शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

महिलांनी संरक्षणाची अपेक्षा कोणाकडून करायची? प्रियंका गांधी यांचा संतप्त सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2024 18:49 IST

देशातल्या अत्याचारांच्या घटनांवर तीव्र नाराजी व्यक्त करत या क्रौर्याने देशाला धक्का बसल्याचे प्रियंका गांधी यांनी म्हटले आहे

Priyanka Gandhi : पश्चिम बंगाल, बिहार, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशमध्ये महिलांवरील अत्याचाराच्या घटनांनी संपूर्ण देश हादरला आहे, असे म्हणत काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वाड्रा यांनी सरकारवर हल्लाबोल केला. देशात आरोपींना राजकीय संरक्षण दिले जात असताना महिलांच्या सुरक्षेची काय अपेक्षा करता येईल, असा सवाल प्रियंका गांधी यांनी केला. प्रियंका गांधी वड्रा यांनी शुक्रवारी कोलकाता येथील महिला डॉक्टरची क्रूरता आणि हत्या आणि देशातील महिलांवरील अत्याचाराच्या इतर घटनांबाबत शुक्रवारी ट्विट करत रोष व्यक्त केला.

देशातल्या अत्याचारांच्या घटनांवर तीव्र नाराजी व्यक्त करत या क्रौर्याने देशाला धक्का बसल्याचे प्रियंका गांधी यांनी म्हटले आहे. अशा प्रकरणांमध्ये वारंवार आरोपींना राजकीय संरक्षण आणि गुन्हेगारांना जामीन किंवा पॅरोल देणे यामुळे महिलांचे मनोधैर्य खचते. रोज ८६ बलात्कार होत असल्याचे सरकारी आकडे दाखवतात तेव्हा महिलांनी संरक्षणाची अपेक्षा कोणाकडून करायची? असा सवाल प्रियंका गांधी यांनी केला.

"कोलकाता, बिहार, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशमध्ये महिलांवरील अत्याचाराने संपूर्ण देश हादरला आहे. यावेळी देशभरातील महिला दु:खी आणि संतप्त आहेत. जेव्हा-जेव्हा अशा घटना घडतात तेव्हा देशातील महिला बघतात की सरकारे काय करत आहेत? त्यांचे शब्द आणि उपाय किती गंभीर आहेत? ज्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षेबाबत ठोस संदेश देण्याची गरज होती, त्याठिकाणी आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करण्यात आला. महिलांवरील घृणास्पद अत्याचारांच्या प्रकरणांमध्ये उदारता दाखवणे, आरोपींना राजकीय संरक्षण देणे आणि शिक्षा झालेल्या कैद्यांना जामीन/पॅरोल देणे यासारख्या वारंवार केल्या जाणाऱ्या कृतींमुळे महिलांना निराश केलं जात आहे. यातून देशातील महिलांना काय संदेश जातो? सरकारी आकडेवारीत रोज ८६ बलात्कार होत असताना महिलांनी संरक्षणाची अपेक्षा कोणाकडून करायची?," असे प्रियंका गांधी यांनी म्हटलं.

गेल्या काही दिवसांत महिला अत्याचारांवर घडलेल्या घटनांचा प्रियंका गांधी यांनी उल्लेख केला आहे. ९ ऑगस्ट रोजी कोलकाता येथील सरकारी आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये महिला प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर भीषण बलात्कार आणि हत्या करण्यात आली होती. तर उत्तराखंडमधील रुद्रपूरमध्ये एका खाजगी रुग्णालयातील नर्सवर बलात्कार करून तिचा चेहरा दगडाने ठेचून खून करण्यात आला होता. बिहारमधील मुझफ्फरपूर जिल्ह्यात एका १४ वर्षीय मुलीचे तिच्या घरातून अपहरण करण्यात आले आणि तिचा मृतदेह तलावात सापडला होता. 

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीCrime Newsगुन्हेगारी