शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
4
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
5
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
6
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
7
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
8
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
9
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
10
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
11
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
12
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
13
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
14
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
15
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
16
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
17
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
18
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
19
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
20
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले

अनियंत्रित नागरीकरणामुळे देशात पुराची समस्या - प्रकाश जावडेकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2019 05:50 IST

यंदाच्या पावसाळ््यात देशभरात १९०० जणांचा बळी गेला तसेच ४६ जण बेपत्ता झाले.

नवी दिल्ली : हवामान बदलामुळे नव्हे तर अनियंत्रित नागरीकरणामुळे देशात अनेक ठिकाणी पुराची समस्या उद्भवली आहे. आधीच्या सरकारांच्या चुकीच्या धोरणांमुळे निर्माण झालेली ही समस्या आता मोदी सरकार स्मार्ट सिटी योजनेद्वारे सोडवत आहे असे केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटले आहे.त्यांनी सांगितले की, शहरांचे अधिक उत्तम प्रकारे नियोजन व्हायला हवे होते, मात्र तसे झाले नाही. चंदीगढ, गांधीनगर ही उत्तम नियोजनाने बांधलेली शहरे आहेत. तेथील पाणीनिचऱ्याची व्यवस्थाही चांगली आहे. त्यामुळेच पाणी साचण्याचा प्रश्न उद्भवत नाही.मात्र तसे चित्र अन्य शहरांत दिसत नाही.यंदाच्या पावसाळ््यात देशभरात १९०० जणांचा बळी गेला तसेच ४६ जण बेपत्ता झाले. २२ राज्यांमध्ये पुराने २५ लाख लोकांना तडाखा दिला. महाराष्ट्रामध्ये ३५०, पश्चिम बंगालमध्ये २२०, बिहारमध्ये १६० जणांचा बळी गेला आहे.जावडेकर म्हणाले की, दिल्लीतील ल्यूटन्स भाग १३० वर्षांपूर्वी बांधण्यात आला आहे. त्यानंतर चंदीगढ शहराची उभारणी करण्यात आली. चंदीगढ शहर उभारताना बनविलेले नियम त्यानंतर इतर शहरांची उभारणी करतानाही अंमलात आणायला हवे होते.मात्र तसानिर्णय काही लोकांनी घेतला नाही. ती चूक आता मोदी सरकार सुधारतआहे.भाकीत ठरले खोटे, चित्रपट मात्र चाललासागराची पातळी वाढत असल्याने २१००पर्यंत मुंबई, अंदमान-निकोबार पाण्याखाली बुडण्याची शक्यता आहे असे हवामान बदलाच्या दृष्टिकोनातून समुद्राच्या स्थितीसंदर्भात इंटरगव्हर्मेंटल पॅनेल आॅन क्लायमेट चेंज (आयपीसीसी) या संस्थेच्या अहवालात म्हटले होते. ते निष्कर्ष नाकारताना जावडेकर म्हणाले की, २०१२ साली नैैसर्गिक आपत्तींमुळे पृथ्वीचा विनाश होणार असे भाकित अनेक लोकांनी केले होते. त्यामुळे त्यावर आधारित ‘२०१२ह्ण हा चित्रपट बनविण्यात आला होता. प्रत्यक्षात हे भाकित खोटे ठरले व २०१२ हा चित्रपट मात्र जोरात चालला. हवामान बदल हे वास्तव आहे. हे मानवनिर्मित संकट काही कथित प्रगत देशांमुळे निर्माण झाले आहे असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Prakash Javadekarप्रकाश जावडेकर