शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack : बांदीपोरामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ४ दहशतवाद्यांना अटक, पूंछ-अनंतनाग आणि उधमपूरमध्ये चकमक सुरू
2
४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश; सीमा हैदरचं आता काय होणार?
3
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
4
पहलगाम व्हॅलीचे नाव 'हिंदू व्हॅली' करा! मराठी अभिनेत्याचा सरकारला सल्ला, म्हणाला- "श्रीनगरला भारताची उपराजधानी घोषित करा"
5
Success Story: 'आपली आजी', वय वर्ष ७४, युट्यूबद्वारे महिन्याला ६ लाखांची कमाई; मराठमोळ्या आजींचा कसा आहे प्रवास?
6
FIITJEE चे मालक डीके गोयल यांच्याविरोधात ईडीची कारवाई, १० ठिकाणांवर छापेमारी
7
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
8
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
9
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
10
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
11
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
12
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
13
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
14
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
15
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
16
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
17
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
18
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
19
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
20
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा

"तिथे केजरीवाल जिंकतील..."; दिल्ली निवडणुकीबाबत केलेल्या विधानावर पृथ्वीराज चव्हाण यांचे स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 12:04 IST

दिल्ली विधानसभा निवडणुकीबाबत काँग्रेसच्या भूमिकेबाबत केलेल्या विधानावर पृथ्वीराज चव्हाण यांची स्पष्टीकरण दिलं आहे.

Delhi Assembly Election 2025: दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मोठे वक्तव्य केलं आहे. कदाचित अरविंद केजरीवाल निवडणूक जिंकतील, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं. मात्र, काँग्रेसही रिंगणात असल्याचेही त्यांनी सांगितले. दिल्लीत ५ फेब्रुवारीला मतदान होणार असून ८ फेब्रुवारीला निकाल लागणार आहेत. पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या विधानावरुन राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. अशातच पृथ्वीराज चव्हाण यांनी सोशल मिडिया पोस्टमधून त्या विधानाबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. दिल्लीत काँग्रेस विजयी होईल असा विश्वास असल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं. 

दिल्ली विधानसभा निवडणुकीवरून देशभरात राजकारण तापले असताना काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मोठे वक्तव्य केले. तिथे अरविंद केजरीवाल जिंकतील, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी एका मुलाखतीमध्ये म्हटलं. दिल्लीच्या राजकारणावर चर्चा करताना चव्हाण यांनी काँग्रेसच्या भूमिकेवरही भर दिला. काँग्रेसही या निवडणुकीच्या मैदानात पूर्ण ताकदीनिशी उतरणार असल्याचे ते म्हणाले. मात्र, काँग्रेस आणि आम आदमी पार्टी (आप) यांच्यात युती असती तर त्याचा परिणाम आणखी चांगला होऊ शकला असता, असे त्यांनी मान्य केले. मात्र दिल्लीत केजरीवाल यांच्या विजयाबाबत चव्हाण यांनी केलेल्या वक्तव्यावरुन जोरदार चर्चा सुरु झाली आहे. त्यामुळे आता पृथ्वीराज चव्हाण यांनी एक्सवर पोस्ट करत याबाबत स्पष्टीकरण दिलं.

"दिल्ली विधानसभा निवडणुकीबाबत माझ्या विधानाचा चुकीचा अर्थ काढण्यात आला. इंडिया आघाडी एकत्र लढली असती तर विजय निश्चित होता. आता सर्व प्रमुख पक्ष रिंगणात उतरल्याने खुली निवडणूक झाली आहे. काँग्रेस पक्षाला प्रचंड गती मिळाली असून आपण विजयी होऊ असा मला विश्वास आहे," असं स्पष्टीकरण पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले.

काय म्हणाले होते पृथ्वीराज चव्हाण?

"दिल्लीची निवडणूक ही खूप महत्त्वाची निवडणूक आहे. मला वाटतं कदाचित केजरीवाल तिथे जिंकतील. काँग्रेसही रिंगणात आहे, काँग्रेसही निवडणूक लढवणार आहे. काँग्रेस आणि आप यांच्यात युती झाली असती तर बरे झाले असते, पण कदाचित तसे होणार नाही. इथे बसून दिल्लीत काय चालले आहे हे सांगणे कठीण होईल," असं पृथ्वीराज चव्हाण यांनी मुलाखतीमध्ये म्हटलं होतं.

दरम्यान,अरविंद केजरीवाल यांना इंडिया आघाडीचे तीन प्रमुख पक्ष समाजवादी पार्टी, तृणमूल काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट यांचा पाठिंबा मिळाला आहे.

टॅग्स :delhi electionदिल्ली निवडणूकPrithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणcongressकाँग्रेस