शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: तेजस्वी यादव काँग्रेससोबतच्या बैठकीतून निघून आले; राहुल गांधी, खर्गेंना न भेटताच बिहारला पोहोचले...
2
डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, ‘मोदी चांगले मित्र आहेत’; बाजूलाच उभे असलेले पाकिस्तानचे शाहबाज शरीफ अवाक, व्हिडीओ व्हायरल
3
भारतावर टीका करणाऱ्यांवर डोनाल्ड ट्रम्प खुश; पाकिस्तानच्या जनरलचं पुन्हा कौतुक केलं
4
१ नोव्हेंबरपासून करू शकणार २३९० रुपयांत हवाई प्रवास, या दिग्गज कंपनीनं केली मोठी घोषणा
5
आधी क्रूरपणे अत्याचार, नंतर ५ हजारांची ऑफर; पीडितेचे वडील म्हणाले, "बंगालमध्ये औरंगजेबाचं शासन"
6
राष्ट्रीय महामार्गावरील अस्वच्छ शौचालयाचा फोटो पाठवा, Fastag मध्ये ₹१००० रुपये मिळवा; काय आहे हा प्रकार?
7
५०० वर्षांनी हंस केंद्र त्रिकोण राजयोग: ९ राशींना बोनस, अकल्पनीय लाभ; भाग्योदय-पैसा-भरभराट!
8
लोकल लेट झाल्याने बदलापूर स्थानकात प्रवाशांची प्रचंड गर्दी; गर्दी आवरण्यासाठी रेल्वे सुरक्षा बल स्थानकात
9
Jammu And Kashmir : सैन्याला मोठं यश! जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये २ दहशतवाद्यांचा खात्मा, सर्च ऑपरेशन सुरू
10
उत्पन्न वाढवण्याचा 'मोदी मंत्र'! पंतप्रधानांचा शेतकऱ्यांना सल्ला; ३५,४४० कोटी रुपयांच्या दोन मोठ्या योजना सुरू
11
आजचे राशीभविष्य- १४ ऑक्टोबर २०२५: आर्थिक लाभ होतील, कुटुंबात आनंदी वातावरण राहील!
12
कामगारांसाठी आनंदवार्ता! आता पीएफमधून १००% रक्कम काढता येणार, 'ईपीएफओ'चा निर्णय
13
ड्रॅगनच्या डॅम योजनेला भारत मोठी टक्कर देणार! मोदी सरकारनं तयार केला 77 बिलियन डॉलरचा 'मास्टर प्लॅन'
14
अखेर युद्ध थांबले; हमास-इस्रायल शांतता प्रस्ताव अमलात; २० इस्रायली ओलिसांची सुटका; २ हजार पॅलेस्टाइन बंदिवानही सोडले
15
खड्यांमुळे मृत्यू, तर कुटुंबाला ६ लाख भरपाई; रस्त्यांवरील खड्यांना अधिकारी, कंत्राटदार जबाबदार : उच्च न्यायालय
16
संपूर्ण मुंबईतील वाहतूककोंडी अखेर फुटणार; तब्बल ७० किमी भुयारी मार्गांचे जाळे उभारणार
17
चंद्रशेखरन यांच्या नेतृत्वावर पुन्हा विश्वास; टाटा समूहाचा निवृत्ती धोरणापलीकडचा विचार; टाटा सन्सची मंजुरी अपेक्षित
18
टाटा कॅपिटलची शेअर बाजारात एन्ट्री; मूल्यांकन १.३८ लाख कोटी
19
"मी युद्ध सोडवण्यात तज्ज्ञ..." पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमा वादावर ट्रम्प यांचं भाष्य!
20
अभ्यासाला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, असं आहे वेळापत्रक 

लोकसभेच्या निकालांपूर्वी नेत्यांमधील अंतर्गत विरोधाने वाढवल्या काँग्रेसच्या अडचणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2019 11:47 IST

लोकसभा निवडणुकीच्या निकालांपूर्वी विविध वृत्तवाहिन्यांनी प्रसिद्ध केलेल्या एक्झिट पोलमधील अंदाजांमुळे भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. तर काँग्रेस आणि यूपीएची चिंता वाढवली आहे.

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या निकालांपूर्वी विविध वृत्तवाहिन्यांनी प्रसिद्ध केलेल्या एक्झिट पोलमधील अंदाजांमुळे भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. तर काँग्रेस आणि यूपीएची चिंता वाढवली आहे. मात्र एक्झिट पोलमध्ये वर्तवलेल्या अंदाजानुसार प्रत्यक्ष निकाल लागल्यास काँग्रेसची चिंता दोन पातळ्यांवर वाढणार आहे. एकीकडे केंद्रात सरकार न बनल्यास पक्षाचा संघर्ष अधिकच वाढणार आहे, तर दुसरीकडे काही राज्यांमध्ये सुरू असलेली पक्षांतर्गत गटबाजी रोखण्याचे आव्हान काँग्रेससमोर असेल. जर ही गटबाजी रोखली गेली नाही तर काही राज्यांत काठावरच्या बहुमतासह स्थापन केलेली सरकारे संकटात येऊ शकतात.  पंजाबमध्ये काँग्रेस बहुमतासह सत्तेवर आहे. मात्र मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह आणि कॅबिनेटमंत्री नवज्योत सिंह सिद्धू यांच्यात उघड वाद सुरू आहे. सिद्धू हे मला मुख्यमंत्रिपदावरून हटवून स्वत: मुख्यमंत्री होऊ इच्छित आहे, असे अमरिंदर सिंह यांनी जाहीरपणे सांगितले होते. 

अशीच परिस्थिती मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्येही अशीच परिस्थिती आहे. या दोन्ही राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीदरम्यान सर्व नेत्यांनी दाखवलेले ऐक्य लोकसभा निवडणुकीदरम्यान दिसून आले नाही. राजस्थानमध्ये सचिन पायलट आणि मध्य प्रदेशमध्य ज्योतिरादित्य शिंदे यांच्या समर्थकांनी लाय निवडणुकीत तितक्याशा उत्साहाने काम केले नाही. ज्यांना मुख्यमंत्रिपदासाठी योग्य मानले गेले त्यांच्यावरच पक्षाला निवडणूक जिंकून देण्याची जबाबदारी आहे, असा दावा त्यांच्याकडून करण्यात येत होता. ज्योतिरादित्य शिंदे यांचा राज्यातील वावर कमी करण्यासाठी त्यांना पश्चिम उत्तर प्रदेशच्या प्रभारीपदाची जबाबदारी देण्यात आली. तसेच भाजपाचा बालेकिल्ला असलेल्या भोपाळ लोकसभा मतदारसंघात दिग्विजय सिंह यांना उभे करण्याची कल्पानाही कमलनाथ यांनीच दिली, असे सांगितले जात आहे. काँग्रेसने दणदणीत विजय मिळवलेल्या छत्तीसगडमध्येही अशीच परिस्थिती आहे. त्यामुळे 23 मे रोजी प्रत्यक्ष निकाल हाती आल्यानंतर काय परिस्थिती उदभवेल,याची चिंता काँग्रेस नेतृत्वाला आहे.  

टॅग्स :congressकाँग्रेसLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९PoliticsराजकारणMadhya Pradesh Lok Sabha Election 2019मध्य प्रदेश लोकसभा निवडणूक निकाल 2019Rajasthan Lok Sabha Election 2019राजस्थान लोकसभा निवडणूक निकाल 2019Punjab Lok Sabha Election 2019पंजाब लोकसभा निवडणूक निकाल 2019