शहरं
Join us  
Trending Stories
1
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
2
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
3
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
4
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
5
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
6
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
7
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
8
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
9
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
10
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
11
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
12
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
13
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
14
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
15
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
16
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
17
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
18
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
19
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांची माफी मागावी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2021 05:09 IST

काँग्रेसची मागणी : शेतकरी माघार घेणार नाहीत

शिलेश शर्मा

नवी दिल्ली : शेतकरी करीत असलेल्या आंदोलनाबाबत सर्वोच्च न्यायालयाचे कठोर भाष्य आणि फटकाऱ्यानंतर काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील शेतकऱ्यांची माफी मागावी, अशी मागणी सोमवारी केली.

पक्षाचे महासचिव रणदीप सुरजेवाला यांनी ही मागणी करून स्पष्ट केले की, जोपर्यंत सरकार तिन्ही काळे कृषी कायदे मागे घेत नाही, तोपर्यंत शेतकरी परत जाणार नाहीत. मोदी सरकार अहंकारामुळे शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्याला सर्वोच्च न्यायालयाने आपल्या भाष्यातून दुजोराच दिला आहे. या भाष्यानंतर सरकारकडे ते कायदे मागे घेणे हाच एकमेव रस्ता आहे. दुसरीकडे हरयाणा काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्ष कुमारी सैलजा यांनी मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्यावर टीका करताना म्हटले की, त्यांचे सरकार शेतकऱ्यांवर जुलूम करीत असून, त्याचे परिणाम रविवारी किसान पंचायतीत बघायला मिळाले.काँग्रेसने खट्टर आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर ते शेतकऱ्यांना त्यांनी विरोध व्यक्त करू नये यासाठी दिल्लीला येणाऱ्या राज्यांच्या सीमावर अडवत असल्याचा आरोप केला. पाण्याचे फवारे मारणे, रस्ते खोदणे, लाठीमार आदी उपायांनी आंदोलन उधळून लावण्याचा प्रयत्न केला जात आहे. याच कारणामुळे शेतकरी संतापले असून, त्याचा अनुभव रविवारी हरयाणात बघायला मिळाला, असे काँग्रेसचे म्हणणे आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निरीक्षणांचा अभ्यासपणजी : कृषी कायद्यांविषयी सर्वोच्च न्यायालयाने जी निरीक्षणे नोंदविली आहेत, त्या निरीक्षणांचा केंद्र सरकार अभ्यास करेल, असे भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शाहनवाज हुसैन यांनी सोमवारी येथे पत्रकार परिषदेत सांगितले. कृषी कायद्यांचा विषय न्यायप्रविष्ट असल्याने त्याविषयी जास्त बोलता येणार नाही, पण हे कायदे शेतकऱ्यांच्या हितासाठीच आणले गेले आहेत. न्यायालयाने केलेल्या भाष्याविषयी केंद्र सरकार अभ्यास करेल व वकिलांमार्फत न्यायालयात त्याविषयी सरकारची भूमिका सादर केली जाईल, असे हुसैन यांनी नमूद केले.

शेतकरी आंदोलनामुळे भाजप-जेजेपी नेत्यांपुढे संकट

nचंदीगड : हरयाणात भाजप आणि जेजेपीचे नेते जिथे जातात तिथे आंदोलन सुरू होते. त्यामुळे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांना अनेकदा आपले कार्यक्रम रद्द करावे लागले आहेत. मुख्यमंत्र्यांची कर्नालमधील सभा रविवारी रद्द करावी लागली. 

nशेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला आणि त्यांचे कॅबिनेट यांना आंदोलकांच्या संतापाला सामोरे जावे लागत आहे. हरयाणात भाजप आणि त्यांचा सहयोगी पक्ष यांचे नेते सध्या कार्यालय आणि घर या ठिकाणीच असतात. 

 

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संपNarendra Modiनरेंद्र मोदी