शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
3
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
4
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
5
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
6
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
7
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
8
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
9
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
10
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
12
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
13
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
14
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
15
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
16
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
17
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
18
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
19
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
Daily Top 2Weekly Top 5

महिलांनी संरक्षणाची अपेक्षा कोणाकडून करायची? प्रियंका गांधी यांचा संतप्त सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2024 18:49 IST

देशातल्या अत्याचारांच्या घटनांवर तीव्र नाराजी व्यक्त करत या क्रौर्याने देशाला धक्का बसल्याचे प्रियंका गांधी यांनी म्हटले आहे

Priyanka Gandhi : पश्चिम बंगाल, बिहार, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशमध्ये महिलांवरील अत्याचाराच्या घटनांनी संपूर्ण देश हादरला आहे, असे म्हणत काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वाड्रा यांनी सरकारवर हल्लाबोल केला. देशात आरोपींना राजकीय संरक्षण दिले जात असताना महिलांच्या सुरक्षेची काय अपेक्षा करता येईल, असा सवाल प्रियंका गांधी यांनी केला. प्रियंका गांधी वड्रा यांनी शुक्रवारी कोलकाता येथील महिला डॉक्टरची क्रूरता आणि हत्या आणि देशातील महिलांवरील अत्याचाराच्या इतर घटनांबाबत शुक्रवारी ट्विट करत रोष व्यक्त केला.

देशातल्या अत्याचारांच्या घटनांवर तीव्र नाराजी व्यक्त करत या क्रौर्याने देशाला धक्का बसल्याचे प्रियंका गांधी यांनी म्हटले आहे. अशा प्रकरणांमध्ये वारंवार आरोपींना राजकीय संरक्षण आणि गुन्हेगारांना जामीन किंवा पॅरोल देणे यामुळे महिलांचे मनोधैर्य खचते. रोज ८६ बलात्कार होत असल्याचे सरकारी आकडे दाखवतात तेव्हा महिलांनी संरक्षणाची अपेक्षा कोणाकडून करायची? असा सवाल प्रियंका गांधी यांनी केला.

"कोलकाता, बिहार, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशमध्ये महिलांवरील अत्याचाराने संपूर्ण देश हादरला आहे. यावेळी देशभरातील महिला दु:खी आणि संतप्त आहेत. जेव्हा-जेव्हा अशा घटना घडतात तेव्हा देशातील महिला बघतात की सरकारे काय करत आहेत? त्यांचे शब्द आणि उपाय किती गंभीर आहेत? ज्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षेबाबत ठोस संदेश देण्याची गरज होती, त्याठिकाणी आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करण्यात आला. महिलांवरील घृणास्पद अत्याचारांच्या प्रकरणांमध्ये उदारता दाखवणे, आरोपींना राजकीय संरक्षण देणे आणि शिक्षा झालेल्या कैद्यांना जामीन/पॅरोल देणे यासारख्या वारंवार केल्या जाणाऱ्या कृतींमुळे महिलांना निराश केलं जात आहे. यातून देशातील महिलांना काय संदेश जातो? सरकारी आकडेवारीत रोज ८६ बलात्कार होत असताना महिलांनी संरक्षणाची अपेक्षा कोणाकडून करायची?," असे प्रियंका गांधी यांनी म्हटलं.

गेल्या काही दिवसांत महिला अत्याचारांवर घडलेल्या घटनांचा प्रियंका गांधी यांनी उल्लेख केला आहे. ९ ऑगस्ट रोजी कोलकाता येथील सरकारी आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये महिला प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर भीषण बलात्कार आणि हत्या करण्यात आली होती. तर उत्तराखंडमधील रुद्रपूरमध्ये एका खाजगी रुग्णालयातील नर्सवर बलात्कार करून तिचा चेहरा दगडाने ठेचून खून करण्यात आला होता. बिहारमधील मुझफ्फरपूर जिल्ह्यात एका १४ वर्षीय मुलीचे तिच्या घरातून अपहरण करण्यात आले आणि तिचा मृतदेह तलावात सापडला होता. 

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीCrime Newsगुन्हेगारी