शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

भारत जोडो न्याय यात्रेत प्रियंका सामील; अखिलेश यादव आज सहभागी होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2024 07:31 IST

प्रियांका उत्तर प्रदेशातील चंदौली येथून यात्रेत सहभागी होणार होत्या, परंतु प्रकृती अस्वास्थ्यामुळे आणि त्यानंतर रुग्णालयात दाखल झाल्यामुळे त्या येऊ शकल्या नाहीत.

लखनौ : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो न्याय यात्रा शनिवारी उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथून पुन्हा सुरू झाली. यावेळी त्यांच्यासोबत  काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी राज्यातील यात्रेच्या अंतिम टप्प्यात सामील झाल्या. या यात्रेत पहिल्यांदाच गांधी भाऊ बहीण एकत्र दिसले. ही यात्रा अमरोहा, संभल, बुलंदशहर, अलीगढ, हाथरस, आग्रा यामार्गे जात राजस्थानच्या धोलपूर येथे रविवारी मुक्काम करेल. यात्रा मुरादाबादच्या विविध भागांतून जात असताना लोकांनी ‘राहुल गांधी जिंदाबाद’, ‘प्रियंका गांधी जिंदाबाद’ आणि ‘काँग्रेस पक्ष जिंदाबाद’ अशा घोषणा दिल्या. 

दोन्ही काँग्रेस नेते उघड्या जीपमधून लोकांना अभिवादन करत होते. प्रियांका उत्तर प्रदेशातील चंदौली येथून यात्रेत सहभागी होणार होत्या, परंतु प्रकृती अस्वास्थ्यामुळे आणि त्यानंतर रुग्णालयात दाखल झाल्यामुळे त्या येऊ शकल्या नाहीत. समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव रविवारी आग्रा येथून यात्रेत सामील होणार आहेत. लोकसभेसाठी दोन्ही पक्षांनी उत्तर प्रदेशात जागावाटप अंतिम केल्यांनतर अखिलेश यात्रेत येत आहे. काँग्रेसने स्पष्ट केले की, २६ फेब्रुवारी ते १ मार्चदरम्यान यात्रेला विश्राम असेल, जेणेकरून राहुल यांना २७ आणि २८ फेब्रुवारी रोजी ब्रिटनमधील केंब्रिज विद्यापीठात दोन विशेष व्याख्याने देता येतील. या काळात ते नवी दिल्लीतील महत्त्वाच्या बैठकांनाही हजेरी लावणार आहेत. ही यात्रा २ मार्च रोजी दुपारी २ वाजता राजस्थान येथील धोलपूरमधून पुन्हा सुरू होईल. 

राहुल गांधी यांची याचिका फेटाळलीरांची : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याविरोधात केलेल्या टिप्पणी प्रकरणातील तक्रार रद्द करण्यासाठी काॅंग्रेस नेते राहुल गांधी यांनी दाखल केलेली याचिका झारखंड उच्च न्यायालयाने फेटाळली. २०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी राहुल गांधी यांनी शाह यांच्यावर केलेल्या आरोपाप्रकरणी भाजप नेते नवीन झा यांनी जिल्हा न्यायालयात याचिका दाखल केली होती. या प्रकरणी याचिकाकर्ते व राहुल गांधी यांना ४ फेब्रुवारीला न्यायालयापुढे हजर राहण्याचे आदेश दिले. कनिष्ठ न्यायालयाने आपली भूमिका ऐकल्याशिवाय निर्णय देऊ नये, यासाठी राहुल गांधी यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीBharat Jodo Yatraभारत जोडो यात्राcongressकाँग्रेस