शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

मजुरांच्या बसवरून प्रियांका गांधी- योगी आदित्यनाथ संघर्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2020 01:14 IST

मजुरांना घरी पाठविण्यासाठी एक हजार बसेस चालविण्यास राज्य सरकारने परवानगी द्यावी, या मागणीवर प्रियांका गांधी आग्रही आहेत.

- शीलेश शर्मानवी दिल्ली : स्थलांतरित मजुरांना गावी पाठविण्यासाठी बसेस चालविण्यावरून काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यात राजकीय संघर्ष जुंपला आहे. या मजुरांना घरी पाठविण्यासाठी एक हजार बसेस चालविण्यास राज्य सरकारने परवानगी द्यावी, या मागणीवर प्रियांका गांधी आग्रही आहेत. तथापि, उत्तर प्रदेश सरकार काँग्रेसला यासाठी परवानगी देण्यास कचरत आहे. या मुद्यांवरून काँग्रेस आणि उत्तर प्रदेश सरकारदरम्यान कोंडी कायम असताना प्रियांका गांधी यांचे खाजगी सचिव संदीप सिंह यांनी आज मंगळवारी उत्तर प्रदेशच्या गृहविभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अवनीश कुमार अवस्थी यांना पत्र पाठवून सर्व बसेस चालविण्यास परवानगी देण्याची मागणी केली आहे. राज्य सरकारने भूमिका बदलत मंगळवारी रात्री पत्र पाठवून काँग्रेसला बसगाड्यांचे नंबर, चालक आदीची तपशीलवार माहिती देण्यास सांगितले. काँग्रेसकडून ही माहिती देण्यात आल्यानंतर राज्य सरकारने एक हजार बसेस लखनौला पाठविण्यास सांगितले. प्रियांका गांधी यांनीही तातडीने सरकारला पत्र पाठवून कळविले की, एवढ्या कमी वेळेत बसेस लखनौला पोहोचू शकत नाहीत.बसेस नॉयडा, गाझियाबादला पाठविता येतील.उत्तर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अजय कुमार लल्लू यांनीही या मुद्यावरून राज्य सरकार राजकारण करीत असल्याचा आरोप केला. सरकार लोकांची दिशाभूल करीत आहे. राजकारण खेळण्यासाठी जाणूनबुजून वाहनांचे नंबर खोटे असल्याचे भासविण्यात आले. आम्ही बससेचे नंबर सार्वजनिक करू शकतो, सरकारने हवी तर शहानिशा करावी, असेही ते म्हणाले.काँग्रेस आणि राज्य सरकारदरम्यान सोमवारी रात्री २.१० वाजेपर्यंत पत्रव्यवहार सुरू होता. त्यानंतरही स्थिती ‘जैसे थे’ आहे. अतिरिक्त मुख्य गृहसचिव अवनीश कुमार अवस्थी यांनी दिलेली सर्व पत्रे काँग्रेस सोशल मीडियावरून सार्वजनिक करीत आहेत. बसेस सध्या उंचा नगला, आग्रा आणि उत्तर प्रदेशच्या सीमेवर परवानगीच्या प्रतीक्षेत उभ्या आहेत.आरोप-प्रत्यारोपस्थलांतरित मजुरांसाठी बसेसची व्यवस्था करण्यावरून राज्य सरकार आणि काँग्रेसदरम्यान आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. या मुद्यावरून काँग्रेस राजकारण करीत आहे, असा आरोप उत्तर प्रदेशचे मंत्री सिद्धार्थ नाथ सिंह यांनी केला.ते म्हणाले की, काँग्रेसने दिलेल्या बसेसच्या यादीबाबत शहानिशा केली असता त्यात दुचाकी वाहने, आॅटो, मालवाहक गाड्यांचा समावेश असल्याचे कळले. ही बाब दुर्दैवी आहे. अशी फसवणूक कशासाठी? याचे काँग्रेस अध्यक्षांनी उत्तर दिले पाहिजे.

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीyogi adityanathयोगी आदित्यनाथ