शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
2
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
4
दुबईत सोनं खरंच स्वस्त मिळतं? भारतात आणण्याचे नियम काय? किती टॅक्स लागतो? सर्व काही जाणून घ्या
5
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
6
भन्साळींच्या या सिनेमासाठी २ मराठी अभिनेत्यांनीही दिलेली ऑडिशन, वैभव तत्ववादीने मारली 'बाजी'
7
संजय कपूर यांच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीवरून गृहकलह? कोण आहे प्रिया सचदेव? अचानक का आली चर्चेत?
8
'मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते; राष्ट्रवादीने मराठ्यांचा वापर केला', प्रकाश सोळंकेंचा पक्षाला घरचा आहेर
9
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
10
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
11
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
12
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा
13
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
14
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?
15
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
16
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
17
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
18
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
19
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
20
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया

...म्हणून पंतप्रधान मोदींनी राज्यसभेत माजी पंतप्रधान देवेगौडांचे मानले आभार, विरोधकांवर केलं मोठं भाष्य!

By श्रीकृष्ण अंकुश | Updated: February 8, 2021 12:47 IST

शेतकरी आंदोलनासंदर्भात सभागृहात बरीच चर्चा झाली. मात्र, मुख्य मुद्यांवर चर्चा झालीच नाही, असे मोदी म्हणाले. माजी पंतप्रधान देवेगौडा यांचे आभार मानत मोदी म्हणाले... (Narendra Modi in Rajya Sabha)

नवी दिल्ली - राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणावर झालेल्या चर्चेनंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी राज्यसभेत विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरं दिली. यावेळी त्यांनी कोरोनापासून ते शेतकरी आंदोलनांपर्यंत अनेक विषयांवर भाष्य केले. शेतकरी आंदोलनावर बोलताना मोदींनी माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा (H. D. Deve Gowda) यांचेही आभार मानले. (Prime Minister Modi thanked former Prime Minister Deve Gowda in the Rajya Sabha)

शेतकरी आंदोलनासंदर्भात सभागृहात बरीच चर्चा झाली. मात्र, मुख्य मुद्यांवर चर्चा झालीच नाही, असे मोदी म्हणाले. माजी पंतप्रधान देवेगौडा यांचे आभार मानत मोदी म्हणाले, त्यांनी चर्चेला गंभीर रूप दिले. त्यांनी सरकारच्या प्रयत्नांचे कौतुकही केले. तसेच त्यांनी या विषयावर काही सूचनाही दिल्या. ते शेतकरी प्रश्नांशी जोडलेले आहेत. त्यामुळे शेतीची मूलभूत समस्या काय? याची मुळं शोधली जायला हवीत.

Narendra Modi in Rajya Sabha : विरोधकांवर मोदींचा निशाणा; सांगितलं, कोरोनाविरोधातील लढाईचं खर श्रेय कुणाला?

शेतकरी आंदोलन नेमके कशासाठी, यावर सगळेच गप्प -शेतकरी आंदोलन कसे सुरू आहे, वैगेरे यावर सर्वच जण बोलले. मात्र, हे आंदोलन नेमके कशासाठी, यावर सगळेच गप्प आहेत. या मुद्द्यावर जर मूलभूत चर्चा झाली असती तर अधिक बरे झाले असते. शिवाय, कृषिमंत्र्यांनी काही प्रश्न विचारले, त्याची उत्तरे कुणीही देत नाही, अशा शब्दात मोदींनी विरोधकांवर निशाणा साधला.

कधीतरी सुधारणा कराव्या लागणार आहेत -काळानुसार बदलणे ही काळाची गरज आहे, जे लोक राजकीय प्रतिक्रिया देत आहेत, त्यांनीही या सुधारणांवर अनेकदा भाष्य केले आहे, परंतु कोणीही पुढाकार घेतला नव्हता, कधीतरी सुधारणा कराव्या लागणार आहेत, चर्चा करावी, जे काही चांगले होईल त्याचे श्रेय आपण घ्या. चूक झाली तर माझ्या माथी मारा पण सर्वांनी सोबत येऊन विस्तृत चर्चा करावी, असे मोदी विरोधकांना उद्देशून म्हणाले.

Narendra Modi: “MSP होता, आहे अन् राहणार; चूक झाली तर माझ्या माथी मारा, चांगलं झालं तर श्रेय तुम्ही घ्या”

MSP होता, आहे अन् राहणार - एकदा सुधारणा करून लाभ होतो की नाही, हे पाहायला हवे, त्रुटी असतील तर त्या दुरुस्त करूया. यामुळे बाजारपेठ आधुनिक होईल, स्पर्धा वाढेल. याबरोबरच MSP आहे आणि भविष्यातही राहणारच, त्यामुळे अफवा पसरवू नका. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याच्या दुसऱ्या पर्यायावर भर देणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांवरील बोझा कमी व्हावा यासाठी विचार केला पाहिजे. शेतकऱ्यांचे उत्पादन वाढविण्यासाठी, नफा वाढविण्यासाठी आणखी काम करायचे आहे. राजकारण करुन शेतकऱ्यांना काळोखात ढकलू नये, असेही मोदी यांनी विरोधकांना उद्देशून म्हटले आहे.

नेमकं काय म्हणाले होते देवेगौडा -सध्या देशात छोटे शेतकरी 90 टक्के आहेत आणि या 90 टक्के शेतकऱ्यांना डोळ्यासमोर ठेऊनच हे कायदे तयार करण्यात आले आहेत. या पूर्वीची सरकारंही छोट्या आणि मध्यम शेतकऱ्यांचे हीत लक्षात घेत, सातत्याने त्यांच्या हितासाठी निर्णय घेण्यासंदर्भात चर्चा करत होते. एवढेच नाही, तर कृषी मंत्र्यांनी आंदोलन संपविण्याचा प्रयत्नही केला आणि विरोध संपवण्यासाठी आंदोलकांशी 11 वेळा चर्चाही केली, असे देवेगौडा म्हणाले होते.

'मोदी है, मौका लिजिए'; भाषणाच्या शेवटच्या वाक्यावर नरेंद्र मोदींचा खणखणीत 'चौका'

तसेच, शेतकरी आंदोलनता वातारवण खराब करण्याची इच्छा असलेले लोकही आहेत. 26 जानेवारीला झालेल्या घटनेतही, असेच लोक होते. अशा लोकांना कठोरातली कठोर शिक्षा करायला हवी, असेही देवेगौडा यांनी म्हटले होते. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीRajya Sabhaराज्यसभाh d deve gowdaएच. डी. देवेगौडाcongressकाँग्रेसBJPभाजपाFarmers Protestशेतकरी आंदोलन