शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

"योगीजी... तुमची कायदाव्यवस्था झोपलीय"; 'तो' धक्कादायक Video शेअर करत प्रियंका गांधी संतापल्या  

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2021 15:17 IST

Congress Priyanka Gandhi And Yogi Adityanath : काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

नवी दिल्ली - उत्तर प्रदेशमध्ये राजकीय वातावरण तापू लागलं आहे. अमेठीमधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला होता. या व्हिडीओमुळे उत्तर प्रदेशमध्ये संतापाचे वातावरण आहे. विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने देखील टीकास्त्र सोडलं आहे. याच दरम्यान काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी (Congress Priyanka Gandhi) यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. या धक्कादायक घटनेचा एक व्हिडीओ प्रियंका गांधी यांनी ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे. तसेच गुन्हेगारांवर कारवाईची मागणी केली आहे. 

प्रियंका गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट करत योगी आदित्यनाथ यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. योगी सरकारला 24 तासांचा अल्टीमेटम दिला आहे. "अमेठीमध्ये मुलीला निर्दयपणे मारहाण झाल्याचा हा प्रकार निंदनीय आहे. योगी आदित्यनाथजी, तुमच्या राज्यात दररोज दलितांच्या विरोधात सरासरी 34 तर महिलांच्या विरोधात 135 गुन्ह्यांची नोंद होत आहे. तरीदेखील तुमची कायदाव्यवस्था झोपली आहे" असं प्रियंका गांधी यांनी म्हटलं आहे. 

"जर 24 तासांच्या आत या अमानवी कृत्य करणाऱ्या अपराध्यांना अटक केली नाही, तर काँग्रेस पक्षाकडून जोरदार आंदोलन करून तुम्हाला जागं करण्याचं काम केलं जाईल" असं देखील प्रियंका यांनी म्हटलं आहे. प्रियंका गांधींनी शेअर केलेल्या व्हिडीमध्ये दोन व्यक्ती एका मुलीला खाली पाडून तिला मारहाण करताना दिसत आहेत. तर काही लोक मोबाईलद्वारे या धक्कादायक प्रकाराचं व्हिडीओ शूट करताना दिसत आहेत. या घटनेने एकच खळबळ उडाली असून संतापाची लाट निर्माण झाली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

मुलांचं इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक करण्याच्या प्रियंका गांधींच्या गंभीर आरोपांवर सरकारने दिलं उत्तर

प्रियंका गांधी यांनी काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशमधील सरकारवर जोरदार हल्लाबोल करत गंभीर आरोप केला होता. आपल्या मुलांचं इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक केल्याचा दावा केला. तसेच सरकारकडे आता कोणतंच काम नाही आहे का? असं म्हणत निशाणा साधला होता. यानंतर आता मुलांचे इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक करण्याच्या प्रियंका यांच्या आरोपांवर सरकारने उत्तर दिलं आहे. सरकारने स्वत: चौकशी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर प्राथमिक तपासानंतर आयटी आणि इलेक्ट्रॉनिक्स मंत्रालयाने प्रियंका गांधींचे आरोप निराधार असल्याचं म्हटलं आहे. 

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीcongressकाँग्रेसyogi adityanathयोगी आदित्यनाथPoliticsराजकारण