शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

Priyanka Gandhi Bharat Jodo Yatra:“भारत जोडो यात्रा आशेचा नवा किरण, देशाला एका नव्या वाटेवर घेऊन जाईल”: प्रियंका गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2023 15:41 IST

Priyanka Gandhi Bharat Jodo Yatra: खुल्या मनाने भारत जोडो यात्रेचे स्वागत केल्याबाबत प्रियंका गांधींनी जम्मू-काश्मीरच्या जनतेला धन्यवाद दिले.

Priyanka Gandhi Bharat Jodo Yatra: काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा १४५ दिवस, १२ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधून जम्मू काश्मीरमधल्या श्रीनगर येथे पोहोचली आहे. याच ठिकाणी आता भारत जोडो यात्रेची सांगता होत आहे. या समारोपासाठी देशभरातील काँग्रेसचे नेते आणि इतर विविध पक्षांचे नेते उपस्थित राहिले. राहुल गांधी यांच्या भगिनी काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी समारोप सभेला उपस्थित राहिल्या. यावेळी जनतेला संबोधित करताना, भारत जोडो यात्रा नवा आशेचा किरण असून, देशाला एका नव्या वाटेवर घेऊन जाईल, असा विश्वास व्यक्त केला. 

यावेळी प्रियंका गांधी म्हणाल्या की, संपूर्ण देशाने भारत जोडो यात्रेला पाहिलं आणि समर्थनही दिलं. आज देशात जी राजकीय परिस्थिती आहे, त्यातून देशाचे भले होणार नाही. ही यात्रा एक अध्यात्मिक यात्रा राहिली असे मला वाटतं. सत्य, अहिंसा आणि बंधुतेच्या आधारावर हा देश बनला. ही मूल्य आपण जपली पाहीजेत. भारत जोडो यात्रेने आपल्याला प्रेम आणि एकतेचा रस्ता दाखवला आहे, असे प्रियंका गांधी यांनी सांगितले. तसेच या देशाला एक नवा आशेचा किरण दाखवला आहे. हा आशेचा किरणच देशाला एका नव्या वाटेवर घेऊन जाईल, असा विश्वास प्रियंका गांधी व्यक्त केला. 

जम्मू आणि काश्मीरच्या जनतेला धन्यवाद

या देशाच्या संविधानासाठी प्रत्येक भारतीय नागरिकाच्या मनात आदर आहे. जम्मू आणि काश्मीरच्या जनतेला धन्यवाद देऊ इच्छिते की, त्यांनी खुल्या मनाने भारत जोडो यात्रेचे स्वागत केले. जेव्हा माझा भाऊ काश्मीरकडे येत होता, तेव्हा माझ्या आईला आणि मला त्यांनी मेसेज केला. ते म्हणाले की, काश्मीरमध्ये जाताना मी आपल्या घरी जातोय असे वाटतेय. माझ्या घरातील लोक माझी वाट पाहतायत. त्यांची आणि माझी गळाभेट झाल्यानंतर मी घरातल्या लोकांना भेटलो असे वाटतेय, असे प्रियंका गांधी यांनी सांगितले.

दरम्यान, याच भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी भाजप आणि केंद्रातील मोदी सरकारवर घणाघाती टीका केली. जम्मू-काश्मीरमध्ये भाजपचा कोणताही नेता माझ्यासारखा चार दिवस पायी प्रवास करू शकत नाही.  जम्मू-काश्मीरचे लोक त्यांना फिरू देणार नाहीत, असे नाही. तर, भाजपचे लोक घाबरट आहेत, या शब्दांत राहुल गांधी यांनी निशाणा साधला. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीBharat Jodo Yatraभारत जोडो यात्राJammu Kashmirजम्मू-काश्मीरcongressकाँग्रेस