शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

पाक लष्कराच्या होकारानंतरच पंतप्रधान नरेंद्र मोदी व नवाज शरीफ भेट सफल

By admin | Updated: December 28, 2015 00:28 IST

पाकिस्तानी लष्कराच्या होकारानंतरच भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी व पाक पंतप्रधान नवाज शरीफ यांची शुक्रवारची भेट होऊ शकली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

इस्लामाबाद : पाकिस्तानी लष्कराच्या होकारानंतरच भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी व पाक पंतप्रधान नवाज शरीफ यांची शुक्रवारची भेट होऊ शकली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. उभय देशांतील संबंध गेल्या काही वर्षांत बरेच ताणले गेले होते. अलीकडेच पाकने राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार बदलले. नव्या सल्लागारांनी लष्कराचा होकार मिळविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली, त्यामुळेच लाहोर भेट सफल झाली, परिणामी भविष्यातील चर्चेचा मार्ग मोकळा झाला, असे पाक अधिकाऱ्यांनी सांगितले. पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी सांगितले की, पंतप्रधान नवाज शरीफ यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी नरेंद्र मोदी यांनी फोन केला, त्याच वेळी दोघांनी ही भेट अचानक ठरवली. ही काही पूर्वनियोजित भेट नव्हती. दोन्ही नेते भेटल्यानंतर येत्या जानेवारीत सचिवस्तरीय बैठक घेण्याचे त्यांनी ठरवले. भारत व पाकिस्तान दोन्ही अण्वस्त्रसंपन्न देश असून गेल्या ६५ वर्षांपासून दोन्ही देशातील संबंध ताणलेले आहेत. या भेटीने उभय देशांत चर्चा तरी सुरू होईल, असे मानले जात आहे. या भेटीचे श्रेय पाक लष्कराला आहे असे सांगून पाक अधिकारी म्हणाले की, अलीकडेच लष्करातील सेवानिवृत्त जनरल नासिरखान जान्जुआ यांची शरीफ यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून नियुक्ती केली. ते शरीफ यांचे मित्र मानले जातात. पाकिस्तानी राजकारणात नवाज शरीफ यांच्या प्रवेशाच्या वेळी नासिरखान यांनी मदत केली होती, असे मानले जाते. त्यांनी प्रयत्न केल्यामुळे पाकिस्तानला चर्चा सुरू करण्यासाठी, विशेषत: दहशतवादासारख्या काटेरी विषयावर बोलण्यासाठी धैर्य आले. वरिष्ठ राजनैतिक अधिकाऱ्याने सांगितले की, यावेळी स्थिती वेगळी आहे. वरिष्ठ लष्करी अधिकारी, विशेष म्हणजे पाक लष्करप्रमुख त्याला अनुकूल आहेत. त्यामुळे काहीतरी सकारात्मक होईल. नासिरखान जान्जुआ यांचा या विषयातील अनुभव दांडगा असून त्यांचा लष्करप्रमुखांशी थेट संपर्क आहे. नवाज शरीफ यांच्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्याने अलीकडे असेच मत व्यक्त केले होते. (वृत्तसंस्था)दोन्ही देशांतील पंतप्रधानांचा थेट संपर्क ठप्प झालेले संबंध प्रवाही करण्यात निश्चितच उपयोगी पडेल, असे दिल्लीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मत आहे. मोदी व शरीफ पॅरिस येथे हवामान परिषदेत भेटले होते; पण त्यावेळी फार काही झाले नाही. खरा बदल झाला तो नासिरखान यांच्या नियुक्तीनंतरच व त्यामुळे दोन्ही नेते भेटू शकले. डिसेंबर महिन्यातच भारत-पाकचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार बँकॉक येथे भेटले होते. बँकॉक भेटीनंतरच परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचा पाकिस्तान दौरा झाला. पाककडून होणाऱ्या दहशतवादी कारवाया व मुंबईत २००८ मध्ये झालेला हल्ला हे दोन प्रश्न भारताच्या दृष्टीने प्रमुख प्रश्न आहेत, तर काश्मीर प्रश्न पाकला महत्त्वाचा वाटतो. >>> भारत-पाक जानेवारीतील चर्चेतून काहीही निषन्न होणार नाही -सरताज अजिजजानेवारीत होणाऱ्या चर्चेत सर्व प्रश्नांचा प्राधान्याने विचार झाला पाहिजे. शेजारील राष्ट्रांशी सौहार्दाचे संबंध निर्माण झाले पाहिजेत हे पंतप्रधान नवाज शरीफ यांचे धोरण असल्याचे त्यांनी सांगितले. इस्लामाबाद : येत्या जानेवारीत होणाऱ्या भारत-पाक सचिवस्तरीय चर्चेतून फार काही निष्पन्न होणार नाही, अशी प्रतिक्रिया सरताज अजिज यांनी शनिवारी व्यक्त केली. ते पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांचे परराष्ट्रविषयक सल्लागार आहेत. पाकिस्तान रेडिओवरील करंट अफेअर्स कार्यक्रमात ते म्हणाले की, दोन्ही देशांमधील सर्व प्रश्नांवर तातडीने तोडगा निघेल अशी अपेक्षा ठेवणे व्यर्थ आहे. दोन्ही देशातील तणाव कमी होईल व प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर शांतता निर्माण करून त्या भागात राहणाऱ्या लोकांचे जीवन कसे सुरक्षित होईल हे प्रथम पाहिले पाहिजे, असे ते म्हणाले. > मोदी ही जुन्या बाटलीतील नवी दारूपाकचे वरिष्ठ लष्करी अधिकारी म्हणाले, हे सकारात्मक पाऊल आहे यात शंका नाही; पण आपण सावध राहिले पाहिजे. मोदी म्हणजे जुन्या बाटलीतील नवी दारू असून शरीफ यांनी एकावेळी एकच घोट घ्यावा.