शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
2
जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण...
3
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
4
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
5
दोन वर्षाच्या मुलीसह अख्ख कुटुंब मृतावस्थेत आढळल्याने खळबळ; ५ जणांसोबत नेमकं काय घडलं? 
6
अभिनेत्रीला अश्लील मेसेज करणारा तो युवा नेता कोण? समोर आली धक्कादायक माहिती, राष्ट्रीय पक्षाशी संबंध 
7
4 वर्षांत तीन वेळा प्रेग्नंट, तुरुंगवासाची शिक्षा टाळण्यासाठी महिलेने भलताच मार्ग अवलंबला...! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
8
Mumbai Crime: 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार
9
श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्या का म्हणतात? त्याच दिवशी असतो पोळा आणि मातृदिन
10
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
11
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर
12
ऑनलाइन गेमिंग विधेयकावरुन अनुपम मित्तल यांची सरकारवर टीका; म्हणाले 'या निर्णयामुळे थेट...'
13
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! १ ऑक्टोबरपासून 'हे' महत्त्वाचे फीचर कायमस्वरूपी बंद होणार
14
श्रावण शनि अमावास्या: शनिदोष, प्रतिकूल प्रभाव कसा ओळखावा? ‘हे’ ५ उपाय तारतील, कृपा होईल!
15
हा पी अर्जुन तेंडुलकर कोण? तुफानी खेळीत १२ चेंडूत ३ चौकार, ३ षटकार ठोकले; मुंबई इंडियन्सच्या नजरेत भरला?...
16
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
17
विद्यार्थ्याच्या हत्येवरून अहमदाबाद तापले, रस्त्यावर उतरले हजारो लोक, पोलीस आणि NSUI मध्ये वादावादी
18
युद्ध थांबण्याचे नाव नाही! रशियाचा युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला; एकाच वेळी डागली ४० क्षेपणास्त्र
19
छत गळतेय, उंदीर फिरतात आणि वीज नसते; इमरान खान यांच्या पत्नी बुशरा बीबींची तुरुंगात दयनीय अवस्था
20
Viral Video: लोणावळ्यात मद्यधुंद महिलांमध्ये फ्री-स्टाईलमध्ये हाणामारी; पोलीस आल्यानंतरही थांबल्या नाहीत!

अनियंत्रित नागरीकरणामुळे देशात पुराची समस्या - प्रकाश जावडेकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2019 05:50 IST

यंदाच्या पावसाळ््यात देशभरात १९०० जणांचा बळी गेला तसेच ४६ जण बेपत्ता झाले.

नवी दिल्ली : हवामान बदलामुळे नव्हे तर अनियंत्रित नागरीकरणामुळे देशात अनेक ठिकाणी पुराची समस्या उद्भवली आहे. आधीच्या सरकारांच्या चुकीच्या धोरणांमुळे निर्माण झालेली ही समस्या आता मोदी सरकार स्मार्ट सिटी योजनेद्वारे सोडवत आहे असे केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटले आहे.त्यांनी सांगितले की, शहरांचे अधिक उत्तम प्रकारे नियोजन व्हायला हवे होते, मात्र तसे झाले नाही. चंदीगढ, गांधीनगर ही उत्तम नियोजनाने बांधलेली शहरे आहेत. तेथील पाणीनिचऱ्याची व्यवस्थाही चांगली आहे. त्यामुळेच पाणी साचण्याचा प्रश्न उद्भवत नाही.मात्र तसे चित्र अन्य शहरांत दिसत नाही.यंदाच्या पावसाळ््यात देशभरात १९०० जणांचा बळी गेला तसेच ४६ जण बेपत्ता झाले. २२ राज्यांमध्ये पुराने २५ लाख लोकांना तडाखा दिला. महाराष्ट्रामध्ये ३५०, पश्चिम बंगालमध्ये २२०, बिहारमध्ये १६० जणांचा बळी गेला आहे.जावडेकर म्हणाले की, दिल्लीतील ल्यूटन्स भाग १३० वर्षांपूर्वी बांधण्यात आला आहे. त्यानंतर चंदीगढ शहराची उभारणी करण्यात आली. चंदीगढ शहर उभारताना बनविलेले नियम त्यानंतर इतर शहरांची उभारणी करतानाही अंमलात आणायला हवे होते.मात्र तसानिर्णय काही लोकांनी घेतला नाही. ती चूक आता मोदी सरकार सुधारतआहे.भाकीत ठरले खोटे, चित्रपट मात्र चाललासागराची पातळी वाढत असल्याने २१००पर्यंत मुंबई, अंदमान-निकोबार पाण्याखाली बुडण्याची शक्यता आहे असे हवामान बदलाच्या दृष्टिकोनातून समुद्राच्या स्थितीसंदर्भात इंटरगव्हर्मेंटल पॅनेल आॅन क्लायमेट चेंज (आयपीसीसी) या संस्थेच्या अहवालात म्हटले होते. ते निष्कर्ष नाकारताना जावडेकर म्हणाले की, २०१२ साली नैैसर्गिक आपत्तींमुळे पृथ्वीचा विनाश होणार असे भाकित अनेक लोकांनी केले होते. त्यामुळे त्यावर आधारित ‘२०१२ह्ण हा चित्रपट बनविण्यात आला होता. प्रत्यक्षात हे भाकित खोटे ठरले व २०१२ हा चित्रपट मात्र जोरात चालला. हवामान बदल हे वास्तव आहे. हे मानवनिर्मित संकट काही कथित प्रगत देशांमुळे निर्माण झाले आहे असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Prakash Javadekarप्रकाश जावडेकर