शहरं
Join us  
Trending Stories
1
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
2
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
3
"विविहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
4
Wedding Ritual: लग्नाआधीची विचित्र प्रथा, वरच्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी वधूला करावं लागतं 'हे' काम
5
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
6
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
7
सलग दुसऱ्या आठवड्याची सुरुवात घसरणीने! 'या' ३ कारणांमुळे बाजारात चांगली रिकव्हरी
8
IPL 2026 Mock Auction : CSK ची थट्टा? KKR नं ऑस्ट्रेलियन खेळाडूवर लावली ३०.५० कोटींची विक्रमी बोली!
9
भारतीय ऑटो बाजारातील सर्वात मोठी बातमी! फोक्सवॅगनची हजारो कर्मचाऱ्यांना व्हीआरएसची ऑफर, फोर्डच्याच वाटेवर?
10
पुतिन मायदेशी परतताच भारताने तयार केली ३०० वस्तूंची यादी, काय आहे केंद्र सरकारचा प्लॅन
11
१६ डिसेंबर पासून सुरु होत आहे धनुर्मास; आहार, आरोग्य, लक्ष्मी उपासनेसाठी महत्त्वाचा महिना!
12
Shaheen Afridi: शाहीन आफ्रिदीचा अपमान; बिग बॅश लीगमध्ये गोलंदाजी करण्यापासून रोखलं! नेमकं प्रकरण काय?
13
भारताच्या निर्यातीला मोठा 'बूस्ट'! नोव्हेंबरमध्ये १९.३७% ची वाढ; व्यापार तुटीतही मोठा दिलासा
14
MNS: मनपा निवडणुकीच्या घोषणेपूर्वी मोठा राडा! आयोगाच्या कार्यालयात मनसेची तोडफोड, काय घडलं?
15
याला म्हणतात ढासू स्टॉक...! पॉवर कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 30% नं वधारला; दिलाय 6500% चा बंपर परतावा, करतोय मालामाल
16
"मुलाचे कान धरू शकतो, सूनेचे धरू शकत नाही; मी उद्धव ठाकरेंना कॉल करून..."; विनोद घोसाळकरांच्या डोळ्यात पाणी
17
'मनरेगा' बंद! मोदी सरकार आणणार 'विकसित भारत-जी राम जी' योजना; राज्यांवर पडणार अतिरिक्त भार
18
"मी पोहून आलो, सकाळी घरी..."; बॉन्डी बीचवर हल्ला करण्यापूर्वी दहशतवाद्याचा आईला कॉल
19
लेडी सेहवागची कमाल! वर्ल्ड कपमध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री; एका मॅचमधील धमाक्यासह जिंकला ICC पुरस्कार
20
ना स्वतःचे विमानतळ, ना चलन, ना भाषा..; तरीदेखील 'हा' आहे युरोपमधील सर्वात श्रीमंत देश
Daily Top 2Weekly Top 5

...म्हणून पंतप्रधान मोदींनी राज्यसभेत माजी पंतप्रधान देवेगौडांचे मानले आभार, विरोधकांवर केलं मोठं भाष्य!

By श्रीकृष्ण अंकुश | Updated: February 8, 2021 12:47 IST

शेतकरी आंदोलनासंदर्भात सभागृहात बरीच चर्चा झाली. मात्र, मुख्य मुद्यांवर चर्चा झालीच नाही, असे मोदी म्हणाले. माजी पंतप्रधान देवेगौडा यांचे आभार मानत मोदी म्हणाले... (Narendra Modi in Rajya Sabha)

नवी दिल्ली - राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणावर झालेल्या चर्चेनंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी राज्यसभेत विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरं दिली. यावेळी त्यांनी कोरोनापासून ते शेतकरी आंदोलनांपर्यंत अनेक विषयांवर भाष्य केले. शेतकरी आंदोलनावर बोलताना मोदींनी माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा (H. D. Deve Gowda) यांचेही आभार मानले. (Prime Minister Modi thanked former Prime Minister Deve Gowda in the Rajya Sabha)

शेतकरी आंदोलनासंदर्भात सभागृहात बरीच चर्चा झाली. मात्र, मुख्य मुद्यांवर चर्चा झालीच नाही, असे मोदी म्हणाले. माजी पंतप्रधान देवेगौडा यांचे आभार मानत मोदी म्हणाले, त्यांनी चर्चेला गंभीर रूप दिले. त्यांनी सरकारच्या प्रयत्नांचे कौतुकही केले. तसेच त्यांनी या विषयावर काही सूचनाही दिल्या. ते शेतकरी प्रश्नांशी जोडलेले आहेत. त्यामुळे शेतीची मूलभूत समस्या काय? याची मुळं शोधली जायला हवीत.

