शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

कोणाचीही अरेरावी, गैरवर्तन खपवून घेणार नाही- पंतप्रधान नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2019 05:50 IST

कोणाचीही मनमानी सहन करणार नाही, असेही मोदी म्हणाल्याचे सूत्रांनी सांगितले.

- हरिश गुप्तानवी दिल्ली : कोणत्याही व्यक्तीची किंवा तिच्या पुत्राची अरेरावी, गैरवर्तन अजिबात खपवून घेणार नाही, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी भाजपच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत बोलताना दिला. भाजपचे नेते कैलाश विजयवर्गीय यांचे पुत्र व इंदूरचे आमदार आकाश विजयवर्गीय यांनी एका महानगरपालिका अधिकाऱ्याला नुकतीच बॅटने मारहाण केली होती. त्याबद्दल आकाश यांचे नाव न घेता मोदींनी त्यांनाच हा इशारा दिला आहे.कोणाचीही मनमानी सहन करणार नाही, असेही मोदी म्हणाल्याचे सूत्रांनी सांगितले. भाजप संसदीय पक्षाच्या या बैठकीला पक्षाचे सरचिटणीस कैलाश विजयवर्गीयही हजर होते. मोदी म्हणाले की, अरेरावी व गैरवर्तनाच्या घटनांमुळे भाजपचे नाव खराब होते. एखाद्याकडून चूक घडली तर त्याने माफी मागण्याची तयारीही दर्शविली पाहिजे. आकाश विजयवर्गीय यांनी पालिका अधिकाºयाला मारहाण करताच त्यांना इंदूर पोलिसांनी अटक केली होती. मात्र, न्यायालयाने त्यांची जामिनावर मुक्तता केली. आपण केलेली कृती योग्यच होती व त्याबद्दल माफी मागण्याचा प्रश्नच नाही, असे वक्तव्य आकाश विजयवर्गीय यांनी तुरुंगातून सुटका झाल्यानंतर केले होते. भाजपसंसदीय पक्षाच्या तुरुंगातून सुटका झाल्यानंतर केले होते. भाजप संसदीय पक्षाच्या बैठकीबद्दल संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी पत्रकारांना सांगितले की, पंडित श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीदिनी ६ जुलैला भाजपच्या सदस्य नोंदणी मोहिमेचा नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाराणसी येथे प्रारंभ होईल, तर अमित शहा तेलंगणामध्ये व अन्य राज्यांतील भाजप नेते आपापल्या भागात या मोहिमेला सुरुवात करतील.पाच झाडे लावण्याचा ‘पंचवटी’ कार्यक्रमभाजप कार्यकर्त्यांनी प्रत्येक बुथमध्ये किमान पाच झाडे लावावीत, असा संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप संसदीय पक्षाच्या बैठकीत दिला. या वृक्षलागवड कार्यक्रमाला त्यांनी पंचवटी असे नाव दिले.चौदा वर्षांच्या वनवासाच्या काळात राम, सीता, लक्ष्मण हे काही काळ पंचवटीत राहिले होते. सध्या सुरू असलेल्या संसदेच्या अधिवेशनात भाजपच्या सर्व खासदारांनी नियमित हजेरी लावली पाहिजे. त्यांनी जनकल्याणासाठी झटले पाहिजे. त्याकरिता ते ओळखले गेले पाहिजेत.लोकसभेमध्ये तिहेरी तलाकविरोधी नवे विधेयक मांडण्यात आले त्यावेळी सभागृहात कमी संख्येने भाजप खासदार हजर होते. त्याविषयीही पंतप्रधानांनी नाराजी व्यक्त केली.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी