शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांवरून प्रियंका गांधींची योगी सरकारवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2020 11:52 IST

अशा घटना घडत असताना सरकार कुठे आहे? असा सवाला त्यांनी यावेळी उपस्थित केला.

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांवरून काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी योगी सरकारवर निशाणा साधला आहे. भाजपच्या राजवटीत महिलांवरील गुन्ह्यांचा आलेख वाढला आहे, परंतु राज्य सरकार याची जवाबदारी घेत नसल्याचा आरोप प्रियंका यांनी केला आहे. प्रियंका गांधी यांनी ट्वीट करत हे आरोप केले आहे.

प्रियंका गांधी यांनी महिला अत्याचाराच्या मुद्यावरून भाजप आणि योगी सरकारवर टीका केली आहे. उत्तर प्रदेशातील महिला अत्याचाराच्या घटना देवसेंदिवस वाढत आहे. अशा घटना रोज घडत असल्याचे समोर येत आहे. तर फिरोजाबादमध्ये पीडित मुलीच्या वडिलांची हत्या करण्यात आली. तसेच सीतापुरात मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. अशा घटना घडत असताना सरकार कुठे आहे? असा सवाला त्यांनी यावेळी उपस्थित केला.

प्रियंका गांधी ह्या उत्तर प्रदेशची काँग्रेसच्या प्रभारी असून सोशल मीडियाच्या माध्यमातून योगी सरकारवर त्या सतत निशाणा साधत असल्याचे पाहायला मिळत आहे. तर गेल्या काही दिवसांपासून त्या सतत उत्तर प्रदेशच्या दौर्‍यावर जात असल्याचे सुद्धा पाहायला मिळत आहे. स्थानिक नेत्यांच्या भेटीगाठी घेऊन त्या विधानसभा निवडणुकांसाठी रणनीती तयार करत असल्याचे सुद्धा बोलले जात आहे.