शहरं
Join us  
Trending Stories
1
Cough Syrup Case : विषारी 'कोल्ड्रिफ' कफ सिरप बनवणाऱ्या कंपनीच्या मालकाला अटक! औषध प्यायल्याने २० मुलांचा मृत्यू
2
तेजस्वी मुख्य चेहरा, एक-दोन नव्हे तर एवढे उपमुख्यमंत्री...! बिहारमध्ये महाआघाडीनं तयार केला जागा वाटपाचा असा फॉर्म्यूला
3
बिहार निवडणुकीपूर्वी NDA मध्ये रस्सीखेच; स्वत:ला मोदींचा हनुमान म्हणवणारा नेता का आहे नाराज?
4
अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर; भारतीय अधिकाऱ्यांसमोर मोठा पेच, कारण काय?
5
पुण्यात पुन्हा दहशतवादी?; ATS आणि पुणे पोलिसांकडून कोंढवा परिसरात रात्रभर सर्च ऑपरेशन
6
इस्रायल-हमास शांतता करार: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दोघांचीही सही मिळविली, युद्ध थांबणार?
7
आजचे राशीभविष्य-९ ऑक्टोबर २०२५: आनंदोत्सव साजरा करण्याचा दिवस; व्यवसाय-नोकरीत होईल लाभ!
8
दोन शिवसेनेतल्या सततच्या भांडणांचा फायदा कोणाला?
9
संपादकीय: दिलासा तूर्त, चिंता शाश्वत! कर्जमाफीचा उच्चार न करता दिलेले पॅकेज...
10
पाकवर हल्ला कोणाच्या सांगण्यामुळे राेखला? पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचा काॅंग्रेसला सवाल
11
उद्योगांवर विजेचा ‘गुपचुप’ हल्ला, राज्यात स्थिती आणखी बिकट; प्रति युनिट दर ११.१५ रुपयांवर 
12
वाहनचालकांनो सावधान! विना हेल्मेट, राँग साइड, प्रखर दिव्यांविरुद्ध कठोर कारवाई करा : सुप्रीम कोर्ट
13
इलेक्ट्रिक कार विक्रीत दुप्पट वाढ; सप्टेंबरमध्ये नवा विक्रम; १५ हजार इव्हींची विक्री
14
‘६० कोटी जमा करा, मग याचिकेवर विचार’; शिल्पा शेट्टीवर न्यायालय संतापले...
15
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाण कुणाचा? १२ नोव्हेंबरला सुनावणी   
16
भाजपकडून लोकप्रिय चेहऱ्यांना संधी; गायिका मैथिलीस पक्षाची उमेदवारी? डॅमेज कंट्रोल मोड ऑन
17
एक जीबी डेटा आता चहाच्या एका कपापेक्षाही स्वस्त झाला आहे : मोदी
18
आता स्मार्ट चष्म्याने पाहा, बोला अन् पैसे द्या; फोनशिवाय अन् पिन न टाकता करता येणार व्यवहार 
19
प्रा. कितागावा, रॉबसन अन् याघी यांना नोबेल; मेटल-ऑर्गेनिक फ्रेमवर्कसाठी रसायनशास्त्रातील पुरस्कार 
20
भारताशी युद्ध झाल्यास आम्हीच बाजी मारणार; पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची दर्पोक्ती

आर्थिक पॅकेजवर पंतप्रधान मोदींनी पुनर्विचार करावा, राहुल गांधी यांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2020 06:51 IST

राहुल गांधी म्हणाले की, लॉकडाऊन सावधपणे हटविण्याची गरज आहे. वृद्ध आणि गंभीर आजारी लोकांची विशेष काळजी घ्यायला हवी. अर्थव्यवस्थेत जे वादळ येणार आहे त्याची तयारी ठेवायला हवी. जे पॅकेज आहे ते कर्जाचे पॅकेज असायला नको.

- शीलेश शर्मानवी दिल्ली : गरीब, शेतकरी आणि कामगार यांना न्याय योजनेच्या धर्तीवर मदत करण्याची मागणी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी शनिवारी केली. व्हिडिओ लिंकच्या माध्यमातून त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आर्थिक पॅकेजवर पंतप्रधानांनी पुनर्विचार करावा, अशी मागणीही त्यांनी केली.राहुल गांधी म्हणाले की, लॉकडाऊन सावधपणे हटविण्याची गरज आहे. वृद्ध आणि गंभीर आजारी लोकांची विशेष काळजी घ्यायला हवी. अर्थव्यवस्थेत जे वादळ येणार आहे त्याची तयारी ठेवायला हवी. जे पॅकेज आहे ते कर्जाचे पॅकेज असायला नको. आज शेतकरी, मजूर आणि गरीब यांच्या खात्यात थेट पैसे टाकण्याची गरज आहे. आपण कर्ज द्या; पण भारत मातेने आपल्या मुलांसोबत सावकाराचे काम करू नये. यावेळी त्यांना कर्जाची नव्हे, पैशांची आवश्यकता आहे. मी अशी विनंती करतो की, पंतप्रधानांनी या पॅकेजचा पुनर्विचार करावा. शेतकरी, मजुरांना थेट पैसे देण्याबाबत विचार करा.राहुल गांधी म्हणाले की, मी असे ऐकले आहे की, पैसे न देण्याचे कारण रेटिंग आहे. आर्थिक तूट वाढली तर बाहेरच्या एजन्सीज आमच्या देशाची रेटिंग कमी करतील. आमची रेटिंग कामगार, शेतकरी आणि छोटे व्यावसायिक बनवितात. त्यामुळे रेटिंगबाबत विचार करू नका. त्यांना पैसे द्या.ते म्हणाले की, कोरोना संकटात मागणी आणि पुरवठा दोन्हीही बंद आहे. सरकारने दोन्ही बाजूंनी गती द्यावी. आता सरकारने कर्ज पॅकेज जाहीर केले आहे त्याने मागणी सुरू होणार नाही. कारण, विना पैसे लोक खरेदी कशी करणार? मागणी सुरू करण्यासाठी लोकांच्या हातात पैसा द्यावा लागेल. मागणी न सुरू झाल्यास मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते. ते नुकसान कोरोनापेक्षा मोठे असू शकते. आपण योजनेला नाव काहीही द्या; पण ती योजना लागू करा.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcorona virusकोरोना वायरस बातम्याEconomyअर्थव्यवस्था