्त्वाचे निर्णय घेतले असून, संबंधित खात्यांना आणि यंत्रणांना आदेशच दिले आहेत.
त्यानुसार त्र्यंबकेश्वर नगरपालिका, नाश्कि महापालिका, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता यांना जिल्हाधिकार्‍यांनी आपल्या हद्दीतील गोदापात्रालगतची अतिक्रमणे त्वरित निष्कासित करावी, असे आदेश दिले आहेत. त्याचप्रमाणे नाशिक जिल्‘ात गोदावरी नदीच्या हद्दीत निळी आणि लाल रेषा निर्धररित करण्यासाठी लाभ क्षेत्र विकास प्राधिकरण अभियंत्यांना आदेशित केले असून, हे काम एक महिन्याच्या आत पूर्ण करून अनुपालन अहवाल सादर करावा, असे कळविले आहे. तसेच नाशिक जिल्‘ात गोदावरी नदीच्या खोर्‍यात जलस्त्रोत आणि झरे पुनरुज्जीवित करून गोदावरी नदी बारमाही प्रवाही ठेवण्यासाठी ॲक्वीफर मॅपिंगची कार्यवाही सत्वर करावी, असे आदेश भूजल सर्वेक्षण विकास प्राधिकरणाला दिले आहेत. त्याचप्रमाणे गोदावरी नदीच्या उगमापासून नाशिक जिल्‘ाच्या हद्दीपर्यंत तसेच त्या लगत असलेल्या शासकीय जमिनीची तातडीने नि:शुल्क नोंदणी करावी आणि एक महिन्यात अनुपालन अहवाल सादर करावा, असे आदेश भूमी अभिलेख विभागाच्या अधीक्षकांना दिले आहेत.
...इन्फो...
आता नि:शुल्क काम करावे लागणार
त्र्यंबकेश्वर येथे नदीपात्रालगत रेषा आखून निषिद्ध ठरविण्याचे आदेश पाटंबधारे खात्यास यापूर्वीच हरित न्यायाधिकरणाने दिले आहेत. तथापि, त्यासाठी त्यांनी १२ लाख रुपयांची मागणी केली होती. त्यामुळे हे काम रखडले होते आता मात्र जिल्हाधिकार्‍यांनीच हे काम नि:शुल्क करावे आदेश दिल्याने त्र्यंबकेश्वर नगरपालिकेला पैसे द्यावे लागणार नाही.