शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

"योगीजी... तुमची कायदाव्यवस्था झोपलीय"; 'तो' धक्कादायक Video शेअर करत प्रियंका गांधी संतापल्या  

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2021 15:17 IST

Congress Priyanka Gandhi And Yogi Adityanath : काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

नवी दिल्ली - उत्तर प्रदेशमध्ये राजकीय वातावरण तापू लागलं आहे. अमेठीमधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला होता. या व्हिडीओमुळे उत्तर प्रदेशमध्ये संतापाचे वातावरण आहे. विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने देखील टीकास्त्र सोडलं आहे. याच दरम्यान काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी (Congress Priyanka Gandhi) यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. या धक्कादायक घटनेचा एक व्हिडीओ प्रियंका गांधी यांनी ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे. तसेच गुन्हेगारांवर कारवाईची मागणी केली आहे. 

प्रियंका गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट करत योगी आदित्यनाथ यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. योगी सरकारला 24 तासांचा अल्टीमेटम दिला आहे. "अमेठीमध्ये मुलीला निर्दयपणे मारहाण झाल्याचा हा प्रकार निंदनीय आहे. योगी आदित्यनाथजी, तुमच्या राज्यात दररोज दलितांच्या विरोधात सरासरी 34 तर महिलांच्या विरोधात 135 गुन्ह्यांची नोंद होत आहे. तरीदेखील तुमची कायदाव्यवस्था झोपली आहे" असं प्रियंका गांधी यांनी म्हटलं आहे. 

"जर 24 तासांच्या आत या अमानवी कृत्य करणाऱ्या अपराध्यांना अटक केली नाही, तर काँग्रेस पक्षाकडून जोरदार आंदोलन करून तुम्हाला जागं करण्याचं काम केलं जाईल" असं देखील प्रियंका यांनी म्हटलं आहे. प्रियंका गांधींनी शेअर केलेल्या व्हिडीमध्ये दोन व्यक्ती एका मुलीला खाली पाडून तिला मारहाण करताना दिसत आहेत. तर काही लोक मोबाईलद्वारे या धक्कादायक प्रकाराचं व्हिडीओ शूट करताना दिसत आहेत. या घटनेने एकच खळबळ उडाली असून संतापाची लाट निर्माण झाली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

मुलांचं इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक करण्याच्या प्रियंका गांधींच्या गंभीर आरोपांवर सरकारने दिलं उत्तर

प्रियंका गांधी यांनी काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशमधील सरकारवर जोरदार हल्लाबोल करत गंभीर आरोप केला होता. आपल्या मुलांचं इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक केल्याचा दावा केला. तसेच सरकारकडे आता कोणतंच काम नाही आहे का? असं म्हणत निशाणा साधला होता. यानंतर आता मुलांचे इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक करण्याच्या प्रियंका यांच्या आरोपांवर सरकारने उत्तर दिलं आहे. सरकारने स्वत: चौकशी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर प्राथमिक तपासानंतर आयटी आणि इलेक्ट्रॉनिक्स मंत्रालयाने प्रियंका गांधींचे आरोप निराधार असल्याचं म्हटलं आहे. 

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीcongressकाँग्रेसyogi adityanathयोगी आदित्यनाथPoliticsराजकारण