शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
3
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
4
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
5
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
6
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
7
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
8
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
9
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
10
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
11
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
12
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
13
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
14
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
15
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
16
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
17
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
18
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
19
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
20
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)

मजुरांच्या बसवरून प्रियांका गांधी- योगी आदित्यनाथ संघर्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2020 01:14 IST

मजुरांना घरी पाठविण्यासाठी एक हजार बसेस चालविण्यास राज्य सरकारने परवानगी द्यावी, या मागणीवर प्रियांका गांधी आग्रही आहेत.

- शीलेश शर्मानवी दिल्ली : स्थलांतरित मजुरांना गावी पाठविण्यासाठी बसेस चालविण्यावरून काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यात राजकीय संघर्ष जुंपला आहे. या मजुरांना घरी पाठविण्यासाठी एक हजार बसेस चालविण्यास राज्य सरकारने परवानगी द्यावी, या मागणीवर प्रियांका गांधी आग्रही आहेत. तथापि, उत्तर प्रदेश सरकार काँग्रेसला यासाठी परवानगी देण्यास कचरत आहे. या मुद्यांवरून काँग्रेस आणि उत्तर प्रदेश सरकारदरम्यान कोंडी कायम असताना प्रियांका गांधी यांचे खाजगी सचिव संदीप सिंह यांनी आज मंगळवारी उत्तर प्रदेशच्या गृहविभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अवनीश कुमार अवस्थी यांना पत्र पाठवून सर्व बसेस चालविण्यास परवानगी देण्याची मागणी केली आहे. राज्य सरकारने भूमिका बदलत मंगळवारी रात्री पत्र पाठवून काँग्रेसला बसगाड्यांचे नंबर, चालक आदीची तपशीलवार माहिती देण्यास सांगितले. काँग्रेसकडून ही माहिती देण्यात आल्यानंतर राज्य सरकारने एक हजार बसेस लखनौला पाठविण्यास सांगितले. प्रियांका गांधी यांनीही तातडीने सरकारला पत्र पाठवून कळविले की, एवढ्या कमी वेळेत बसेस लखनौला पोहोचू शकत नाहीत.बसेस नॉयडा, गाझियाबादला पाठविता येतील.उत्तर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अजय कुमार लल्लू यांनीही या मुद्यावरून राज्य सरकार राजकारण करीत असल्याचा आरोप केला. सरकार लोकांची दिशाभूल करीत आहे. राजकारण खेळण्यासाठी जाणूनबुजून वाहनांचे नंबर खोटे असल्याचे भासविण्यात आले. आम्ही बससेचे नंबर सार्वजनिक करू शकतो, सरकारने हवी तर शहानिशा करावी, असेही ते म्हणाले.काँग्रेस आणि राज्य सरकारदरम्यान सोमवारी रात्री २.१० वाजेपर्यंत पत्रव्यवहार सुरू होता. त्यानंतरही स्थिती ‘जैसे थे’ आहे. अतिरिक्त मुख्य गृहसचिव अवनीश कुमार अवस्थी यांनी दिलेली सर्व पत्रे काँग्रेस सोशल मीडियावरून सार्वजनिक करीत आहेत. बसेस सध्या उंचा नगला, आग्रा आणि उत्तर प्रदेशच्या सीमेवर परवानगीच्या प्रतीक्षेत उभ्या आहेत.आरोप-प्रत्यारोपस्थलांतरित मजुरांसाठी बसेसची व्यवस्था करण्यावरून राज्य सरकार आणि काँग्रेसदरम्यान आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. या मुद्यावरून काँग्रेस राजकारण करीत आहे, असा आरोप उत्तर प्रदेशचे मंत्री सिद्धार्थ नाथ सिंह यांनी केला.ते म्हणाले की, काँग्रेसने दिलेल्या बसेसच्या यादीबाबत शहानिशा केली असता त्यात दुचाकी वाहने, आॅटो, मालवाहक गाड्यांचा समावेश असल्याचे कळले. ही बाब दुर्दैवी आहे. अशी फसवणूक कशासाठी? याचे काँग्रेस अध्यक्षांनी उत्तर दिले पाहिजे.

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीyogi adityanathयोगी आदित्यनाथ