शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदीच ‘फ्रंटरनर’ : डॉ. विजय दर्डा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2023 04:39 IST

देशात सध्याचे वातावरण बघता पंतप्रधान मोदी हेच लोकसभा निवडणुकीतील फ्रंटरनर असल्याचं केलं वक्तव्य.

नवी दिल्ली : देशात सध्याचे वातावरण बघता पंतप्रधान मोदी हेच लोकसभा निवडणुकीतील फ्रंटरनर आहेत. योग्य वेळी वेगळा विदर्भ झाल्याशिवाय राहणार नाही, अशी रोखठोक मते लोकमत एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन व माजी राज्यसभा सदस्य डॉ. विजय दर्डा यांनी प्रसिद्ध अँकर आणि इंडिया टुडे टेलिव्हिजनचे सल्लागार संपादक राजदीप सरदेसाई यांच्याशी केलेल्या दिलखुलास चर्चेत मंगळवारी येथे मांडली.

प्रश्न : वेगळा विदर्भ बनेल, असे अजूनही वाटते की विदर्भाला आता महाराष्ट्रातच राहावे लागणार?   डॉ. दर्डा : उत्तराखंड, छत्तीसगड आणि  झारखंड या तीन छोट्या राज्यांच्या निर्मितीची घोषणा झाली तेव्हा तत्कालीन गृहमंत्री लालकृष्ण अडवाणी यांनी राजकीय निर्णय घेताना शिवसेनेपुढे नमते घेतले. योग्य वेळ येईल तेव्हा विदर्भ राज्य बनेल. आज ना उद्या त्यावर भूमिका घ्यावीच लागेल. 

प्रश्न : २०२४ साली पंतप्रधान मोदी हॅटट्रिक नोंदवून पुन्हा सत्तेत येतील, का? महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांत काय होईल असे वाटते?डॉ. दर्डा : आगामी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदी हेच फ्रंटरनर आहेत. महाराष्ट्रात काय होईल  यावर आज भाष्य करणे अतिशय कठीण आहे. शिवसेना सोडून आमदार का गेले, काँग्रेसमधून बडे नेते सोडून का गेले, यावर चिंतन व्हायला हवे. 

प्रश्न : मल्लिकार्जुन खरगे अध्यक्ष झाल्यानंतर काँग्रेसचे पुनरुज्जीवन होण्याची शक्यता वाटते काय?डॉ. दर्डा :  काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हे प्रदीर्घ अनुभव असलेले ज्येष्ठ नेते आहेत. त्यासोबतच  काँग्रेसला डॉ. शशी थरुर यांच्यासारख्या तरुण, उत्साही आणि आंतरराष्ट्रीय मान्यता लाभलेल्या  नेतृत्वाचीदेखील आवश्यकता आहे. यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आवश्यक असलेली नवी ऊर्जा भरण्यास मोठी मदत होईल. 

टॅग्स :LokmatलोकमतVijay Dardaविजय दर्डाNarendra Modiनरेंद्र मोदी