शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले मोठे विधान, म्हणाले.... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2020 10:25 IST

नारगिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत तरुणाईच्या मनात  मुद्दामहून संभ्रम निर्माण केला गेला आहे

कोलकाता - केंद्र सरकारने अमलात आणलेल्या नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून सध्या देशात मोठा वाद निर्माण झालेला आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत सविस्तर असे भाष्य केले आहे. नारगिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत तरुणाईच्या मनात  मुद्दामहून संभ्रम निर्माण केला गेला आहे. मात्र मी देशभरातील तरुणांना सांगू इच्छितो की, देशाचे नागरिकत्व देण्यासाठी सरकारने रातोरात कुठलाही कायदा बनवलेला नाही. नागरिकत्व कायदा हा कुणाचेही नागरिकत्व काढून घेणारा नाही तर नागरिकत्व देणारा आहे. असे नरेंद्र मोदींनी स्पष्ट केले आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कोलकाताजवळील बेलूर मठाला भेट देऊन स्वामी विवेकानंद यांना आदरांजली वाहिली. त्यानंतर मोदींनी उपस्थित युवा वर्गाला संबोधित केले. यावेळी मोदींनी नुकत्याच लागू करण्यात आलेल्या नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून तरुणांच्या आणि विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण झालेल्या शंकांचे निरसन करण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले, '' नारगिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत देशातील  तरुणाईच्या मनात प्रश्न निर्माण झालेले आहे. काही जणांकडून मुद्दामहून संभ्रम निर्माण केला गेला आहे. मात्र मी देशभरातील तरुणांना सांगू इच्छितो की, देशाचे नागरिकत्व देण्यासाठी सरकारने रातोरात कुठलाही कायदा बनवलेला नाही. नागरिकत्व कायदा हा कुणाचेही नागरिकत्व काढून घेणारा नाही तर नागरिकत्व देणारा आहे. फाळणी झाल्यानंतर पाकिस्तानमध्ये राहिलेल्या अल्पसंख्याकांना तिथे धर्माच्या आधारावर छळाचा सामना करावा लागल्यास त्यांना भारताचे नागरिकत्व देण्यात यावे, असे महात्मा गांधी आणि अन्य ज्येष्ठ नेत्यांचे मत होते. त्याची या कायद्याच्या माध्यमातून पूर्तता करण्यात आली आहे. आता आपल्या देशात शरणागत म्हणून आलेल्या निर्वासितांना पुन्हा मृत्यूच्या डाढेत ढकलायचे का?'' 

''नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या माध्यमातून आम्ही नागरिकत्व देत आहोत. कुणाचेही नागरिकत्व काढून घेत नाही आहोत. त्याशिवाय आजही कुठल्याही धर्माची व्यक्ती मग तिचा देवावर विश्वास असो वा नसो तिचा भारताच्या घटनेवर निश्वास असेल, तर अशी व्यक्ती योग्य प्रक्रियेद्वारे भारताचे नागरिकत्व मिळवू शकते,''असेही नरेंद्र मोदींनी स्पष्ट केले. 

यावेळी नागरिकत्व दुरुस्ती कायद्यामुळे पूर्वोत्तर भारतावर परिणाम होणार असल्याच्या व्यक्त करण्यात आलेल्या शंकेलाही मोदींनी प्रत्युत्तर दिले. पूर्वोत्तर भारतातील संस्कृती आणि परंपरेबाबत आम्हाला अभिमान आहे. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याचा पूर्वोत्तर भारतालील संस्कृती आणि परंपरांवर कुठलाही परिणाम होणार नाही, यासाठी तरतूद करण्याल आली आहे, असेही मोदींनी यावेळी सांगितले. 

''नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत काही जणांकडून मुद्दामहून संभ्रम निर्माण केला जात आहे. आता मी जेकाही सांगितले ते लहान लहान विद्यार्थ्यांनाही समजले. मात्र आपल्याकडी काही समजूतदार व्यक्ती मात्र ते समजून घेऊ इच्छीत नाहीत. आता हे संभ्रम दूर करण्याचे काम तरुण वर्गच करणार आहे. पाकिस्तानमध्ये इतर धर्माच्या लोकांवर अत्याचार होतो, त्याविरोधात आमची तरुणाईच आवाज उठवत आहे. आम्ही जर हा कायदा आणला नसता तर विवाद झाला नसता आणि विवाद झाला नसता तर पाकिस्तानमधील अल्पसंख्याकांवर होणारे अत्याचार उजेडात आले नसते. त्यामुळे आता पाकिस्तानला जगाला उत्तर द्यावे लागेल,'' असेही मोदी म्हणाले. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकPoliticsराजकारण