शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

अनियंत्रित नागरीकरणामुळे देशात पुराची समस्या - प्रकाश जावडेकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2019 05:50 IST

यंदाच्या पावसाळ््यात देशभरात १९०० जणांचा बळी गेला तसेच ४६ जण बेपत्ता झाले.

नवी दिल्ली : हवामान बदलामुळे नव्हे तर अनियंत्रित नागरीकरणामुळे देशात अनेक ठिकाणी पुराची समस्या उद्भवली आहे. आधीच्या सरकारांच्या चुकीच्या धोरणांमुळे निर्माण झालेली ही समस्या आता मोदी सरकार स्मार्ट सिटी योजनेद्वारे सोडवत आहे असे केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटले आहे.त्यांनी सांगितले की, शहरांचे अधिक उत्तम प्रकारे नियोजन व्हायला हवे होते, मात्र तसे झाले नाही. चंदीगढ, गांधीनगर ही उत्तम नियोजनाने बांधलेली शहरे आहेत. तेथील पाणीनिचऱ्याची व्यवस्थाही चांगली आहे. त्यामुळेच पाणी साचण्याचा प्रश्न उद्भवत नाही.मात्र तसे चित्र अन्य शहरांत दिसत नाही.यंदाच्या पावसाळ््यात देशभरात १९०० जणांचा बळी गेला तसेच ४६ जण बेपत्ता झाले. २२ राज्यांमध्ये पुराने २५ लाख लोकांना तडाखा दिला. महाराष्ट्रामध्ये ३५०, पश्चिम बंगालमध्ये २२०, बिहारमध्ये १६० जणांचा बळी गेला आहे.जावडेकर म्हणाले की, दिल्लीतील ल्यूटन्स भाग १३० वर्षांपूर्वी बांधण्यात आला आहे. त्यानंतर चंदीगढ शहराची उभारणी करण्यात आली. चंदीगढ शहर उभारताना बनविलेले नियम त्यानंतर इतर शहरांची उभारणी करतानाही अंमलात आणायला हवे होते.मात्र तसानिर्णय काही लोकांनी घेतला नाही. ती चूक आता मोदी सरकार सुधारतआहे.भाकीत ठरले खोटे, चित्रपट मात्र चाललासागराची पातळी वाढत असल्याने २१००पर्यंत मुंबई, अंदमान-निकोबार पाण्याखाली बुडण्याची शक्यता आहे असे हवामान बदलाच्या दृष्टिकोनातून समुद्राच्या स्थितीसंदर्भात इंटरगव्हर्मेंटल पॅनेल आॅन क्लायमेट चेंज (आयपीसीसी) या संस्थेच्या अहवालात म्हटले होते. ते निष्कर्ष नाकारताना जावडेकर म्हणाले की, २०१२ साली नैैसर्गिक आपत्तींमुळे पृथ्वीचा विनाश होणार असे भाकित अनेक लोकांनी केले होते. त्यामुळे त्यावर आधारित ‘२०१२ह्ण हा चित्रपट बनविण्यात आला होता. प्रत्यक्षात हे भाकित खोटे ठरले व २०१२ हा चित्रपट मात्र जोरात चालला. हवामान बदल हे वास्तव आहे. हे मानवनिर्मित संकट काही कथित प्रगत देशांमुळे निर्माण झाले आहे असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Prakash Javadekarप्रकाश जावडेकर