शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

BJP Foundation Day: “घराणेशाही असलेल्या पक्षांनी देशाशी विश्वासघात केला”; PM मोदींची विरोधकांवर घणाघाती टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2022 12:02 IST

BJP Foundation Day: सध्या देशात विशिष्ट घराण्याची भक्ती आणि देशभक्ती असे दोन प्रकारचे राजकारण सुरु असल्याचे पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे.

नवी दिल्ली: आताच्या घडीला भारतीय जनता पक्ष (BJP) देशातील सर्वांत मोठा पक्ष ठरत आहे. देशातील बहुतांश राज्यांमध्ये भाजपची सत्ता असून, पक्षाच्या कार्यकर्त्यांची संख्याही कोट्यवधींच्या घरात आहे. जगभरात एवढे कार्यकर्ते असणारा भाजप मोठा पक्ष असल्याचे सांगितले जात आहे. यातच भाजप आपला ४२ वा स्थापना दिवस साजरा करत आहे. यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेत्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी विरोधकांवर घणाघाती टीका करत घराणेशाहीच्या पक्षांनी देशाशी विश्वासघात केल्याचे म्हटले आहे. 

सध्या देशात दोन प्रकारचे राजकारण सुरू आहे. एक म्हणजे एका विशिष्ट घराण्याची भक्ती आणि दुसरे म्हणजे देशभक्ती. देशातील काही पक्ष केवळ आपल्या कुटुंबासाठी काम करत आहेत. भाजपनेच प्रथम घराणेशाहीविरोधात बोलण्यास सुरुवात केली आणि हा निवडणुकीचा मुद्दा ठरला. घराणेशाहीचे सरकार लोकशाहीचे शत्रू असून, ते संविधानाला महत्त्व देत नाही, ही बाब आता देशवासीयांच्या लक्षात आली आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे. 

भाजपने देशवासींयांचे नुकसान थांबवले

घराणेशाहीच्या पक्षांना भाजपने जोरदार टक्कर दिली आणि देशवासीयांचे नुकसान होऊ दिले नाही, असे सांगत भाजपचा हा स्थापना दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. भारत स्वातंत्र्याची ७५ वर्ष पूर्ण करत अमृत महोत्सव साजरा करत आहे. जगात मोठ्या घडामोडी घडत असून, भारतासाठी अनेकविध संधी उपलब्ध होत आहेत. याशिवाय अलीकडेच झालेल्या पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये चार राज्यांत भाजपने पुन्हा एकदा सत्ता स्थापन करून नवीन इतिहास घडवला आहे. तसेच तीन दशकांनंतर भाजपची राज्यसभेतील सदस्य संख्या १०० वर गेली आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले. 

दरम्यान, भाजप कार्यकर्ते देशवासीयांच्या स्वप्नांचे प्रतिनिधी आहेत. भाजप कार्यकर्त्यांसाठी हा कर्तव्याचा काळ आहे. देश बदलतो आहे. देशाकडे आता निर्णयशक्ती आणि इच्छाशक्ती दोन्ही आहेत. काश्मीर ते कन्याकुमारी आणि कच्छ ते कोहिमापर्यंत एक भारत, श्रेष्ठ भारतचा नारा भाजप आणखी सशक्त करत आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. चैत्री नवरात्राच्या शुभेच्छाही यावेळी पंतप्रधान मोदींनी दिल्या. 

टॅग्स :BJPभाजपाPoliticsराजकारणNarendra Modiनरेंद्र मोदी