शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

अनियंत्रित नागरीकरणामुळे देशात पुराची समस्या - प्रकाश जावडेकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2019 05:50 IST

यंदाच्या पावसाळ््यात देशभरात १९०० जणांचा बळी गेला तसेच ४६ जण बेपत्ता झाले.

नवी दिल्ली : हवामान बदलामुळे नव्हे तर अनियंत्रित नागरीकरणामुळे देशात अनेक ठिकाणी पुराची समस्या उद्भवली आहे. आधीच्या सरकारांच्या चुकीच्या धोरणांमुळे निर्माण झालेली ही समस्या आता मोदी सरकार स्मार्ट सिटी योजनेद्वारे सोडवत आहे असे केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटले आहे.त्यांनी सांगितले की, शहरांचे अधिक उत्तम प्रकारे नियोजन व्हायला हवे होते, मात्र तसे झाले नाही. चंदीगढ, गांधीनगर ही उत्तम नियोजनाने बांधलेली शहरे आहेत. तेथील पाणीनिचऱ्याची व्यवस्थाही चांगली आहे. त्यामुळेच पाणी साचण्याचा प्रश्न उद्भवत नाही.मात्र तसे चित्र अन्य शहरांत दिसत नाही.यंदाच्या पावसाळ््यात देशभरात १९०० जणांचा बळी गेला तसेच ४६ जण बेपत्ता झाले. २२ राज्यांमध्ये पुराने २५ लाख लोकांना तडाखा दिला. महाराष्ट्रामध्ये ३५०, पश्चिम बंगालमध्ये २२०, बिहारमध्ये १६० जणांचा बळी गेला आहे.जावडेकर म्हणाले की, दिल्लीतील ल्यूटन्स भाग १३० वर्षांपूर्वी बांधण्यात आला आहे. त्यानंतर चंदीगढ शहराची उभारणी करण्यात आली. चंदीगढ शहर उभारताना बनविलेले नियम त्यानंतर इतर शहरांची उभारणी करतानाही अंमलात आणायला हवे होते.मात्र तसानिर्णय काही लोकांनी घेतला नाही. ती चूक आता मोदी सरकार सुधारतआहे.भाकीत ठरले खोटे, चित्रपट मात्र चाललासागराची पातळी वाढत असल्याने २१००पर्यंत मुंबई, अंदमान-निकोबार पाण्याखाली बुडण्याची शक्यता आहे असे हवामान बदलाच्या दृष्टिकोनातून समुद्राच्या स्थितीसंदर्भात इंटरगव्हर्मेंटल पॅनेल आॅन क्लायमेट चेंज (आयपीसीसी) या संस्थेच्या अहवालात म्हटले होते. ते निष्कर्ष नाकारताना जावडेकर म्हणाले की, २०१२ साली नैैसर्गिक आपत्तींमुळे पृथ्वीचा विनाश होणार असे भाकित अनेक लोकांनी केले होते. त्यामुळे त्यावर आधारित ‘२०१२ह्ण हा चित्रपट बनविण्यात आला होता. प्रत्यक्षात हे भाकित खोटे ठरले व २०१२ हा चित्रपट मात्र जोरात चालला. हवामान बदल हे वास्तव आहे. हे मानवनिर्मित संकट काही कथित प्रगत देशांमुळे निर्माण झाले आहे असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Prakash Javadekarप्रकाश जावडेकर