शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

...तेव्हा डॉ. मनमोहन सिंग व्हीलचेअरवर सभागृहात आले; PM नरेंद्र मोदींनी केलं कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2024 13:02 IST

जेव्हा जेव्हा आपल्या लोकशाहीची चर्चा होईल, तेव्हा डॉ. मनमोहन सिंग यांच्या योगदानाचीही चर्चा नक्कीच होईल असं त्यांनी सांगितले. 

नवी दिल्ली - राज्यसभेच्या ५६ खासदारांचे हे शेवटचे अधिवेशन असल्याने सभागृहात आज त्यांना निरोप देण्यात आला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणात माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचं भरभरून कौतुक केले. त्याचसोबत त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली. 

राज्यसभेच्या ५६ जागा रिक्त होणार आहे. लवकरच या जागांसाठी निवडणूक होईल. मात्र विद्यमान ५६ खासदार यांचे हे शेवटचे अधिवेशन असल्याने सभागृहातून त्यांना निरोप देण्यात आला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, दर २ वर्षांनी या सभागृहात असा प्रसंग येतो. हे सभागृह निरंतर आहे. लोकसभा दर ५ वर्षांनी नव्याने स्थापन होते. मात्र राज्यसभा दर २ वर्षांनी नवीन उर्जा, उमंग, उत्साह निर्माण करतो. हा निरोप नाही तर अशा आठवणी कायम ठेऊन जातात त्या पुढील पिढीसाठी अमुल्य वारसा असतो. काही लोक जातायेत, काहीजण पुन्हा येण्यासाठी जातायेत. मला विशेषरित्या माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची मला आठवण येते. ६ वेळा या सभागृहात आपल्या विचारांनी नेते, विरोधी पक्षनेते त्यांचे खूप मोठे योगदान राहिले आहे. वैचारिक मतभेद कधी वादविवाद हे अल्पकालीन असते. परंतु एवढा दिर्घकाळ ज्यारितीने त्यांनी सभागृहाचे आणि देशाचे मार्गदर्शन केले. जेव्हा जेव्हा आपल्या लोकशाहीची चर्चा होईल, तेव्हा डॉ. मनमोहन सिंग यांच्या योगदानाचीही चर्चा नक्कीच होईल असं त्यांनी सांगितले. 

तसेच  मी सर्व सदस्यांना, मग ते लोकसभा, राज्यसभा असो. त्यांना सांगतो, हे खासदार कुठल्याही पक्षाचे असो. ज्यारितीने त्यांनी आयुष्य खर्ची घातली. त्यांच्या कौशल्याचे दर्शन त्यांच्या कारकिर्दीत दाखवले. त्याच्याकडे मार्गदर्शक म्हणून पाहिले पाहिजे. लोकसभेत एकदा मतदानावेळी विजय विरोधकांचा होणार हे माहिती होते. मतांचे अंतरही जास्त होते. परंतु डॉ. मनमोहन सिंग व्हीलचेअरवर आले त्यांनी मतदान केले. एक खासदार त्यांच्या जबाबदारीबाबत किती सजग असायला हवा त्याचे हे उदाहरण आहे. जेव्हा कमिटीची निवडणूक होती तेव्हाही ते व्हीलचेअर मतदान करायला आले. ते कुणाला ताकद द्यायला आले हा प्रश्न नाही. परंतु ते लोकशाहीला ताकद द्यायला आले होते. त्यामुळे मी त्यांच्या दिर्घायुष्यासाठी मी प्रार्थना करतो असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं. 

दरम्यान, जे आपले सहकारी नवीन जबाबदारी घ्यायला पुढे जातायेत. राज्यसभेतून जनसभेकडे जाणार आहेत. कोविडच्या कठीण काळातही प्रत्येकाने परिस्थितीची जाणीव ठेवली. जिथे बसायला सांगितले तिथे बसले. परंतु देशाचं कामकाज थांबू दिले नाही. या खासदारांनी जुने संसद आणि नवीन संसद दोन्ही पाहिले. एका विद्यापीठातून शिकून मुले बाहेर येऊन समृद्ध बनतात तसं गेल्या ६ वर्षाच्या काळात हे खासदार समृद्ध होऊन बाहेर चालले आहेत असंही मोदींनी सांगितले. 

टॅग्स :Manmohan Singhमनमोहन सिंगNarendra Modiनरेंद्र मोदीRajya Sabhaराज्यसभा