शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

BJP Foundation Day: “घराणेशाही असलेल्या पक्षांनी देशाशी विश्वासघात केला”; PM मोदींची विरोधकांवर घणाघाती टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2022 12:02 IST

BJP Foundation Day: सध्या देशात विशिष्ट घराण्याची भक्ती आणि देशभक्ती असे दोन प्रकारचे राजकारण सुरु असल्याचे पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे.

नवी दिल्ली: आताच्या घडीला भारतीय जनता पक्ष (BJP) देशातील सर्वांत मोठा पक्ष ठरत आहे. देशातील बहुतांश राज्यांमध्ये भाजपची सत्ता असून, पक्षाच्या कार्यकर्त्यांची संख्याही कोट्यवधींच्या घरात आहे. जगभरात एवढे कार्यकर्ते असणारा भाजप मोठा पक्ष असल्याचे सांगितले जात आहे. यातच भाजप आपला ४२ वा स्थापना दिवस साजरा करत आहे. यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेत्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी विरोधकांवर घणाघाती टीका करत घराणेशाहीच्या पक्षांनी देशाशी विश्वासघात केल्याचे म्हटले आहे. 

सध्या देशात दोन प्रकारचे राजकारण सुरू आहे. एक म्हणजे एका विशिष्ट घराण्याची भक्ती आणि दुसरे म्हणजे देशभक्ती. देशातील काही पक्ष केवळ आपल्या कुटुंबासाठी काम करत आहेत. भाजपनेच प्रथम घराणेशाहीविरोधात बोलण्यास सुरुवात केली आणि हा निवडणुकीचा मुद्दा ठरला. घराणेशाहीचे सरकार लोकशाहीचे शत्रू असून, ते संविधानाला महत्त्व देत नाही, ही बाब आता देशवासीयांच्या लक्षात आली आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे. 

भाजपने देशवासींयांचे नुकसान थांबवले

घराणेशाहीच्या पक्षांना भाजपने जोरदार टक्कर दिली आणि देशवासीयांचे नुकसान होऊ दिले नाही, असे सांगत भाजपचा हा स्थापना दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. भारत स्वातंत्र्याची ७५ वर्ष पूर्ण करत अमृत महोत्सव साजरा करत आहे. जगात मोठ्या घडामोडी घडत असून, भारतासाठी अनेकविध संधी उपलब्ध होत आहेत. याशिवाय अलीकडेच झालेल्या पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये चार राज्यांत भाजपने पुन्हा एकदा सत्ता स्थापन करून नवीन इतिहास घडवला आहे. तसेच तीन दशकांनंतर भाजपची राज्यसभेतील सदस्य संख्या १०० वर गेली आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले. 

दरम्यान, भाजप कार्यकर्ते देशवासीयांच्या स्वप्नांचे प्रतिनिधी आहेत. भाजप कार्यकर्त्यांसाठी हा कर्तव्याचा काळ आहे. देश बदलतो आहे. देशाकडे आता निर्णयशक्ती आणि इच्छाशक्ती दोन्ही आहेत. काश्मीर ते कन्याकुमारी आणि कच्छ ते कोहिमापर्यंत एक भारत, श्रेष्ठ भारतचा नारा भाजप आणखी सशक्त करत आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. चैत्री नवरात्राच्या शुभेच्छाही यावेळी पंतप्रधान मोदींनी दिल्या. 

टॅग्स :BJPभाजपाPoliticsराजकारणNarendra Modiनरेंद्र मोदी