Narendra Modi in Rajya Sabha : विरोधकांवर मोदींचा निशाणा; सांगितलं, कोरोनाविरोधातील लढाईचं खर श्रेय कुणाला?

शेतकरी आंदोलन नेमके कशासाठी, यावर सगळेच गप्प -शेतकरी आंदोलन कसे सुरू आहे, वैगेरे यावर सर्वच जण बोलले. मात्र, हे आंदोलन नेमके कशासाठी, यावर सगळेच गप्प आहेत. या मुद्द्यावर जर मूलभूत चर्चा झाली असती तर अधिक बरे झाले असते. शिवाय, कृषिमंत्र्यांनी काही प्रश्न विचारले, त्याची उत्तरे कुणीही देत नाही, अशा शब्दात मोदींनी विरोधकांवर निशाणा साधला.

कधीतरी सुधारणा कराव्या लागणार आहेत -काळानुसार बदलणे ही काळाची गरज आहे, जे लोक राजकीय प्रतिक्रिया देत आहेत, त्यांनीही या सुधारणांवर अनेकदा भाष्य केले आहे, परंतु कोणीही पुढाकार घेतला नव्हता, कधीतरी सुधारणा कराव्या लागणार आहेत, चर्चा करावी, जे काही चांगले होईल त्याचे श्रेय आपण घ्या. चूक झाली तर माझ्या माथी मारा पण सर्वांनी सोबत येऊन विस्तृत चर्चा करावी, असे मोदी विरोधकांना उद्देशून म्हणाले.

Narendra Modi: “MSP होता, आहे अन् राहणार; चूक झाली तर माझ्या माथी मारा, चांगलं झालं तर श्रेय तुम्ही घ्या”

MSP होता, आहे अन् राहणार - एकदा सुधारणा करून लाभ होतो की नाही, हे पाहायला हवे, त्रुटी असतील तर त्या दुरुस्त करूया. यामुळे बाजारपेठ आधुनिक होईल, स्पर्धा वाढेल. याबरोबरच MSP आहे आणि भविष्यातही राहणारच, त्यामुळे अफवा पसरवू नका. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याच्या दुसऱ्या पर्यायावर भर देणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांवरील बोझा कमी व्हावा यासाठी विचार केला पाहिजे. शेतकऱ्यांचे उत्पादन वाढविण्यासाठी, नफा वाढविण्यासाठी आणखी काम करायचे आहे. राजकारण करुन शेतकऱ्यांना काळोखात ढकलू नये, असेही मोदी यांनी विरोधकांना उद्देशून म्हटले आहे.

नेमकं काय म्हणाले होते देवेगौडा -सध्या देशात छोटे शेतकरी 90 टक्के आहेत आणि या 90 टक्के शेतकऱ्यांना डोळ्यासमोर ठेऊनच हे कायदे तयार करण्यात आले आहेत. या पूर्वीची सरकारंही छोट्या आणि मध्यम शेतकऱ्यांचे हीत लक्षात घेत, सातत्याने त्यांच्या हितासाठी निर्णय घेण्यासंदर्भात चर्चा करत होते. एवढेच नाही, तर कृषी मंत्र्यांनी आंदोलन संपविण्याचा प्रयत्नही केला आणि विरोध संपवण्यासाठी आंदोलकांशी 11 वेळा चर्चाही केली, असे देवेगौडा म्हणाले होते.

'मोदी है, मौका लिजिए'; भाषणाच्या शेवटच्या वाक्यावर नरेंद्र मोदींचा खणखणीत 'चौका'

तसेच, शेतकरी आंदोलनता वातारवण खराब करण्याची इच्छा असलेले लोकही आहेत. 26 जानेवारीला झालेल्या घटनेतही, असेच लोक होते. अशा लोकांना कठोरातली कठोर शिक्षा करायला हवी, असेही देवेगौडा यांनी म्हटले होते. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीRajya Sabhaराज्यसभाh d deve gowdaएच. डी. देवेगौडाcongressकाँग्रेसBJPभाजपाFarmers Protestशेतकरी आंदोलन