शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
4
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
5
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
6
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
7
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
8
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
9
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
10
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
11
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
12
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
13
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? हल्ल्याच्या भीतीने शेअर बाजार धडाम; काय आहे परिस्थिती?
14
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
15
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
16
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
17
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
18
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
19
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
20
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...

आर्थिक पॅकेजवर पंतप्रधान मोदींनी पुनर्विचार करावा, राहुल गांधी यांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2020 06:51 IST

राहुल गांधी म्हणाले की, लॉकडाऊन सावधपणे हटविण्याची गरज आहे. वृद्ध आणि गंभीर आजारी लोकांची विशेष काळजी घ्यायला हवी. अर्थव्यवस्थेत जे वादळ येणार आहे त्याची तयारी ठेवायला हवी. जे पॅकेज आहे ते कर्जाचे पॅकेज असायला नको.

- शीलेश शर्मानवी दिल्ली : गरीब, शेतकरी आणि कामगार यांना न्याय योजनेच्या धर्तीवर मदत करण्याची मागणी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी शनिवारी केली. व्हिडिओ लिंकच्या माध्यमातून त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आर्थिक पॅकेजवर पंतप्रधानांनी पुनर्विचार करावा, अशी मागणीही त्यांनी केली.राहुल गांधी म्हणाले की, लॉकडाऊन सावधपणे हटविण्याची गरज आहे. वृद्ध आणि गंभीर आजारी लोकांची विशेष काळजी घ्यायला हवी. अर्थव्यवस्थेत जे वादळ येणार आहे त्याची तयारी ठेवायला हवी. जे पॅकेज आहे ते कर्जाचे पॅकेज असायला नको. आज शेतकरी, मजूर आणि गरीब यांच्या खात्यात थेट पैसे टाकण्याची गरज आहे. आपण कर्ज द्या; पण भारत मातेने आपल्या मुलांसोबत सावकाराचे काम करू नये. यावेळी त्यांना कर्जाची नव्हे, पैशांची आवश्यकता आहे. मी अशी विनंती करतो की, पंतप्रधानांनी या पॅकेजचा पुनर्विचार करावा. शेतकरी, मजुरांना थेट पैसे देण्याबाबत विचार करा.राहुल गांधी म्हणाले की, मी असे ऐकले आहे की, पैसे न देण्याचे कारण रेटिंग आहे. आर्थिक तूट वाढली तर बाहेरच्या एजन्सीज आमच्या देशाची रेटिंग कमी करतील. आमची रेटिंग कामगार, शेतकरी आणि छोटे व्यावसायिक बनवितात. त्यामुळे रेटिंगबाबत विचार करू नका. त्यांना पैसे द्या.ते म्हणाले की, कोरोना संकटात मागणी आणि पुरवठा दोन्हीही बंद आहे. सरकारने दोन्ही बाजूंनी गती द्यावी. आता सरकारने कर्ज पॅकेज जाहीर केले आहे त्याने मागणी सुरू होणार नाही. कारण, विना पैसे लोक खरेदी कशी करणार? मागणी सुरू करण्यासाठी लोकांच्या हातात पैसा द्यावा लागेल. मागणी न सुरू झाल्यास मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते. ते नुकसान कोरोनापेक्षा मोठे असू शकते. आपण योजनेला नाव काहीही द्या; पण ती योजना लागू करा.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcorona virusकोरोना वायरस बातम्याEconomyअर्थव्यवस्था