शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
2
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
3
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
4
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
5
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
6
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
7
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
8
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
9
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
10
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
11
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
12
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
13
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
14
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
15
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
16
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
17
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
18
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
19
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
20
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स

पंतप्रधान मोदी आसामच्या पूरग्रस्त भागाची करणार पाहणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2017 08:53 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी आसाममधील पुराची पाहणी करण्यासाठी आसामला रवाना झाले आहेत.

ठळक मुद्दे पंतप्रधान नरेंद्र मोदी आसाममधील पुराची पाहणी करण्यासाठी आसामला रवाना झाले आहेत. सोमवारी मोदींनी पुराचा फटका बसलेल्या लोकांना 2 लाख रूपयांची मदत जाहीर केली. आसाममधील पूरग्रस्त भागाची मोदी पाहणी करतील तसंच तेथील बचावकार्याचाही मोदींकडून आढावा घेतला जाणार आहे, असं ट्विट पंतप्रधान कार्यालयाने केलं आहे

दिसपूर, दि. 1- पंतप्रधान नरेंद्र मोदी आसाममधील पुराची पाहणी करण्यासाठी आसामला रवाना झाले आहेत. याआधी सोमवारी मोदींनी पुराचा फटका बसलेल्या लोकांना 2 लाख रूपयांची मदत जाहीर केली. पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील पुरामध्ये गंभीर जखमी झालेल्या लोकांना मोदींनी 50 हजार रूपयांच्या मदतीची घोषणा केली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी आसाममध्ये असतील. आसाममधील पूरग्रस्त भागाची मोदी पाहणी करतील तसंच तेथील बचावकार्याचाही मोदींकडून आढावा घेतला जाणार आहे, असं ट्विट पंतप्रधान कार्यालयाने केलं आहे. पंतप्रधान कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार, आसाममधील पुराची परिस्थिती लक्षात घेता मोदींकडून एक उच्चस्तरीय बैठक घेतली जाणार आहे. याबैठकीत आसामा, अरूणाचल प्रदेश आणि नागालँडमधील मदत कार्याची माहिती घेणार आहेत. या बैठकीत आसामा, अरूणाचल प्रदेश आणि नागालँडचे मुख्यमंत्री आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळते आहे. 

आसाममध्ये गेल्या अनेक दिवसांपासून मुसळधार पाऊस पडतो आहे. या पावासामुळे तेथिल जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे. आसाममधील नद्या धोकादायक पातळीजवळ पोहचल्या आहेत. या पुरात आत्तापर्यंत 83 जणांचा मृत्यू झाला आहे. झारखंडमधील काही भागातही सतत मुसळधार पाऊन सुरू असून तेथिल जनजीवनावर त्याचा परिणाम झाला आहे. 

गुजरातच्या पुराची केली हवाई पाहणीदेशातील पाच राज्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. गुजरात, राजस्थान, आसाम, ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये मुसळधार पाऊस झाला आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरात राज्यातील पूरग्रस्त भागाची हवाई पाहणी केली. तसेच, पूरग्रस्त नागरिकांना मदत करण्याचं आश्वासन दिलं. यावेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री विजय रुपानी उपस्थित होते. पुरात मृत्यूमुखी पडलेल्या मृतांच्या वारसांना प्रत्येकी दोन लाख आणि जखमींना 50 हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात येणार असल्याचं सांगितलं होतं. याचबरोबर, केंद्र सरकारकडून राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाला 500 कोटी रुपये देण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. उत्तर गुजरातमधील सौराष्ट्र , बनासकांठा आणि साबरकांठा तसंच दक्षिण गुजरातमधील वलसाडला पूराचा सर्वाधिक फटका बसला आहे.