शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

शेतकऱ्यांचे प्रश्न जगाला कळले, सरकारचे दुर्लक्ष; केरळमध्ये काँग्रेसची ट्रॅक्टर रॅली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2021 00:04 IST

राहुल गांधी यांची टीका, केरळमध्ये काँग्रेसची ट्रॅक्टर रॅली

वायनाड : भारतातील शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे त्यांच्या व्यथा संपूर्ण जगाच्या लक्षात आल्या आहेत. सारे जग शेतकरी आंदोलनाकडे सहानुभूतीने पाहत आहे. पण, केंद्रातील मोदी सरकार मात्र शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करीत आहे, अशी टीका काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सोमवारी येथे केली. 

काँग्रेसतर्फे केरळमध्ये काढण्यात आलेल्या सहा किलोमीटरच्या ट्रॅक्टर रॅलीत राहुल गांधी सहभागी झाले  होते. त्यानंतर झालेल्या सभेत ते म्हणाले की, भारतात शेती हा सर्वांत मोठा म्हणजे तब्बल ४० लाख कोटी रुपयांचा व्यवसाय आहे.  शेतकऱ्यांच्या जिवावरच हा देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला आहे. पण, शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्याचे काम मोदी सरकार करीत आहे. हा सारा व्यवसाय आपल्या दोन मित्रांच्या हाती सोपविण्यासाठीच तिन्ही कृषी कायदे करण्यात आले आहेत. 

हे काळे कायदे रद्द व्हावेत, यासाठी जनतेने मोदी सरकारवर दबाव आणायला हवा, असे आवाहन करून राहुल गांधी म्हणाले की, शेतकऱ्यांचे प्रश्न, समस्या जगाला समजल्या, कलाकारांना लक्षात आल्या. पण, सरकार त्याकडे सातत्याने दुर्लक्ष करीत आहे. कारण त्यांना शेतकऱ्यांचे नव्हे, तर आपल्या काही मित्रांचेच भले करण्याची इच्छा आहे. (वृत्तसंस्था)

शेतकरी जगायलाच हवा

मोदी सरकार सतत भारतमातेच्या नावाचा जयघोष करते. तो सर्वांनीच करायला हवा. पण, या भारतमातेसाठी शेती हाच एकमेव सर्वांत मोठा व्यवसाय असून, तो टिकायला हवा, शेतकरी जगायला हवा. पण पंतप्रधान मोदी यांच्या सरकारचे सारे निर्णय मात्र शेती व शेतकरी यांच्या विरोधातील आहेत. - राहुल गांधी

टॅग्स :congressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधी