शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
3
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
4
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
5
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
6
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
7
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
8
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
9
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
10
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
11
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
12
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
13
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
14
UP: बेकायदेशीर औषधाविरुद्ध योगी सरकारची कडक कारवाई; ४ दिवसांत १६ गुन्हे दाखल, २५ दुकानांवर बंदी!
15
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
16
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
17
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
18
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
19
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
20
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा

...तेव्हा डॉ. मनमोहन सिंग व्हीलचेअरवर सभागृहात आले; PM नरेंद्र मोदींनी केलं कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2024 13:02 IST

जेव्हा जेव्हा आपल्या लोकशाहीची चर्चा होईल, तेव्हा डॉ. मनमोहन सिंग यांच्या योगदानाचीही चर्चा नक्कीच होईल असं त्यांनी सांगितले. 

नवी दिल्ली - राज्यसभेच्या ५६ खासदारांचे हे शेवटचे अधिवेशन असल्याने सभागृहात आज त्यांना निरोप देण्यात आला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणात माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचं भरभरून कौतुक केले. त्याचसोबत त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली. 

राज्यसभेच्या ५६ जागा रिक्त होणार आहे. लवकरच या जागांसाठी निवडणूक होईल. मात्र विद्यमान ५६ खासदार यांचे हे शेवटचे अधिवेशन असल्याने सभागृहातून त्यांना निरोप देण्यात आला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, दर २ वर्षांनी या सभागृहात असा प्रसंग येतो. हे सभागृह निरंतर आहे. लोकसभा दर ५ वर्षांनी नव्याने स्थापन होते. मात्र राज्यसभा दर २ वर्षांनी नवीन उर्जा, उमंग, उत्साह निर्माण करतो. हा निरोप नाही तर अशा आठवणी कायम ठेऊन जातात त्या पुढील पिढीसाठी अमुल्य वारसा असतो. काही लोक जातायेत, काहीजण पुन्हा येण्यासाठी जातायेत. मला विशेषरित्या माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची मला आठवण येते. ६ वेळा या सभागृहात आपल्या विचारांनी नेते, विरोधी पक्षनेते त्यांचे खूप मोठे योगदान राहिले आहे. वैचारिक मतभेद कधी वादविवाद हे अल्पकालीन असते. परंतु एवढा दिर्घकाळ ज्यारितीने त्यांनी सभागृहाचे आणि देशाचे मार्गदर्शन केले. जेव्हा जेव्हा आपल्या लोकशाहीची चर्चा होईल, तेव्हा डॉ. मनमोहन सिंग यांच्या योगदानाचीही चर्चा नक्कीच होईल असं त्यांनी सांगितले. 

तसेच  मी सर्व सदस्यांना, मग ते लोकसभा, राज्यसभा असो. त्यांना सांगतो, हे खासदार कुठल्याही पक्षाचे असो. ज्यारितीने त्यांनी आयुष्य खर्ची घातली. त्यांच्या कौशल्याचे दर्शन त्यांच्या कारकिर्दीत दाखवले. त्याच्याकडे मार्गदर्शक म्हणून पाहिले पाहिजे. लोकसभेत एकदा मतदानावेळी विजय विरोधकांचा होणार हे माहिती होते. मतांचे अंतरही जास्त होते. परंतु डॉ. मनमोहन सिंग व्हीलचेअरवर आले त्यांनी मतदान केले. एक खासदार त्यांच्या जबाबदारीबाबत किती सजग असायला हवा त्याचे हे उदाहरण आहे. जेव्हा कमिटीची निवडणूक होती तेव्हाही ते व्हीलचेअर मतदान करायला आले. ते कुणाला ताकद द्यायला आले हा प्रश्न नाही. परंतु ते लोकशाहीला ताकद द्यायला आले होते. त्यामुळे मी त्यांच्या दिर्घायुष्यासाठी मी प्रार्थना करतो असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं. 

दरम्यान, जे आपले सहकारी नवीन जबाबदारी घ्यायला पुढे जातायेत. राज्यसभेतून जनसभेकडे जाणार आहेत. कोविडच्या कठीण काळातही प्रत्येकाने परिस्थितीची जाणीव ठेवली. जिथे बसायला सांगितले तिथे बसले. परंतु देशाचं कामकाज थांबू दिले नाही. या खासदारांनी जुने संसद आणि नवीन संसद दोन्ही पाहिले. एका विद्यापीठातून शिकून मुले बाहेर येऊन समृद्ध बनतात तसं गेल्या ६ वर्षाच्या काळात हे खासदार समृद्ध होऊन बाहेर चालले आहेत असंही मोदींनी सांगितले. 

टॅग्स :Manmohan Singhमनमोहन सिंगNarendra Modiनरेंद्र मोदीRajya Sabhaराज्यसभा