शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

पंतप्रधानांची बातच न्यारी; स्कॉटलंडमध्ये वाजवले ढोल, नरेंद्र मोदींचे भारतीयांकडून जंगी स्वागत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2021 12:15 IST

स्कॉटलंडमध्ये पीएम मोदींनी तेथील भारतीय समुदायाच्या लोकांची भेट घेतली. भारतीयांकडून मोदींचे जंगी स्वागत करण्यात आले.

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी(PM Narendra Modi) आज G-20 परिषद आणि कॉन्फ्रेंस ऑफ पार्टीज(COP) 26  मध्ये सहभागी होऊन देशात परतले आहेत. पण भारतात परतण्याच्या काही तास आधी स्कॉटलंडमध्ये पीएम मोदींचा वेगळाच अंदाज पाहायला मिळाला. भारताला रवाना होण्यापूर्वी पंतप्रधान मोदींनी तेथील भारतीय समुदायाच्या लोकांची भेट घेतली. भारतीयांकडून मोदींचे जंगी स्वागत करण्यात आले. तसेच, यावेळी नरेंद्र मोदींनी स्वागत समारंभात बँड वाजवणाऱ्या ग्रुपसोबत ढोल वाजवला.

मंगळवारी पंतप्रधान मोदी विमानतळावर जाण्यासाठी हॉटेलमधून बाहेर पडले. येथे त्यांच्या स्वागतासाठी अनेक लोक हॉटेलबाहेर उभे होते. त्यात काही ढोल-ताशे घेऊन उभे होते. पीएम मोदींना पाहताच त्यांनी ढोल वाजवायला सुरुवात केली. यादरम्यान पीएम मोदीही त्यांच्या जवळ पोहोचले, त्यांचे अभिवादन स्वीकारले आणि त्यांच्यासोबत ढोल वाजवला.

लोकांनी भारतीय पोशाखात स्वागत केले

हॉटेलबाहेर उपस्थित लोक पारंपारिक भारतीय पोशाखात उभे होते. यावेळी पंतप्रधान मोदींनी तेथे उपस्थित लहान मुलांचीही भेट घेतली. आपल्या 5 दिवसांच्या परदेश दौऱ्यात पंतप्रधान मोदींनी ब्रिटन, इस्रायल, नेपाळ, इटली आणि फ्रान्ससह अनेक देशांच्या नेत्यांची भेट घेतली. याशिवाय रोममध्ये झालेल्या G20 शिखर परिषदेतही पंतप्रधान मोदी सहभागी झाले होते.

इस्रो लवकरच जगाला नवं उपकरण देणारमंगळवारी स्कॉटलंडमध्ये पंतप्रधान मोदींनी सौर उर्जेची व्यवहार्यता वाढवण्यावर भर दिला आणि प्रत्येक गोष्ट सूर्यापासून उद्भवते यावर जोर दिला. त्यासाठी 'वन सन, वन वर्ल्ड, वन ग्रीड'ची हाकही त्यांनी दिली. भारताची अंतराळ संस्था इस्रो(इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन) लवकरच जगाला एक कॅल्क्युलेटर प्रदान करेल, जे जगभरातील कोणत्याही प्रदेशात सौर ऊर्जेची उपलब्धता मोजू शकेल, अशी घोषणाही पंतप्रधान मोदींनी केली.

औद्योगिक क्रांतीने पृथ्वी आणि पर्यावरणाचा नाश केला

क्लायमेट समिटच्या पार्श्‍वभूमीवर ग्लास्गो येथील जागतिक नेत्यांना संबोधित करताना 'क्लीन टेक्नॉलॉजी इनोव्हेशनचा प्रचार आणि उपयोजन' कार्यक्रमात मोदी म्हणाले की, औद्योगिक क्रांतीदरम्यान जीवाश्म इंधनाचा वापर करून अनेक देश श्रीमंत झाले, परंतु त्याचा पृथ्वीवर आणि पर्यावरणावरही परिणाम झाला. जीवाश्म इंधन वापरून औद्योगिक क्रांती झाली. जीवाश्म इंधन वापरून अनेक देश समृद्ध झाले आहेत, परंतु यामुळे पृथ्वी आणि पर्यावरणाचा नाश झाला आहे. जीवाश्म इंधनाच्या शर्यतीने भू-राजकीय तणावही निर्माण केला. 

पृथ्वी सुर्यावर अवलंबुनआपल्या भाषणादरम्यान मोदींनी सूर्योपनिषदचा उल्लेख केला आणि प्रत्येक गोष्टीची उत्पत्ती सूर्यापासून झाल्याचे सांगितले. सूर्य हा एकमेव ऊर्जेचा स्त्रोत असून सौरऊर्जा सर्वांना टिकवून ठेवू शकते, असे ते म्हणाले. तसेच, पृथ्वीवर जेव्हापासून जीवसृष्टी आहे, तेव्हापासून सर्व सजीवांचे जीवनचक्र, दैनंदिन दिनचर्या सूर्योदय आणि सूर्यास्ताशी निगडित आहे. निसर्गाशी हे नाते जोपर्यंत कायम राहील, तोपर्यंत पृथ्वी सुरक्षित राहील आणि निरोगी राहील, असेही मोदी म्हणाले.

 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा